शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

एमजेपीवर २२७ कोटी रुपये खर्चाच्या शहापूर पाणीपुरवठा प्रकल्पाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 01:17 IST

जीवघेण्या पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी इगतपुरीजवळील भावली धरणातून पाणी उचलण्यात येणार आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : जीवघेण्या पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी इगतपुरीजवळील भावली धरणातून पाणी उचलण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा योजनेवर २२७ कोटी ३८ लाख रूपये खर्च होणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्ण कामाची जबाबदारी ठाणे जिल्हा परिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर (एमजेपी) नुकतीच सोपवली आहे.उन्हाळ्यात शहापूर तालुक्यातील गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड देतात. या तालुक्यात मुंबई महापालिकेसह अन्यही शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे आहेत. मात्र, त्यातील पाणी या तालुक्यातील गावखेड्यांना मिळत नाही. यामुळे शहापूर हा आदिवासी तालुका तीव्र पाणीसमस्येच्या चक्र व्युहात सापडलेला आहे. यावर मात करण्यासाठी इगतपुरी तालुक्यामधील डोंगरपरिसरात असलेल्या भावली धरणातील पाणी शहापूरच्या ९७ गावांसह २५९ पाड्यांना पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. डोंगर उतारावरून येणारे हे पाणी शहापूरच्या या गावखे्यांना पुरवण्यात येणार आहे. गुरूत्वाकर्षणावर आधारीत या प्रादेशिक नळपाणीपुरवठ्यावर तब्बल २२७ कोटी ३८ लाख रुपये खर्च होणार आहे. या प्रकल्पाचे पूर्ण काम एमजेपीव्दारे करण्याच्या ठरावाला ठाणे जिल्हा परिषदेने नुकतीच मंजुरी दिली आहे.नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरीच्या डोंगर पठारावर भावली धरण आहे. या धरणातील पाणी पठाराखाली असलेल्या शहापूर तालुक्यामधील गावपाड्यांना पुरवता येणार आहे.प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू‘ग्रीड’ पद्धतीवर आधारीत हा प्रकल्प एमजेपीने युद्धपातळीवर सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने संमती दिली आहे. एमजेपीकडून या कामास विलंब होणार नाही, अल्पावधीतच या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासह त्याचा लाभ शहापूरच्या या टंचाईग्रस्त गावखेड्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Waterपाणीshahapurशहापूर