शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

श्वसनाच्या रुग्णांमध्ये 40 टक्के वाढ, टॉवर संस्कृतीमध्ये उंचावर राहणा-यांना होतो सर्वाधिक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 04:08 IST

दिवाळीत उडवण्यात येणा-या फटाक्यांमधील विषारी घटकांमुळे श्वसनाच्या विकारांत व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ झाली असून ही वाढ सुमारे ३० ते ४० टक्के असल्याची माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी दिली.

राजू काळे भाईंदर : दिवाळीत उडवण्यात येणा-या फटाक्यांमधील विषारी घटकांमुळे श्वसनाच्या विकारांत व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ झाली असून ही वाढ सुमारे ३० ते ४० टक्के असल्याची माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी दिली.दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती व त्यांनतर महाराष्ट्रात सुद्धा निवासी संकुलामध्ये फटाके विक्रीला न्यायालयाने बंदी घातली होती. तरीही लक्ष्मी पूजनाच्या व पाडव्याच्या आतषबाजीनंतर मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील वायू प्रदूषणात मोठी भर पडली आहे. या महानगरांमधील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट पातळीपर्यंत घसरली आहे. दिल्लीमध्ये गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुराची एवढी गडद चादर पसरली की तेथील शाळांना सुटी देणे भाग झाले होते. फटाके फोडल्यानंतर त्यातून सल्फरडाय आॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बनडाय आॅक्साईड आणि नायट्रेस गॅसेस बाहेर पडतात. त्याचा सर्वाधिक त्रास अस्थमाच्या रुग्णांना होतो. लहान मुले, वृद्ध यांना श्वसनाचे आजार होतात.दिवाळीच्या दिवसांत व त्यानंतर दोन दिवसांत श्वसनाच्या विकारांचे ३० ते ४० टक्के नवे रूग्ण येतात. ज्यांना पूर्वी कधीही अस्थमा किंवा श्वसनचा त्रास नव्हता. लहान मुलांची फुफुसे छोटी असल्याने त्यांना फटाक्यांच्या धुराचा अधिक त्रास होतो. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. चेकर यांनी सांगितले की, फटाक्यांमधील विषारी घटक असतात. ती धूराच्या स्वरुपात हवेत बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाच्या व अस्थमाच्या पेशंटमध्ये वाढ होते.मुंबई व ठाणे या शहरांचा विचार करता काळाच्या ओघात येथील चाळ संस्कृती नष्ट होऊन उंचच उंच टॉवर संस्कृती उदयास आली आहे. या उंच इमारतींमध्ये राहणाºयांना फटाक्यांच्या धुराचा अधिक त्रास होतो. कारण फटाक्यांमुळे हवेत सोडले जाणारे विषारी घटक जमिनीपासून ५०० ते हजार फुटावर तरंगत राहतात. त्यामुळे टॉवरमधील ज्येष्ठ तसेच लहान मुलांना श्वसनाचा त्रास होतो.>मालाडमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषणकेंद्र सरकारच्या ‘सफर’ या वायू प्रदूषण मोजणाºया संस्थेच्या या वर्षीच्या अहवालानुसार मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांचे प्रदूषण कमालीचे वाढले असून प्रदूषित वायूंची तसेच ‘पर्टिक्युलेट मॅटर’ म्हणजेच घनरूप दूषित कणांची उपस्थिती धोक्याच्या पातळीवर दाखवली आहे. सफरच्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड भागात शहरातील सर्वाधिक वायू प्रदूषण आहे. या उपनगरातील हवेचा दर्जा केवळ खालवलाच नसून घातक पातळीपर्यंत पोहोचला आहे. आधीच वायूप्रदूषण अधिक असलेल्या मुंबईत दिवाळीच्या दिवसांत अस्थमा रूग्णांना राहणे मुश्कील होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक