शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

श्वसनाच्या रुग्णांमध्ये 40 टक्के वाढ, टॉवर संस्कृतीमध्ये उंचावर राहणा-यांना होतो सर्वाधिक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 04:08 IST

दिवाळीत उडवण्यात येणा-या फटाक्यांमधील विषारी घटकांमुळे श्वसनाच्या विकारांत व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ झाली असून ही वाढ सुमारे ३० ते ४० टक्के असल्याची माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी दिली.

राजू काळे भाईंदर : दिवाळीत उडवण्यात येणा-या फटाक्यांमधील विषारी घटकांमुळे श्वसनाच्या विकारांत व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ झाली असून ही वाढ सुमारे ३० ते ४० टक्के असल्याची माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी दिली.दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती व त्यांनतर महाराष्ट्रात सुद्धा निवासी संकुलामध्ये फटाके विक्रीला न्यायालयाने बंदी घातली होती. तरीही लक्ष्मी पूजनाच्या व पाडव्याच्या आतषबाजीनंतर मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील वायू प्रदूषणात मोठी भर पडली आहे. या महानगरांमधील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट पातळीपर्यंत घसरली आहे. दिल्लीमध्ये गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुराची एवढी गडद चादर पसरली की तेथील शाळांना सुटी देणे भाग झाले होते. फटाके फोडल्यानंतर त्यातून सल्फरडाय आॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बनडाय आॅक्साईड आणि नायट्रेस गॅसेस बाहेर पडतात. त्याचा सर्वाधिक त्रास अस्थमाच्या रुग्णांना होतो. लहान मुले, वृद्ध यांना श्वसनाचे आजार होतात.दिवाळीच्या दिवसांत व त्यानंतर दोन दिवसांत श्वसनाच्या विकारांचे ३० ते ४० टक्के नवे रूग्ण येतात. ज्यांना पूर्वी कधीही अस्थमा किंवा श्वसनचा त्रास नव्हता. लहान मुलांची फुफुसे छोटी असल्याने त्यांना फटाक्यांच्या धुराचा अधिक त्रास होतो. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. चेकर यांनी सांगितले की, फटाक्यांमधील विषारी घटक असतात. ती धूराच्या स्वरुपात हवेत बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाच्या व अस्थमाच्या पेशंटमध्ये वाढ होते.मुंबई व ठाणे या शहरांचा विचार करता काळाच्या ओघात येथील चाळ संस्कृती नष्ट होऊन उंचच उंच टॉवर संस्कृती उदयास आली आहे. या उंच इमारतींमध्ये राहणाºयांना फटाक्यांच्या धुराचा अधिक त्रास होतो. कारण फटाक्यांमुळे हवेत सोडले जाणारे विषारी घटक जमिनीपासून ५०० ते हजार फुटावर तरंगत राहतात. त्यामुळे टॉवरमधील ज्येष्ठ तसेच लहान मुलांना श्वसनाचा त्रास होतो.>मालाडमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषणकेंद्र सरकारच्या ‘सफर’ या वायू प्रदूषण मोजणाºया संस्थेच्या या वर्षीच्या अहवालानुसार मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांचे प्रदूषण कमालीचे वाढले असून प्रदूषित वायूंची तसेच ‘पर्टिक्युलेट मॅटर’ म्हणजेच घनरूप दूषित कणांची उपस्थिती धोक्याच्या पातळीवर दाखवली आहे. सफरच्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड भागात शहरातील सर्वाधिक वायू प्रदूषण आहे. या उपनगरातील हवेचा दर्जा केवळ खालवलाच नसून घातक पातळीपर्यंत पोहोचला आहे. आधीच वायूप्रदूषण अधिक असलेल्या मुंबईत दिवाळीच्या दिवसांत अस्थमा रूग्णांना राहणे मुश्कील होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक