शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रेंटलची नवीन घरे एमएमआरडीएच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:54 IST

धोकादायक अथवा रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन पालिका रेंटल हाउसिंगमध्ये करत आहे. त्यानुसार, पालिकेला आतापर्यंत सुमारे ४ हजार घरांचा ताबा मिळाला आहे.

ठाणे : धोकादायक अथवा रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन पालिका रेंटल हाउसिंगमध्ये करत आहे. त्यानुसार, पालिकेला आतापर्यंत सुमारे ४ हजार घरांचा ताबा मिळाला आहे. परंतु, या योजनेतील उर्वरित घरे यापुढे पालिकेला न देता एमएमआरडीएच्या माध्यमातून त्यांचे नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे महापालिकेची पुनर्वसनाची वाट पालिकेची बिकट होणार आहे.तत्कालीन लोकशाही आघाडी सरकारच्या काळात वाढीव एफएसआयच्या मोबदल्यात रेंटलची घरे उभारण्याची स्किम मंजूर झाली. त्यानुसार, २००७ मध्ये एमएमआरडीएने रेंटल हाउसिंगची योजना आखली. याअंतर्गत ठाणे शहरात १२ प्रकल्पांना मंजुरी मिळाली. त्यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले असून ३ हजार ४०० घरे बांधकाम व्यावसायिकांनी हस्तांतरित केली आहेत. १६० चौरस फुटांची ही घरे आहेत. शहरी भागातील गरिबांना पक्की घरे विकत घेणे शक्य नसल्याने त्यांना ती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली जाणार होती. मात्र, प्रत्यक्षात धोकादायक इमारतींमधील, रस्ता रुंदीकरणात बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पालिकेने या घरांमध्ये केले. योजनेच्या मूळ आराखड्यानुसार भाडेतत्त्वावर जी घरे उपलब्ध होणार होती, ती एमएमआरडीएच्या माध्यमातून वितरित केली जाणार होती. त्यावर, पालिकेचा कोणताही हक्क नव्हता. मात्र, ठाण्यातील धोकादायक इमारत कोसळल्यानंतर २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तेथील रहिवाशांना रेंटल हाउसिंगची घरे उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली. त्यानंतर, पालिकेने अनेक धोकादायक इमारतींमधील आणि रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्यांचे स्थलांतर या घरांमध्ये केले. मात्र, यापुढे पालिकेला ही घरे हस्तांतरित करायची नाही, असा सूर एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी आळवला आहे. पालिकेने ज्या पद्धतीने विस्थापितांना ही घरे दिली आहेत, त्याच धर्तीवर एमएमआरडीएच्या प्रकल्पबाधितांना ती मिळवून देण्याचा या अधिकाºयांचा मानस आहे.