शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

गावदेवीतच पुनर्वसन करा

By admin | Updated: May 16, 2017 00:14 IST

रस्ता रुंदीकरणानंतर गावदेवी भागात महापालिकेने पुनर्वसन केलेल्या २८ गाळ््यांवर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बेकायदा हातोडा टाकल्याने आमच्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रस्ता रुंदीकरणानंतर गावदेवी भागात महापालिकेने पुनर्वसन केलेल्या २८ गाळ््यांवर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बेकायदा हातोडा टाकल्याने आमच्यावर अन्याय झाला असून आमचे त्याच जागी पुनर्वसन करा. अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात आम्ही दाद मागू, असा इशारा या गाळेधारकांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली महापौर मीनाक्षी शिंदे यांनी भेट घेऊन दिला.गाळेधारकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, फेरीवाल्यांवरील कारवाईला आमचा विरोध नाही. मात्र अधिकृत गाळेधारकांच्या विरोधात अशा पद्धतीने सूडबुद्धीने कारवाई करणे चुकीचे आहे. तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी रस्ता रुंदीकरण करताना गाळेधारकांना गावदेवी येथे जागा दिल्या होत्या. परंतु, अचानक त्यांच्यावर कारवाई केल्याने २८ गाळेधारकांच्या कुटुंबातील सुमारे १०० लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे. महापालिकेने स्वखर्चाने आमचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी गाळेधारकांनी केली. यासंदर्भात लागलीच शहर विकास विभागाचे अधिकारी प्रदीप गोईल यांना पाचारण करण्यात आले असता, त्यांनी सांगितले की, त्यांचे पुनर्वसन त्या ठिकाणी करता येणे शक्य नाही, कारण हा डीपी रस्ता असून जलकुंभासाठीच तो राखीव आहे. त्यामुळे व्यापारी आणि राष्ट्रवादीचे नेते परांजपे संतप्त झाले. ज्यावेळी डीपी प्लान तयार झाला त्यावेळी हा आक्षेप का घेतला नाही. डीपी प्लाननुसार रस्ता रुंदीकरण करताना ही बाब पालिकेच्या निदर्शनास आलीच असेल, असे असताना मग त्यावेळी महापालिकेकडून अनधिकृतपणे पुनर्वसन झाले कसे, असा सवाल गाळेधारकांनी केला. पालिकेने पुनर्वसनास परवानगी देणारा ठराव महासभेत मंजूर केल्यानंतर हे गाळे आम्हाला दिले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यदाकदाचित पुनर्वसन बेकायदा झाले असेल तरीही या गाळ्यांवर कारवाई करण्यापूर्वी तसा प्रस्ताव पुन्हा महासभेसमोर आणणे गरजेचे होते, असे मत यावेळी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले. जलकुंभ असल्याने त्या ठिकाणी गाळे देता येऊ शकत नाहीत. मग, पालिकेने सिद्धेश्वर तलाव येथील जलकुंभाच्या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणाचे कार्यालये, खारेगावात पार्किंगच्या जागेच्या आरक्षणावर एसटीपी प्लांट उभारला कसा, असे सवाल या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केले आहेत. त्यामुळे पालिकेने ही कारवाई केवळ सूडबुद्धीने केली असून ही केवळ एक स्टंटबाजी असल्याचा आरोप मिलिंद पाटील यांनी केला. त्यामुळे याचा आम्ही निषेध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. या गाळेधारकांचे पुनर्वसन झाले नाही, तर पालिकेविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.फेरीवाल्यांवर कारवाई करताना कायदा हातात घेणे चुकीचे असून पालिका आयुक्तांना हे शोभत नसल्याची भावनादेखील त्यांनी या वेळी व्यक्त केली. त्यामुळे ज्यांना मारहाण झाली असेल, त्यांनी पुढे यावे आणि पालिकेच्या या कारवाईविरोधात न्यायालयाकडे दाद मागावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. यामुळे हे प्रकरण चिघळण्याची चिन्हे आहेत.मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत अनेकांना मारहाण झाली, गावदेवी येथील पुनर्वसन केलेले गाळे पालिकेने तोडले. पोलीस तक्रार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे याविरोधात २० मे च्या महासभेत विरोधक आक्रमक होणार असून त्या गाळेधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्यासाठी आग्रही मागणी करणार आहेत.