शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणासाठी पक्षभेद विसरून एकत्र या, आव्हाडांची पालकमंत्र्यांसह आमदारांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 01:13 IST

ठाण्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात भविष्यात ठाणेकरांचे आणखी हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाणे - ठाण्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात भविष्यात ठाणेकरांचे आणखी हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षभिनिवेश बाजूला सारून ठाण्यासाठी मंजूर झालेले शाई धरण मार्गी लावूया अशी साद राष्टÑवादीचे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील इतर तिन्ही आमदारांना घातली आहे. त्यामुळे आता किती आमदार त्यांच्या या हाकेला ओ देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.या संदर्भात त्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर आणि सुभाष भोईर यांना एक पत्र लिहिले असून त्याच्या माध्यमातून ही साद घातली आहे. ठाण्यात पाण्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. हिरानंदानी मेडोजसारख्या सर्वात महागड्या गृहसंकुलांनासुद्धा टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आज घोडबंदरचा पट्टा हा पाण्यावाचून त्रस्त आहे. जी परिस्थिती घोडबंदरला आहे तीच परिस्थिती दिवा, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट या परिसरामध्ये आहे. काही ठिकाणी ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमधून थेट पाणीजोडणी घेऊन दादागिरी करून काही विभागामध्ये पाणी दिले जाते. परंतु, या सगळ्याचा परिणाम हा पाणीवितरणावर होतो आणि अख्ख्या ठाणेकरांना त्याचे भोग भोगावे लागत आहेत.पाणीवितरणात ३५ वर्षांत महापालिकेने काहीच केले नाहीगेल्या २५ ते ३० वर्षांमध्ये पाणीवितरणाबाबत धाडसाने महानगरपालिकेने काम केले असे काहीच दिसत नाही. पण, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपले स्वतंत्र स्त्रोत्र नसल्यामुळे एमआयडीसीमध्ये होणारे शटडाऊन आणि स्टेमचा होणारा शटडाऊन यामुळे अनेकवेळा ४-४ दिवस विविध भागांमध्ये पाणी नसल्याचे आढळून आले आहे. खरतर आतापर्यंत आपण आपले स्वत:च स्त्रोत्र म्हणजेच एक धरण उभे करायला हवे होते. पण, दुर्देवाने ते घडू शकले नसल्याची खंतही त्यांनी यात व्यक्त केली आहे. परंतु, यामध्ये आता कुठल्या पक्षाला दोष मात्र त्यांनी दिलेला नाही. सध्याची ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज ही परिस्थिती पाहता आणि गेल्या ५ वर्षांचा अनुभव पाहता पावसाळाही हळूहळू पुढे सरकत चालला आहे. पूर्वी जूनच्या ७ तारखेला येणारा पाऊस आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरूहोत आहे. उन्हाळा जो पहिला एप्रिल मध्ये सुरु व्हायचा तो आता फेब्रुवारी-मार्च मध्ये सुरू होतो. त्यामुळे पाऊसही कमी पडत आहे. त्यामुळे येणाºया काळात आपल्याला अधिक पाणीतुटवड्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आपले स्वतंत्र धरण असणे फार गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका आणि शासनाची मदत घेऊन जे शाई धरण २००३ साली मंजूर केले होते. त्या धरणाबाबत अंतिम भूमिका घेऊन त्याच्या बांधकामाला सुरुवात करूया अशी साद त्यांनी या पत्राच्या माध्यमातून घातली आहे. राजकारण बाजूला ठेवूयात आणि आपल्या ठाण्याचा पाणी प्रश्न हा कायमचा सोडवूया, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेwater scarcityपाणी टंचाई