शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

धोकादायक इमारतींचा ठाण्यात पुनर्विकास रखडला; आयुक्तांनी ठोस निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:29 IST

रहिवाशांचे जीव मुठीत घेऊन वास्तव्य

ठाणे : ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला असून लाखो रहिवासी ठोस निर्णयाअभावी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. ऐन पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडल्यास रहिवाशांना जीवित आणि वित्तहानीला सामोरे जावे लागते. टीडीआरचा फायदाही इमारतींना होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. या संपूर्ण प्रकरणात पुनर्विकासाची प्रक्रिया तातडीने करण्यासाठी पालिका आयुक्तांनी ठोस निर्णय घेऊन लाखो ठाणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्त विपिन शर्मा यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, इमारत धोकादायक आहे किंवा नाही याचा निर्णय घेणाऱ्या समितीची नोव्हेंबर २०१९ पासून बैठकच झालेली नाही. त्यामुळे इमारतींना धोकादायक घोषित करण्यातही दिरंगाई होत आहे. ठाणे शहरात बºयाच ठिकाणी नऊ मीटरपेक्षा कमी रुं दीचे रस्ते असल्याने महापालिकेने ठराव केला. या ठरावाद्वारे पुनर्विकास अडू नये म्हणून मार्च २०२० मध्ये हे रस्ते नऊ मीटरचे दर्शवून विकास योजना रस्ता म्हणून समाविष्ट करण्यासाठी हा ठराव शासनाकडे पाठविला आहे.

आयुक्तांनी याबाबत पाठपुरावा करावा तसेच पुणे महानगरपालिकेप्रमाणे ठाण्यातही नऊ मीटरपेक्षा अरुंद रस्त्यांवर आवश्यक क्षेत्राचे पालिकेला हस्तांतर केल्यावर टीडीआरचा फायदा इमारतींना होण्यासाठी प्रयत्न करावा. महापालिकेने २९ मे २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या यादीनंतर अनेक इमारतींमधील रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले आहे की, इमारत धोकादायक घोषित करणाºया समितीची गेल्या नऊ महिन्यांमध्ये बैठकच न झाल्यामुळे यातील इमारतींची घोषणा करण्यात दिरंगाई होते. त्यामुळे धोकादायक इमारतींना जे प्रोत्साहनपर चटईक्षेत्र मिळते, तेही मिळण्यात अडचणी निर्माण होतात. पर्यायाने पुनर्विकासही रखडतो आणि रहिवासी इमारत रिकामी करण्यास नकार देतात. हे रहिवासीही अशा इमारतींमध्ये नाइलाजाने राहतात. त्यामुळेच आयुक्तांनी निर्णय घेऊन धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी केळकर यांनी केली आहे.

ठाण्यातील ४४ इमारतींवर होणार कारवाई

च्ऐन पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यात येत आहेत. सध्या ७९ पैकी ३५ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी इमारती रिक्त केल्या असून ४४ इमारतींवर काही दिवसांमध्ये कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

च्यंदा सर्वेक्षणामध्ये ठामपाच्या क्षेत्रातील नऊ प्रभाग समित्यांमधील सुमारे चार हजार ३०० धोकादायक इमारतींची यादी आहे. त्यामध्ये अतिधोकादायक ७९ इमारतींचा समावेश आहे. त्यापैकी ३५ इमारती रिक्त केल्या आहेत. उर्वरित इमारतीही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे