शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

धोकादायक इमारतींचा ठाण्यात पुनर्विकास रखडला; आयुक्तांनी ठोस निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:29 IST

रहिवाशांचे जीव मुठीत घेऊन वास्तव्य

ठाणे : ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला असून लाखो रहिवासी ठोस निर्णयाअभावी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. ऐन पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडल्यास रहिवाशांना जीवित आणि वित्तहानीला सामोरे जावे लागते. टीडीआरचा फायदाही इमारतींना होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. या संपूर्ण प्रकरणात पुनर्विकासाची प्रक्रिया तातडीने करण्यासाठी पालिका आयुक्तांनी ठोस निर्णय घेऊन लाखो ठाणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्त विपिन शर्मा यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, इमारत धोकादायक आहे किंवा नाही याचा निर्णय घेणाऱ्या समितीची नोव्हेंबर २०१९ पासून बैठकच झालेली नाही. त्यामुळे इमारतींना धोकादायक घोषित करण्यातही दिरंगाई होत आहे. ठाणे शहरात बºयाच ठिकाणी नऊ मीटरपेक्षा कमी रुं दीचे रस्ते असल्याने महापालिकेने ठराव केला. या ठरावाद्वारे पुनर्विकास अडू नये म्हणून मार्च २०२० मध्ये हे रस्ते नऊ मीटरचे दर्शवून विकास योजना रस्ता म्हणून समाविष्ट करण्यासाठी हा ठराव शासनाकडे पाठविला आहे.

आयुक्तांनी याबाबत पाठपुरावा करावा तसेच पुणे महानगरपालिकेप्रमाणे ठाण्यातही नऊ मीटरपेक्षा अरुंद रस्त्यांवर आवश्यक क्षेत्राचे पालिकेला हस्तांतर केल्यावर टीडीआरचा फायदा इमारतींना होण्यासाठी प्रयत्न करावा. महापालिकेने २९ मे २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या यादीनंतर अनेक इमारतींमधील रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले आहे की, इमारत धोकादायक घोषित करणाºया समितीची गेल्या नऊ महिन्यांमध्ये बैठकच न झाल्यामुळे यातील इमारतींची घोषणा करण्यात दिरंगाई होते. त्यामुळे धोकादायक इमारतींना जे प्रोत्साहनपर चटईक्षेत्र मिळते, तेही मिळण्यात अडचणी निर्माण होतात. पर्यायाने पुनर्विकासही रखडतो आणि रहिवासी इमारत रिकामी करण्यास नकार देतात. हे रहिवासीही अशा इमारतींमध्ये नाइलाजाने राहतात. त्यामुळेच आयुक्तांनी निर्णय घेऊन धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी केळकर यांनी केली आहे.

ठाण्यातील ४४ इमारतींवर होणार कारवाई

च्ऐन पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यात येत आहेत. सध्या ७९ पैकी ३५ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी इमारती रिक्त केल्या असून ४४ इमारतींवर काही दिवसांमध्ये कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

च्यंदा सर्वेक्षणामध्ये ठामपाच्या क्षेत्रातील नऊ प्रभाग समित्यांमधील सुमारे चार हजार ३०० धोकादायक इमारतींची यादी आहे. त्यामध्ये अतिधोकादायक ७९ इमारतींचा समावेश आहे. त्यापैकी ३५ इमारती रिक्त केल्या आहेत. उर्वरित इमारतीही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे