शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

हॉटेल, बार यांना अग्निशमन दलाच्या नाहरकत दाखल्यासाठी मुदतवाढ देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा - मनविसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:18 IST

हॉटेल, बार यांना अग्निशमन दलाच्या नाहरकत दाखल्यासाठी मुदतवाढ देण्याच्या निर्णयाचा महापालिका आयुक्तांनी फेरविचार करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्य ठाणेकरांचे हित जपावे - मनविसेहुक्का पार्लर विरोधात मनसे पध्दतीने तीव्र आंदोलन उभारेल - संदीप पाचंगे१५ दिवसांत कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याचे पालकत्व पालकमंत्री स्वीकारतील का? - मनविसे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: शहरातील ४५८ हॉटेल्स, लाँज, बार व तत्सम ऐषोआरामी सुविधा पुरविणाºया आस्थापनांचा ठाणेकºयांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही अवघ्या काही तासांतच अग्निसुरक्षेच्या दाखल्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ महापालिकेने दिली आहे. तसेच, या मुदतवाढीत दुर्घटना घडून जिवीत अथवा वित्तहानी झाल्यास याला सर्वस्वी आयुक्त जबाबदारी असतील त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करून त्यांनी सर्वसामान्य ठाणेकरांचे हित जपावे अशी मागणी मनविसेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील दुर्दैवी दुर्घटनेत अनेकांचा बळी गेल्यानंतर तेथील प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यानंतर सर्वच ठिकाणच्या अग्नी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला ठाणे महापालिकेनेही काही महत्त्वाची पाऊले उचलल्याचे दिसत असुन मनपा आयुक्त म्हणून त्यांनी कारवाईचा आव देखील आणल्याचे वाचनात आले असा आरोप मनविसेचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे. मुंबईत घडलेल्या दुर्घटनेआधी मनसेच्या तेथील पदाधिकाºयांनी प्रशासनाला सुचिवले होते. त्याचप्रमाणे ठाण्यात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून आयुक्तांनी याचा गांभीर्याने विचार करावा व निर्भीडपणे संबंधितांवर कठोर कारवाई करावी. मुंबईच्या आयुक्तांना राजकीय नेत्यांकडून दबाव येत आहे असे त्यांनी सांगितले तसा दबाव ठाण्यातून आयुक्तांवर आला की काय ज्यामुळे डॅशिंग, आक्र मक प्रतिमा असलेले आमचे आयुक्त नरमले, रिक्षाचालकांची अवैध पार्किंग करणारºयांची कॉलर पकडण्याची हिंमत दाखवलीत तशीच धनदांगडयांविरूध्द कारवाई करताना दाखवावीत हि अपेक्षा. सर्वसामान्य ठाणेकरांना तुम्हाला माघार घेताना पहाण्याची सवय नाही असा टोलाही पाचंगे यांनी हाणला आहे. ठाणे शहराच्या प्रथम नागरिक (महापौर) तुम्हाला हुक्का पार्लरवर तसेच अनधिकृत हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही आपण कोणाच्या दबावाने कारवाई करण्याचे थांबविले आहे. येत्या १५ दिवसांत कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याचे पालकत्व पालकमंत्री स्वीकारतील का? असा सवाल करीत अग्निशमन दलाचा ज्यांच्याकडे दाखला नाही अशा हॉटेल व्यावसायिकांना जोपर्यंत नाहरकत दाखला मिळत नाही तोपर्यंत फक्त पदार्थ शिजवून पार्सल देण्याची मुभा द्यावी असे मनविसेने सुचित केले आहे. मुंबईतील दुर्घटनेच्या हुक्का हेच मुख्य कारण होते. हुक्का पार्लर मुळे कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याची वाट लावून घेत आहेत. आपण ८ दिवसांत सर्व हुक्का पार्लर वर बंदी आणावी अन्यथा महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेना हुक्का पार्लर विरोधात मनसे पध्दतीने तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा पाचंगे यांनी दिला आहे. हुक्का पार्लर व मनसे कार्यकर्ते यांच्यात होणाºया संघर्षास सर्वतोपरी आपण जबाबदार असाल असेही ते आपल्या निवेदनात शेवटी म्हणाले आहेत. यावेळी किरण पाटील, प्रमोद पत्ताडे, संदिप चव्हाण, प्रसाद होडे, पंकज कोळसकर, संदीप शेळके  उपस्थित होते.

 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेMumbaiमुंबई