शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 2:19 PM

कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे. त्यामुळे पादचारी व रेल्वे प्रवाशांना मार्गक्रमण करणो गैरसोयीचे होत आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे. त्यामुळे पादचारी व रेल्वे प्रवाशांना मार्गक्रमण करणो गैरसोयीचे होत आहे. या प्रकरणी मनसेच्या पदाधिका-यांनी आज आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेऊन फेरीवाल्यांना स्टेशन परिसरातून हटविण्याची मागणी केली. 

मनसेचे नेते राजू पाटील यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, माजी आमदार प्रकाश भोईर, विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, गटनेते प्रकाश भोईर, पदाधिकारी हर्षद पाटील, राहूल कामत आदींनी आयुक्त वेलरासू यांची भेट घेतली. एल्फीस्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पूलावर झालेल्या दुर्घटनेपश्चात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई नगरातील सर्व रेल्वे स्थानकातील फेरीवाले हटविले नाही तर मनसे आंदोलन करणार असा इशारा देत मुंबईत भव्य मोर्चा काढला होता. 

त्यानंतर स्टेशन परीसरातील फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरु होती. फेरीवाल्यांना चांगलाच चेप बसला होता. मनसेच्या आंदोलनाची दखल स्थानिक स्वराज्य संस्था, रेल्वे प्रशासन व पोलिसांना घ्यावी लागली होती. ठाणो येथे पार पडलेल्या ठाकरे यांच्या जाहिर सभेत फेरीवाल्यांच्या कारवाईचा पुनर्उच्चर ठाकरे यांनी केला होता. दरम्यान त्यांनी मागच्या महिन्यात आयुक्त वेलरासू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन फेरीवाले हटविण्याची मागणी केली होती. त्यावेळी आयुक्तांनी रेल्वे प्रशासनाशी आमचे बोलणो सुरु असून कारवाई सुरु असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाई थंडावली आहे. 

रेल्वे पादचारी पूलावर व स्टेशन परिसरात काही प्रमाणात फेरीवाले पुन्हा बसू लागले आहे. कारवाईची पकड ढिल्ली झाल्याने मनसेचे पदाधिका:यांनी आयुक्तांची भेट घेऊन फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई थंड का झाली आहे असा सवाल उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी येत्या मंगळवारी पोलिस प्रशासनासोबत फेरीवाला कारवाई संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर काय कारवाई केली जाईल हे सांगून असे आयुक्तांनी मनसे पदाधिका-यांना सांगितले. 

मनसे मंगळवारपर्यंत धीर धरण्याची तयारी ठेवली आहे. मंगळवारी आयुक्तांकडून काय सांगितले जाते. त्यानंतर मनसे आंदोलन करणार हे मात्र निश्चीत असल्याचे पदाधिका:यांनी सांगितले. हे आंदोलन खळखट्टय़ाकचेच असणार आहे. आयुक्तांनी दिलेली मंगळवारची डेडलाईन व मनसेही मंगळवार्पयतच वाट पाहिली जाणार आहे असे स्पष्ट केले आहे. 

फेरीवाला प्रकरणी मनसेकडून प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. स्टेशन परिसरात विशिष्ट अंतर सोडले तर त्याच्या आत फेरीवाला नसावा. हा न्यायालयाचा आदेश आहे. या आदेशाची अवमानना महापालिका व रेल्वे प्रशासनाकडूनच केली जात आहे. न्यायालयाच्या अवमानतेप्रकरणी ही याचिकाही मंगळवारनंतरच दाखल करण्यात येईल असे मनसेकडून सांगण्यत आले आहे.