शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पालघरच्या परीक्षेत चव्हाण नापास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 01:21 IST

पुन्हा होणार का मंत्री?; ठाण्याचे पालकमंत्री म्हणून नाईकांची वर्णी लागण्याची चर्चा

- मुरलीधर भवार कल्याण : डोंबिवली मतदारसंघातून भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी यावेळी हॅट्ट्रिक केली. आधीच्या युती सरकारने चव्हाण यांना रायगड आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले होते. याशिवाय, पक्षाने अनेक जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर दिल्या होत्या.

निवडणुकीत त्यांनी ठाणे व रायगड जिल्ह्यांत चांगली कामगिरी केली. मात्र, पालघर जिल्ह्यात त्यांना अपयश मिळाले आहे. पालघरमध्ये एकही जागा भाजपला न मिळाल्याने पक्षाकडून चव्हाण यांना कदाचित पुन्हा मंत्रीपद दिलेही जाईल; मात्र त्यातून पालघरची जबाबदारी वगळली जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपमधून निवडून आलेले गणेश नाईक यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले जाण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या १८ पैकी आठ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. याशिवाय, मीरा-भार्इंदरमधून अपक्ष निवडून आलेल्या गीता जैन यांचा भाजपला पाठिंबा मिळेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपच्या खात्यात जिल्ह्यातील नऊ जागांची मोजणी केली जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेच्या जागा मात्र कमी झालेल्या आहेत. शिवसेनेला पाच जणांवर विजय मिळवता आला. उर्वरित चार जागा अन्य पक्षांना मिळालेल्या आहेत. त्यामध्ये मनसे, समाजवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. त्यापैकी मनसे, समाजवादी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भाजप-शिवसेनेला समर्थन देण्याची शक्यता कमी आहे. भाजपच्या यशामध्ये रवींद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुराही चव्हाण यांच्या खांद्यावर होती. त्याठिकाणी शिवसेनेला तीन, भाजपला दोन जागांवर विजय मिळाला. याशिवाय, एक भाजपचा बंडखोर उमेदवारही निवडून आला आहे. या जिल्ह्यातील एक जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. सातपैकी एक अपक्ष धरून भाजपला तीन जागा मिळालेल्या आहे. ठाण्यातील नऊ आणि रायगडमधील तीन जागांची बेरीज केल्यास भाजपच्या खात्यात १२ जागा आहेत. पालघर जिल्ह्यातही चव्हाण यांनी मेहनत घेतली. मात्र, तेथील दोन्ही जागांवर भाजपला पराभव सहन करावा लागला. तळकोकणातही चव्हाण यांनी मेहनत घेतली. आमदार, राज्यमंत्री आणि दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदासह कोकण प्रांताची पक्षाची जबाबदारीही त्यांच्यावरच होती. उमेदवारांच्या मुलाखती घेणे, प्रचाराची रणनीती आखणे, प्रचारसभा आणि बैठका घेण्यासाठी चव्हाण यांनी दिवसरात्र एक केले.

२०१४ साली पार पडलेल्या निवडणुकीनंतर चव्हाण यांच्या मंत्रीपदाची चर्चा सुरू झाली. बºयाच उशिरा त्यांच्या नावापुढे राज्यमंत्रीपद लागले. त्यावेळी त्यांना कोणते खाते देणार, याची सुस्पष्टता नव्हती. पुढे त्यांना वैद्यकीय शिक्षण, बंदरे विकास, शिधावाटप आदी विविध खात्यांचे राज्यमंत्रीपद दिले गेले. त्यानंतर, त्यांनी कामांचा सपाटा सुरू करत, कोकणातील अनेक नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळवून दिले. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात ते सेफ असल्याने त्यांचे मंत्रीपद कायम ठेवले जाईल. मात्र, पालघरमधील अपयशामुळे तेथील जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते. त्यांची बढती केली जाऊ शकते, आहे त्याच पदावर त्यांना कायम ठेवले जाऊ शकते किंवा दुसरे खाते दिले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

दरम्यान, राष्ट्रवादीतून निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेले गणेश नाईक हे ऐरोलीतून निवडून आले आहेत. आघाडी सरकारच्या काळात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांनी १० वर्षे भूषविले. त्यामुळे शिंदे यांच्या वाट्याला ही जबाबदारी पुन्हा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. ठाणे जिल्हा हा पक्षाचा बालेकिल्ला असल्याने, शिवसेना आपला हक्क सोडणार नाही. त्यामुळे पालकमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा रस्सीखेच होऊ शकते.

कथोरे यांना मंत्रीपद मिळणार का?

मुरबाड मतदारसंघातून भाजपतर्फे दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार किसन कथोरे यांनी विक्रमी मताधिक्य मिळविले आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली होती. मुरबाड मतदारसंघातून भाजपतर्फे दुसºयांदा निवडून आलेले आमदार किसन कथोरे यांनी विक्रमी मताधिक्य मिळविले आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली होती. ते दोनवेळा अंबरनाथ मतदारसंघातून, तर दोनवेळा मुरबाड मतदारसंघातून निवडून आले. त्याआधी त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले होते. आघाडी सरकारच्या काळात त्यांना मंत्रीपद दिले गेले नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019palgharपालघरRaigadरायगडBJPभाजपा