शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मोडकसागर, तानसा धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 4:43 AM

मुंबईची पाणीचिंता मिटणार; धरणकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारीही जोर कायम राहिला. यामुळे जिल्ह्यातील बारवी धरणासह मोडकसागर, तानसा धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे या धरणांखालील गावांना ती भरण्याआधीच सावधानतेचा इशारा दिला आहे. यात मोडकसागरच्या काठावरील ४२ गावांचा समावेश आहे. पाणीसाठा वाढल्याने मुंबईची चिंता मिटण्याच्या मार्गावर आहे.जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, एमआयडीसी, गावपाड्यांना या बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणाच्या पाण्याची पातळी शुक्रवारी ६८ मीटर असून यंदा स्वयंचलित गेट बंद करून ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणी धरणात साठवण्यात येणार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच त्यातील पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. यामुळे पिंपळोली, चांदप, दहागाव, चोन, कोऱ्याचापाडा, तारण, अस्नोली या बारवी नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.या धरणात २४ तासांत २१४ मिमी पाऊस पडला आहे. या धरणातील खानिवरे, कान्होळ, पाटणपाड हे पाणलोट क्षेत्र मिळून पडलेल्या या पावसाची सरासरी ४८ मिमी नोंद झाली आहे. सध्या त्याची पाणीपातळी ६८ मीटर असून ६३.२८ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो ९९.१८ टक्के होता. आंध्रात काही दिवसांच्या तुलनेत बºययापैकी ७४ मिमी, भातसा ७६ मिमी, तर मोडकसागरमध्ये ८९, तानसात ५० मिमी, मध्य वैतरणात ९० मिमी पाऊस पडला आहे.जिल्ह्यातील पाऊसजिल्ह्यात शुक्रवारी सरासरी अवघा ३१ मिमी पाऊस गेल्या २४ तासांत पडल्याची नोंद झाली आहे. यापैकी ठाणे परिसरात ३८ मिमी, कल्याणला १५, मुरबाड २५, भिवंडीला ३१, शहापूरला ४६, उल्हासनगर २८ आणि अंबरनाथला २७ मिमी पाऊस पडला आहे.मोडकसागर-तानसाची आजची स्थितीमोडकसागर धरणाची पाणीपातळी शुक्रवारी १२ वाजता १५९.६७ मीटर असून ते भरून वाहण्याची पातळी १६३.१५ मीटर आहे. पाऊस पाहता ते कधीही ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. यामुळे वैतरणा नदीकाठावरील ४२ गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. यामध्ये दाधारे, जोशीपाडा, कळंबे, शेले, तिळसे, पोपरोली, धिंडेपाडा, अनशेत, गाले, तुसे, सारशी, गंधारे, कोयना वसाहत, गेट्स, शीळ,अब्जे अलमन, कुतल, बोरंदे, आवंदेध, नाने, गलतरे, हमरापूर ही सर्व २४ गावपाडे वाडा तालुक्यातील आहेत. तर, पालघर तालुक्यातील १८ गावे या वैतरणा नदीकाठावर आहेत. तर, तानसा धरण १२५.९६ मीटर भरले असून ते ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.