शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ, नद्या ओव्हर फ्लो, सतर्कतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 4:38 AM

जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणीसाठा वाढला.

ठाणे : जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणीसाठा वाढला. मोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्याचे दोन दरवाजे उघडले असून, तानसाही भरण्याच्या स्थितीत आहे. ९१.५५ टक्के पाणीसाठा तयार झाला. रात्रभरात ते भरण्याची शक्यता आहे. जिल्हाभरात सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस पडला असून, नद्या ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर असल्याने सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.भातसामध्ये रविवारी केवळ ५८ टक्के पाणीसाठाहोता. तो सोमवारी ६४ टक्के झाला. बारवी धरण भरण्यासाठी केवळ दीड मीटर पातळी बाकी आहे. रात्रभर पाऊस सुरू राहिल्यास ते भरण्याची शक्यता आहे. उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणात रात्रभरात चार टक्के साठा वाढला आहे. बदलापूर बंधारा धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे. तर मोहने बंधाºयाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.>विहार तलाव भरलामुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलाव क्षेत्रावर पावसाची कृपादृष्टी कायम आहे़ यामुळे गेल्या दोन दिवसांत तब्बल सव्वादोन लाख दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला आहे़ तुळशी, मोडकसागर पाठोपाठ सोमवारी सकाळी विहार तलावही भरून वाहू लागला़ तर तानसा तलावही लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे़विहार तलावातून रोज मुंबईला ११० दशलक्ष लीटर जलसाठा होतो़ शनिवारी तलावांमध्ये सात लाख दशलक्ष लीटर साठा होता़ यात वाढ होऊन नऊ लाख ३४ हजार दशलक्ष लीटर साठा झाला़ वर्षभर आवश्यक साठ्यापैकी ६४ टक्के साठा तलावांत आहे.>कल्याण-नगर मार्ग बंदउल्हास नदीला पूर आलेला आहे. यामुळे कल्याण-अहमदनगर रस्त्यावरील रायता पुलावरून पाणी वाहत आहे. कल्याणच्या बाजूकडे पाण्याची पातळी वाढल्यामुळे या पुलावरून पाणी वाहू लागले. कल्याण-शीळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता पाण्याखाली गेल्याने, कल्याण-मुरबाड-नगर या मार्गावरील वाहतूक खोळंबली. या महामार्गावरील वाहतूक गोवेली, टिटवाळा, आंबिवली आणि शहाड मार्गाने वळविली आहे. आणे व भिसोळ पुलावरून पाणी वाहत असल्याने, तेथील वाहतूकदेखील बंद केली आहे.ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासांत एक हजार ९६.२० मिमी पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी १५६.६० मिमी नोंद घेतली असून, आतापर्यंत ५११.८२ मिमी पाऊस झाला आहे. यात ठाण्यात सरासरीच्या ८३.५५ टक्के, कल्याणमध्ये ७७.१६ टक्के, मुरबाडमध्ये ५९.१८ टक्के, उल्हासनगरमध्ये ७८.१२ टक्के, अंबरनाथमध्ये ७२ टक्के, भिवंडीमध्ये ८५.८४ टक्के आणि शहापूरमध्ये ५६.०२ टक्के पाऊस झाला आहे.

टॅग्स :Damधरण