शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

रेल्वे प्रवाशांचीही साथ महत्त्वाची - राजेंद्र वर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:01 IST

सर्वांच्या प्रयत्नांमुळे मिळाला ठाणे स्थानकास ‘बेस्ट स्टेशन’ पुरस्कार

पंकज रोडेकरठाणे -  १६ एप्रिल रोजी ठाणे-बोरीबंदर सेवेचा १६६ वा वर्धापन दिन ठाण्यात साजरा होत होता. त्यावेळी ठाणे रेल्वेस्थानकाला मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत ए-१ श्रेणीत स्वच्छतेचा ‘बेस्ट स्टेशन’ असा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार तब्बल १५ वर्षांनी पुन्हा ठाण्याला मिळाला आहे. या उपक्रमाबाबत ठाण्याचे स्टेशन डायरेक्टर राजेंद्र वर्मा यांच्याशी साधलेला संवाद.

दिवसेंदिवस वाढत्या प्रवासी संख्येत स्थानकाची स्वच्छता कशी ठेवता?गर्दीच्या वेळेत, म्हणजे सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ६ ते १० या वेळेत विशिष्ट असा काही भाग सोडून स्थानकातील इतर ठिकाणची साफसफाई करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. गर्दीची वेळ निघून गेल्यावर जो परिसर स्वच्छ करण्याचा राहून जातो, तो स्वच्छ करण्यावर विशेष भर दिला जातो. कर्मचाऱ्यांसाठी आता हा नेहमीचाच सरावाचा भाग झाला आहे.

१० फलाट आणि इतर रेल्वे कार्यालयांच्या ठिकाणी साफसफाईसाठी किती जण आहेत?गेल्या काही महिन्यांपूर्वी साफसफाईच्या कामांसाठी रेल्वेने ठेकेदाराची नेमणूक केली आहे. त्यानुसार, १५० कामगारांसह सातआठ प्रकारच्या वेगवेगळ्या मशीनही ठेकेदाराकडे आहेत. त्याद्वारे, तसेच स्थानकातील उपाहारगृहवाल्यांना त्यांच्या उपाहारगृहासमोरील स्वच्छता राखण्याबाबत सूचना केल्या आहेत. ते कमी पडले, तर ठेकेदाराद्वारे साफसफाई सुरूच असते.

स्वच्छ भारत अभियानाचा स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी फायदा होतोय?स्वच्छ भारत अभियानाचा या मोहिमेत निश्चितच फायदा झाला; पण तत्पूर्वीपासून स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे रेल्वे प्रशासनाकडून नियमित प्रयत्न सुरू होते. ठेकेदाराची नेमणूक होण्यापूर्वी स्वच्छता राखण्यासाठी बाहेरून कर्मचारी बोलवले जात होते. आता स्वच्छतेचा ठेका दिल्याने स्थानक जास्त स्वच्छ ठेवले जात आहे.

अ‍ॅवॉर्ड मिळवण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कधीच काम केले नाही; पण ठाणे स्थानकास स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला, याचा आनंद वाटतो. भविष्यातही स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रवाशांनी या मोहिमेसाठी योगदान दिले, तर आपले रेल्वेस्थानक स्वच्छ आणि सुंदर राहील, यात शंका नाही.

‘गो ग्रीन आणि किप क्लीन’ ही संकल्पना ठाणे स्थानकात राबवण्याचे प्रशासनाने प्रयत्न आहेत. यासाठी प्रवाशांची साथ आवश्यक आहे. - राजेंद्र वर्मा

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे