शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांचीही साथ महत्त्वाची - राजेंद्र वर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:01 IST

सर्वांच्या प्रयत्नांमुळे मिळाला ठाणे स्थानकास ‘बेस्ट स्टेशन’ पुरस्कार

पंकज रोडेकरठाणे -  १६ एप्रिल रोजी ठाणे-बोरीबंदर सेवेचा १६६ वा वर्धापन दिन ठाण्यात साजरा होत होता. त्यावेळी ठाणे रेल्वेस्थानकाला मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत ए-१ श्रेणीत स्वच्छतेचा ‘बेस्ट स्टेशन’ असा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार तब्बल १५ वर्षांनी पुन्हा ठाण्याला मिळाला आहे. या उपक्रमाबाबत ठाण्याचे स्टेशन डायरेक्टर राजेंद्र वर्मा यांच्याशी साधलेला संवाद.

दिवसेंदिवस वाढत्या प्रवासी संख्येत स्थानकाची स्वच्छता कशी ठेवता?गर्दीच्या वेळेत, म्हणजे सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ६ ते १० या वेळेत विशिष्ट असा काही भाग सोडून स्थानकातील इतर ठिकाणची साफसफाई करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. गर्दीची वेळ निघून गेल्यावर जो परिसर स्वच्छ करण्याचा राहून जातो, तो स्वच्छ करण्यावर विशेष भर दिला जातो. कर्मचाऱ्यांसाठी आता हा नेहमीचाच सरावाचा भाग झाला आहे.

१० फलाट आणि इतर रेल्वे कार्यालयांच्या ठिकाणी साफसफाईसाठी किती जण आहेत?गेल्या काही महिन्यांपूर्वी साफसफाईच्या कामांसाठी रेल्वेने ठेकेदाराची नेमणूक केली आहे. त्यानुसार, १५० कामगारांसह सातआठ प्रकारच्या वेगवेगळ्या मशीनही ठेकेदाराकडे आहेत. त्याद्वारे, तसेच स्थानकातील उपाहारगृहवाल्यांना त्यांच्या उपाहारगृहासमोरील स्वच्छता राखण्याबाबत सूचना केल्या आहेत. ते कमी पडले, तर ठेकेदाराद्वारे साफसफाई सुरूच असते.

स्वच्छ भारत अभियानाचा स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी फायदा होतोय?स्वच्छ भारत अभियानाचा या मोहिमेत निश्चितच फायदा झाला; पण तत्पूर्वीपासून स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे रेल्वे प्रशासनाकडून नियमित प्रयत्न सुरू होते. ठेकेदाराची नेमणूक होण्यापूर्वी स्वच्छता राखण्यासाठी बाहेरून कर्मचारी बोलवले जात होते. आता स्वच्छतेचा ठेका दिल्याने स्थानक जास्त स्वच्छ ठेवले जात आहे.

अ‍ॅवॉर्ड मिळवण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कधीच काम केले नाही; पण ठाणे स्थानकास स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला, याचा आनंद वाटतो. भविष्यातही स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रवाशांनी या मोहिमेसाठी योगदान दिले, तर आपले रेल्वेस्थानक स्वच्छ आणि सुंदर राहील, यात शंका नाही.

‘गो ग्रीन आणि किप क्लीन’ ही संकल्पना ठाणे स्थानकात राबवण्याचे प्रशासनाने प्रयत्न आहेत. यासाठी प्रवाशांची साथ आवश्यक आहे. - राजेंद्र वर्मा

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे