शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

'मच्छर भगाओ'वाली अगरबत्ती वापरत असाल, तर ही आहे धोक्याची घंटा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 3:46 PM

अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल आणून भिवंडी-काल्हेर येथे सुप्रसिद्ध ब्रॅंडने त्याची विक्री सुगंधित अगरबत्ती म्हणून होत असल्याची घटना समोर आली आहे. 

ठळक मुद्देअगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल आणून भिवंडी-काल्हेर येथे सुप्रसिद्ध ब्रॅंडने त्याची विक्री सुगंधित अगरबत्ती म्हणून होत असल्याची घटना समोर आली आहे. ठाणे कृषी अधिकारी व घरगुती कीटकनाशक नियंत्रण संघाच्या समन्वयाने कारखान्यावर छापा टाकण्यात आला. छापेमारी स्लिपवेल, बालाजी रिलॅक्स, किलर आणि रिलीफ यांसारख्या या ब्रॅण्डनावांसह काही असुरक्षित धूप कांड्या सापडल्या आहेत.

भिवंडी - अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल आणून भिवंडी-काल्हेर येथे सुप्रसिद्ध ब्रॅंडने त्याची विक्री सुगंधित अगरबत्ती म्हणून होत असल्याची घटना समोर आली आहे. या अगरबत्तीमधील केमिकल वापरण्यास बंदी आहे. तसेच कुठलाही शासन परवाना न घेता त्याचा अगरबत्तीमध्ये सर्रास वापर केला जात होता. ठाणे कृषी अधिकाऱ्यांना याबाबती माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे कृषी अधिकारी व घरगुती कीटकनाशक नियंत्रण संघाच्या समन्वयाने कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या छापेमारी स्लिपवेल, बालाजी रिलॅक्स, किलर आणि रिलीफ यांसारख्या या ब्रॅण्डनावांसह काही असुरक्षित धूप कांड्या सापडल्या आहेत.

सध्या सुगंधी अगरबत्तीसह मच्छर अगरबत्ती मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. या अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल चीनमधून आयात करून त्यांना भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील कारखान्यात विविध सुगंधी रासायनिक द्रव्यांत मिसळीत करून विकला जातो. अगरबत्त्या विविध नावाने पॅकिंग करून विक्री करण्याचा कारखाना 'डिवाईन फ्रॅग्नेंसीस' बी१/बीं२ राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स, काल्हेर, भिवंडी येथे मोकाटपणे सुरु होता. चौकशीत आढळले डिवाईन फ्रॅग्नेंसीस कंपनीकडे रासायनिक द्रव्य वापरण्याचा कोणताही परवाना नाही. कारखान्यातील रासायनिक द्रव्य कृषी क्षेत्रात फवारणी म्हणून वापरले जाणारे व आरोग्यास घातक असून त्याचा अतिवापर मानवी आरोग्यास घातक आहे.

होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (एचआयसीए) चे संचालक, जयंत देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली. जयंत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रसायन मानवी आरोग्यास फार हानिकारक आहे व त्याचा शेतीमध्ये फवारणी साठी किती प्रमाणात उपयोग केला जावा याची एक गाईडलाईन निश्चित केली आहे. रसायन अति प्रमाणात वापरल्यास विविध आजार होण्याची शक्यता आहे. उदा. त्वचा विकार, डोळ्यांचे विकार, फुफुसाला संसर्ग किंवा मनुष्याच्या जीवितास सुद्धा धोका होऊ शकतो.

विदर्भात औषध फवारणीमुळे कित्येक कुटुंबाचे जीव गेल्याची घटना ताजी असतानाच कृषी विभाग, ठाणे व होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (एचआयसीए) यांच्या मदतीने भिवंडीतील कारखान्यावर छापेमारी करण्यात आली. यावेळी कारखान्यात मानवी आरोग्यास घातक असा रासायनिक साठा विनापरवाना आढळून आला. येथील रसायनांचे सर्व नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर सदर कारखान्यावर कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी