शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेपुलांखाली संरक्षक जाळीचा प्रस्ताव धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:22 IST

अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजनाच नाही : विविध यंत्रणांचे अपयश

अनिकेत घमंडी ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या पत्नीच्या नावे असलेली मोटार बुधवारी रात्री निळजे येथील उड्डाणपुलावरून थेट पनवेल-वसई मार्गावरील रेल्वेच्या रुळांवर कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी एमएमआरडीए, एमएसआरडीसी व रेल्वे प्रशासन असे अपघात घडल्यानंतरही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची गंभीर बाब पुन्हा पुढे आली आहे. २०१२ मध्ये ठाणे-मुंब्रा या स्थानकांदरम्यान असलेल्या रेल्वे खाडीपुलांखाली संरक्षक जाळी लावण्याचाही प्रस्ताव होता. परंतु, त्याची अंमलबजावणी गेल्या सात वर्षांमध्ये झालेली नसून, तो प्रस्ताव धूळखात पडला आहे.

माजी खासदार आनंद परांजपे व संजीव नाईक, गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथे होणारे अपघात रोखण्यासाठी पाहणी केली होती. खाडीपुलावर लोकलमधून पडून एखाद्या प्रवाशाचा अपघात झाल्यास तो प्रवासी थेट खाडीत पडतो आणि त्याचा मृतदेह शोधताना तपासयंत्रणेला त्रास होतो. त्यासाठी तेथे संरक्षक जाळी लावल्यास अपघात झाल्यास प्रवाशाला होणाऱ्या जखमेची तीव्रता कमी होईल आणि त्यासोबतच त्याचा जीवही वाचेल. अपघातानंतर गोल्डन अवरमध्ये त्यास उपचार मिळतील, असा उद्देश पाहणीदौºयावेळी व्यक्त करण्यात आला होता. परांजपे, नाईक यांनी ती सूचनादेखील रेल्वेकडे केली होती.

रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलांवरही रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. मुंब्रा बायपास, पत्रीपूल, काटई पूल, देसाई खाडीपूल येथील पुलांवर अपघात झाल्यास ते रोखण्यासाठी अशा प्रकारे कुठेही संरक्षक जाळी नाही.त्यामुळे एखाद्या वाहनचालकाचा अपघात झाल्यास तो थेट रेल्वेरुळांवरच जाऊन पडतो. त्यामुळे मोठी दुघर्टना घडू शकते, हे बुधवार रात्रीच्या निळजे-काटई येथील घटनेवरून समोर आले. त्यामुळे या संरक्षक उपाययोजनांकडे एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

रेल्वेशी संबंधित जाणकारांनी सांगितले की, रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमधून २५ हजार केव्हीचा वीजप्रवाह जात असतो, अशा ठिकाणी संरक्षक जाळी नाही तर अन्य अत्याधुनिक पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. पण खाडीपुलांखाली तर असा अडथळा नाही, तेथे तातडीने चांगल्या दर्जाची जाळी लावणे गरजेचे आहे.या जाळ्यांमुळे अपघातांची तीव्रता कमी होईलच, पण त्यासोबत खाडीमध्ये पिशव्यांमधून टाकल्या जाणाºया निर्माल्यामुळे होणारे प्रदूषणही कमी होईल.

रेल्वेने संरक्षक जाळी लावलेली नाही, ही शोकांतिका आहे. उड्डाणपुलांखालीही अशा प्रकारे अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात. ते २०१४ पासून झालेले नाहीत. एमएमआरडीए, एमएसआरडीसी, रेल्वे प्रशासनाने या गंभीर मुद्याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करायला हवी. रेल्वेमार्गावर असलेले खाडीपूल, मुंब्रा बायपास ते कल्याण शीळ आणि भिवंडी मार्ग हे अपघातांचे क्षेत्र आहेत. हे महामार्ग असले तरीही या मार्गांच्या आजूबाजूला वस्ती आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक आहे, त्याला आळा घालायलाच हवा- आनंद परांजपे, माजी खासदारअपघातस्थळी संरक्षक जाळी लावणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव वाचण्याची शक्यता जास्त आहे. त्यासोबतच अशा ठिकाणी सीसी कॅमेरे बसवायला हवेत, जेणेकरून घटना घडताच सहप्रवाशांनी सुरक्षा यंत्रणेला कळवावेच, पण रेल्वे प्रशासन, संबंधित यंत्रणेचेही लक्ष लागेल. रेल्वे प्रशासन घाट सेक्शनमध्ये कॅमेरे लावते, तर अशा सुरक्षेच्या ठिकाणी लावणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यासाठी मी निश्चितच पाठपुरावा करणार आहे.- राजन विचारे,खासदार, ठाणेनिळजे पुलावर जो अपघात झाला, तो प्रकार भयंकर होता. अपघात खड्डे चुकवण्याच्या नादात संबंधित वाहनचालकाकडून झाला असेलही, परंतु पुलावरून थेट गाडी रुळांमध्ये जाणे हे जास्त धोकादायक आहे. त्या ठिकाणी पुलाच्या बाजूला, खाली संरक्षक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आगामी काळात आवाज उठवणार आहे.- प्रमोद पाटील, आमदार, कल्याण ग्रामीण मतदारसंघ