शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भिवंडीतील उड्डाणपुलांवर खड्डयांचे साम्राज्य; तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतरही मनपा प्रशासन निद्रिस्त

By नितीन पंडित | Published: October 04, 2023 7:12 PM

या मार्गावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.

भिवंडी:भिवंडी शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून शहरातील धामणकर नाका व वंजारपट्टी नाका येथील डॉ एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपूलवर प्रचंड खड्डे पडले आहेत.तीन दिवसांपूर्वीच वंजारपट्टी नाका येथील उड्डाण पुलावर आमीर इसाक सय्यद या २६ वर्षीय तरुणाचा खड्ड्यामुळे अपघाती मृत्यू झाला आहे.मात्र तरुणाच्या मृत्यूनंतरही मनपा प्रशासन निद्रिस्त असून मागील तीन दिवसातही या उड्डाण पुलावरील खड्डे भरण्यासाठी मनपा प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नसल्याने मनपा प्रशासना विरोधात नागरिकांसह प्रवाशांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.

धामणकर नाका उड्डाणपुलावर अजमेर नगर बाजूला सुरुवातीलाच प्रचंड खड्डे पडले आहे.तर उड्डाणपुलावर मध्यभागी देखील खड्डे पडले असून पद्मानगर कडील बाजूवर देखील प्रचंड खड्डे पडले आहेत.येथे महापालिकेने पेव्हरब्लॉकच्या साहाय्याने खड्डे भरले आहेत मात्र पेव्हरब्लॉकची खडी वर पसरल्याने दुचाकी स्वारांचे नेहमी अपघात होत आहेत.तर वंजारपट्टी नाका उड्डाणपुलावर मध्यभागी व चावीन्द्राकडे जाणाऱ्या बाजूकडे मोठमोठे खड्डे पडले आहेत.तर खड्डे बुजविण्यासाठी आणलेली माती मिश्रित खडी उड्डाणपुलावरच बाजूला ढिग मारून ठेवली असल्याने हि खडी रस्त्यावर येऊन दुचाकीस्वार या खडीवरून घसरून येथे नेहमी अपघात होत आहेत.

भिवंडीतील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून अंजुर फाटा ते वंजारपट्टी नाका रस्त्यावर खड्ड्यांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत असून या मार्गावर दिवसा व रात्री देखील प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. याच मार्गावर भिवंडी बस आगार,महापालिका मुख्यालय, प्रांताधिकारी कार्यालय,पोलीस उपायुक्त कार्यालय, तहसीलदार कार्यालय,सह दुय्यम निबंधक कार्यालय,भिवंडी न्यायालय व इतर कार्यालये असल्याने या रस्त्यावरून नागरिक रोज ये जा करत असतात. मात्र या मार्गावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीAccidentअपघातPotholeखड्डे