शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

डोंबिवलीमध्ये प्लास्टिकबंदी सर्रास धाब्यावर; महापालिकेचा कारवाईचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 1:39 AM

फेरीवाले, नागरिकांकडून खुलेआम पिशव्यांचा वापर

डोंबिवली : राज्यात प्लास्टिकबंदी असतानाही शहरातील व्यापारी, फेरीवाले यांच्याकडे सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येत आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात महापालिका प्रशासन कमी पडत आहे. मात्र, शहरात बाहेरून येणारे फेरीवाले प्लास्टिकचा वापर जास्त करत असल्याचा अजब दावा महापालिकेचे सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी केला.

शहरातील फडके रोड, डॉ. राथ रोड, चिमणी गल्ली, मानपाडा रस्ता, नेहरू मैदान परिसर, ठाकुर्ली रेल्वेस्थानक ते हनुमान मंदिर परिसर, पश्चिमेला गुप्ते रोड, मच्छीमार्केट परिसर, फुले रस्ता, गोपी टॉकीज परिसर, जयहिंद कॉलनी परिसर, उमेश नगर, गरिबाचा वाडा आदी परिसरात बसणाºया फेरीवाल्यांकडे सर्रास प्लास्टिक पिशव्या मिळत आहेत.

महापालिका आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यंतरी प्लास्टिक बंदीविरोधात कडक मोहीम राबवली होती. त्यामुळे त्यावेळी कचरा गोळा करून तो डम्पिंगवर टाकताना अथवा बायोगॅसमध्ये कचºयाचे वर्गीकरण करताना एकूण सुमारे ३५० टन निर्माण होणाºया कचºयामध्ये सुमारे २० टन प्लास्टिकच्या कचºयाची घट झाली होती. त्यामुळे शहरात सर्वत्र प्लास्टिकबंदीचा प्रभाव दिसून यायला लागला होता. नागरिकही स्वत:हून कापडी पिशव्या वापरण्याच्या मानसिकतेत होते. परंतु, मार्च, एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत प्लास्टिकबंदी विरोधात ठोस अशी कारवाई झाली नाही.

दिवाळीपासून पुन्हा सर्रासपणे प्लास्टिक पिशव्या दिसू लागल्या आहेत. त्यामुळे कारवाईत सातत्य नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. तर, पर्यावरण अभ्यासक, महापालिकेचे अधिकारी यांनी राज्य सरकारने प्लास्टिकचे कारखान्यांमधील उत्पादन बंद करायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महापालिकेच्या पथकाकडून सकाळी, दुपारी व सायंकाळी नियमबाह्य प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्यांवर जप्तीची कारवाई केली जाते. परंतु, कारवाई पथकाची पाठ फिरताच पुन्हा रात्री उशिरापर्यंत प्लास्टिक पिशव्यांचे वितरण केले जाते. त्यामुळे समस्या सुटत नसल्याची महापालिकेने नाराजी व्यक्त केली.

शहरात बाहेरून येणारे प्लास्टिक, पिशव्या कसे रोखावे, हा मोठा पेच आहे. पण त्यावरही अल्पावधीतच आम्ही नियंत्रण मिळवू. प्लास्टिक बंदीवरील कारवाईत सातत्य राहणार असून, त्यासंदर्भातील सूचना संबंधित स्वच्छता निरीक्षक, प्रभागक्षेत्र अधिकारी, मुकादम आदींना देण्यात आल्या आहेत. संकलित झालेले प्लास्टिक गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.- उमाकांत गायकवाड, उपायुक्त, घनकचरा विभाग.

प्लास्टिक घेऊ येणारे बाहरेचे असोत की आतले, ही जबाबदारी अधिकाºयांची आहे. कारवाईत कामचुकारपणा नको. दोन दिवसांनी प्लास्टिकबंदीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहे. त्यात दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्याबाबत विचारविनिमय केला जाईल. थातुरमातूर कारवाईला अर्थच नाही.- विनीता राणे, महापौर, कल्याण-डोंबिवली

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेdombivaliडोंबिवली