शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने एक झाड लावा; संजय राठोड यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 03:37 IST

वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ, पर्यावरण जपणे गरजेचे

ठाणे : हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करावा, असे आवाहन राज्याचे वन व भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी बुधवारी केले. वनविभागाने आयोजित केलेल्या हरित महाराष्ट्र वृक्षलागवड मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ बुधवारी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूर येथे झाला. त्याचाच एक भाग म्हणून राठोड यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील मौजे शीळ पनवेल रोड भंडार्ली येथे वृक्षारोपण करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे व उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते.

भारतीय वन सर्वेक्षण २०१९ च्या अहवालानुसार महाराष्ट्रात वनक्षेत्राचे प्रमाण ३०.१ टक्के इतके असून हे प्रमाण भारताच्या वनक्षेत्राच्या प्रमाणात ८.६५ टक्के इतके आहे. भारतीय वननीतीनुसार ते भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के एवढे क्षेत्र असावे, असे उद्दिष्ट राष्ट्रीय पातळीवर निश्चित केले आहे. या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी तसेच बदलत्या जागतिक वातावरणाचा समतोल राखण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

२०१७ च्या तुलनेत महाराष्ट्रातील वनक्षेत्रात वर्षभरात सुमारे ९७ हजार ५०० हेक्टरने वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे वनक्षेत्रावरील वृक्षाची वाढ होऊन महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी राहिले आहे. वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेचा सहभाग वाढावा, वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी तसेच जनतेला वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देता यावे या हेतूने राज्यात हरित महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहीम आयोजित केली आहे

दरम्यान, २०२० ते २०२४ या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी दोन कोटी याप्रमाणे एकूण १० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. यामुळे सर्व नागरिकांनी या मोहिमेमध्ये भाग घेऊन हरित महाराष्ट्र घडविण्याकरिता आपले योगदान द्यावे, असे आवाहन राठोड यांनी केले आहेठाणे जिल्ह्यात कृषी दिन सर्वत्र साजरा, बांधावर जाऊन देणार योजनांची माहिती

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कृषिक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती किशोर जाधव यांनी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी विकास अधिकारी मनोजकुमार ढगे उपस्थित होते.ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दीपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अति मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि. नेमाने यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देऊन आषाढी एकादशीचे औचित्य साधून बा. विठ्ठलाला देशावर, राज्यावर , जिल्ह्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर होवो असे साकडे घातले.जिल्हा प्रशासनामार्फत पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेनुसार १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊन, शेतकऱ्यांच्या बांधावर कृषीविषयक योजनांची माहिती या कालावधीत दिली जाणार आहे. बुधवारी जिल्हा परिषदेच्या शहापूर, अंबरनाथ, मुरबाड, कल्याण, भिवंडी आदी पंचायत समितीकार्यालयातही कृषी दिन साजरा करण्यात आला.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडforestजंगलenvironmentपर्यावरण