शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पाटोळपाडा, तेलमपाडा पाणीटंचाईने त्रस्त, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 1:04 AM

भातसा धरणक्षेत्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळूक ग्रामपंचायत हद्दीतील पाटोळपाडा, तेलमपाडा परिसर पाणीटंचाईने त्रस्त झाला आहे.

- श्याम धुमाळकसारा : भातसा धरणक्षेत्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळूक ग्रामपंचायत हद्दीतील पाटोळपाडा, तेलमपाडा परिसर पाणीटंचाईने त्रस्त झाला आहे. येथे २ कूपनलिका, २ विहिरी आहेत. परंतु, कुठेच पाणी नसल्याने तेलमपाडा येथील महिलांना तसेच पुरूषांना ४ टेकड्या पार करून भातसा धरणक्षेत्रात उतरून पाण्याची व्यवस्था करावी लागते आहे. मुलाबाळांना घरी ठेवून संपूर्ण दिवस पाण्यासाठी खर्च करावा लागतो. महिलांसोबतच पुरूषांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने रोजगार बुडतो आहे. त्यामुहे पोट कसे भरायचे, असा प्रश्न येथील आदिवासींना पडला आहे. या गावातील महिलांना ४ किमी. अंतरावरील सुसरवाडी येथील साठलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी जावे लागते. या पाण्याची पाहणी केली असता ते प्रदूषित असल्याचे आढळले. या साठलेल्या पाण्याच्या आसपासची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. एखादी व्यक्ती पाय घसरून पडल्यास जबर दुखापत होण्याचा धोका जास्त आहे.पाणी योजनेचे तीनतेरापाटोळपाडा आणि गाव यासाठी २००७ - ०८ मध्ये ५१.४३ लाखांच्या योजनेचे काम अर्धवट ठेवून कंत्राटदाराने नागरिकांना पाणीटंचाईच्या दरीत ढकलले आहे. या परिसरातील योजना भातसा पाणलोट क्षेत्रात असूनही विहिरीवर राबवण्याचा घाट घातला जात आहे.जानेवारीतच या विहिरी कोरड्या पडत असल्याने पाणीच मिळाले नाही. संपूर्ण रात्र महिलांना पाण्यासाठी जागावे लागते. कूपनलिकांमधील पाणी संपले तर ३ किमी अंतरावर दऱ्याखोऱ्यांमधून भातसा पाणलोट धरणक्षेत्रात जावे लागते.पाण्यासारखी मूलभूत गरजही पूर्ण होत नसल्याने पाटोळपाडा येथील आदिवासी लोकांनी लोकसभेसाठी मतदान न करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. पाण्याची महत्त्वाची समस्या न सुटल्यास संपूर्ण परिसराने एकत्र येऊन विधानसभा आणि जिल्हा परिषद मतदानावर बहिष्कार टाकण्याची योजना आखली असून लोकप्रतिनिधींना प्रचाराला येऊच न देण्याचे ठरवले आहे.या पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ अत्यंत त्रस्त असून प्रशासनाने यावर काही ना काही कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात होणारा हा त्रास संपावा, अशी त्यांची इच्छा आहे.पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपायहा भाग डोंगरमाथ्यावर वसल्याने पावसाचे पाणी थेट वाहून जाते. योग्य नियोजन नसल्याने पाणी जमिनीत मुरत नाही. नाल्यांमध्ये गाळ साचल्याने पाणी वाहून जाते. हा गाळ काढून पाणी साठवण्यासाठी योग्य नियोजन केले तर भूजल साठ्यात वाढ होऊ शकते. तर दुसºया बाजूने विचार केल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणाºया भातसा धरणाची एक बाजू या तीनही गावांना पाणीपुरवठा करू शकते. काही परिसरात जुनी नळ योजना, साठवण टाक्या आहेत. फक्त काही लाख रु पये खर्च करून भातसा धरणातील पाणी योग्य नियोजन करून निधी उपलब्ध केल्यास कायमस्वरूपी पाणी टंचाईवर मात होऊ शकते.पशूंची अवस्था अत्यंत बिकटमाणसांनाच पाणी नाही, तर जनावरांसाठी कुठून आणायचे, असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहेत. पाणी नसल्याने पशूंचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. शिवाय पशू वैद्यकीय अधिकारीही येथे फिरकत नसल्याने जनावरे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे स्थानिक शिवराम भिका झुगरे यांनी सांगितले.दापूरवासीयांपाठोपाठ अजनूपवासीयांचा देखील सर्व निवडणुकांवर बहिष्कारअजनूप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया उठावा, दापूर माळ, बांदलवाडी, सावरखेड, या गावांच्या लगत मुंबईला पाणीपुरवठा करणाºया मध्य वैतरणा धरणाचे बॅक वॉटर नदीपात्र आहे; परंतु ते पाणी या गावकऱ्यांना उपलब्ध होत नाही. खर्डी वनविभागाच्या मुजोरपणामुळे या ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या नदीपात्रावर पाणी आणण्यासाठी पायवाट रस्ता वनविभाग करून देत नसल्याने गावकरी खोल दरीत उतरून पाणी जमा करत असतात. या गावातील ग्रामस्थांनी अनेकदा पाणी आणण्यासाठी किमान पायवाट तरी करून देण्याची मागणी केली होती. ती पूर्ण झाली नाही.दापूरमाळ आणि सावरखेडची अवस्था तर अतिशय दयनीय आहे. या गावात वीज, रस्ता, पाणी, दवाखाना या मूलभूत गरजाच लोकांना माहीत नाहीत. अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या ग्रामस्थांनी या वेळी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.डबक्यातील पाणी पित आपली तहान भागवणाºया दापूरवासीयांना रस्ता तसेच पाणी न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीसह बहिष्कार टाकणार असून पाण्यासाठी वेठीस धरणाºया वनविभाग, लघुपाटबंधारे आणि आदिवासी विकास प्रकल्पाविरोधात लवकरच आंदोलन करणार असल्याचे विजय शिंगवा यांनी सांगितले.स्वच्छ भारत मिशनमधील शौचालय बंदस्वच्छ भारत मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या शौचालयाचा पाण्याअभावी वापर होत नसल्याने घरोघरी असलेल्या शौचालयात पेंढा भरून ठेवला आहे.शहापूर तालुक्यातील बहुतांश पाणी योजना अपूर्णावस्थेत आहेत. त्यासंदर्भात लवकरच चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.    - रावसाहेब आढे, अभियंता,     पाणीपुरवठा विभाग, ठाणे

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईthaneठाणे