शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आले ५८ टक्क्यांवर, कोरोनाची तपासणी करण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 00:15 IST

रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण मीरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असून या ठिकाणी आतापर्यंत ५७४६ रु ग्ण कोरोनाबाधित आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा वाढत असताना, दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यातील एक हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २२ हजार ९१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तब्बल ३२ हजार ४६० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५७ ते ५९ टक्के असल्याची माहिती सूत्रांनी दिली.रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण मीरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असून या ठिकाणी आतापर्यंत ५७४६ रु ग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी १९९ जणांना जीव गमवावा लागला. सध्या या ठिकाणी एक हजार ४३४ रुणांवर उपचार सुरू आहेत. १३ जुलैपर्यंत तब्बल चार हजार ११३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रात ‘मिशन झीरो’ राबविण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणीही चाचण्यांचे प्रमाण वाढवून उपचाराचा वेग वाढविण्यात आला आहे. ठाणे शहरामध्ये आतापर्यंत १३,१७९ रुग्ण बाधित असून, यातील ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या या ठिकाणी पाच हजार ८८६ रुग्णांवर उपचार सुरू असून सात हजार २९३ रु ग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रात आतापर्यंत १३ हजार २४० रुग्ण बाधित झाले. यातील १९८ जणांना जीव गमवावा लागला. या ठिकाणी सहा हजार ६३३ रु ग्णांवर उपचार सुरू असून, सहा हजार ४०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत नऊ हजार ६७८ बाधित झाले. यातील ३०५ जणांचा मृत्यू झाला. सध्या या ठिकाणी तीन हजार ५६९ रु ग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत, तर पाच हजार ८०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात आतापर्यंत पाच हजार ४२५ रुग्ण आढळले. यातील ७१ मृत पावले आहेत. सध्या दोन हजार २६ रुग्णांवर उपचार सुरू असून, दोन हजार ३२८ रुग्ण कोरोनातून बरे झाले. त्याचप्रमाणे भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रातही रु ग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत भिवंडीत दोन हजार ८२४ रु ग्ण बाधित झाले. त्यातील १४७ जणांचा मृत्यू झाला, तर ८३४ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार ८४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अंबरनाथमध्येही दोन हजार २७५ बाधित रुग्ण असून त्यातील १०५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४५९ जणांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी दोन हजार १६१ रु ग्ण बरे झाले आहेत.बदलापुरातही आतापर्यंत एकूण एक हजार ४७७ रुग्ण दाखल झाले. या ठिकाणी २० जणांचा मृत्यू झाला आहे. ७४३ रु ग्णांवर उपचार सुरू असून ७१४ रु ग्ण हे आता सुखरूप घरी परतले आहेत. ठाण्याच्या ग्रामीण भागात सोमवारपर्यंत तीन हजार २१४ रु ग्णसंख्या नोंदविली गेली. यातील ९१ जणांचा मृत्यू झाला असून, एक हजार ८७९ रुग्ण कोरोनाशी लढा देत आहेत. एक हजार २४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून घरी परतले आहेत.कोरोनाची तपासणी करण्यावर भरजिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमधील नागरिकांचे सर्वेक्षण आणि तपासणीचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. यातून बहुतांश रुग्ण हे प्राथमिक टप्प्यात आढळले. त्यामुळे गंभीर परिस्थिती होण्यापूर्वीच रुग्णांवर तातडीने उपचार झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण हे राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आले आहे. सध्या १२ ते १९ जुलै हा लॉकडाऊनचा कालावधी जिल्हाभर वाढविला आहे. यापुढे आढावा घेऊन लॉकडाऊनबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल. - राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस