शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आले ५८ टक्क्यांवर, कोरोनाची तपासणी करण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 00:15 IST

रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण मीरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असून या ठिकाणी आतापर्यंत ५७४६ रु ग्ण कोरोनाबाधित आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा वाढत असताना, दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यातील एक हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २२ हजार ९१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तब्बल ३२ हजार ४६० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५७ ते ५९ टक्के असल्याची माहिती सूत्रांनी दिली.रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण मीरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असून या ठिकाणी आतापर्यंत ५७४६ रु ग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी १९९ जणांना जीव गमवावा लागला. सध्या या ठिकाणी एक हजार ४३४ रुणांवर उपचार सुरू आहेत. १३ जुलैपर्यंत तब्बल चार हजार ११३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रात ‘मिशन झीरो’ राबविण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणीही चाचण्यांचे प्रमाण वाढवून उपचाराचा वेग वाढविण्यात आला आहे. ठाणे शहरामध्ये आतापर्यंत १३,१७९ रुग्ण बाधित असून, यातील ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या या ठिकाणी पाच हजार ८८६ रुग्णांवर उपचार सुरू असून सात हजार २९३ रु ग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रात आतापर्यंत १३ हजार २४० रुग्ण बाधित झाले. यातील १९८ जणांना जीव गमवावा लागला. या ठिकाणी सहा हजार ६३३ रु ग्णांवर उपचार सुरू असून, सहा हजार ४०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत नऊ हजार ६७८ बाधित झाले. यातील ३०५ जणांचा मृत्यू झाला. सध्या या ठिकाणी तीन हजार ५६९ रु ग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत, तर पाच हजार ८०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात आतापर्यंत पाच हजार ४२५ रुग्ण आढळले. यातील ७१ मृत पावले आहेत. सध्या दोन हजार २६ रुग्णांवर उपचार सुरू असून, दोन हजार ३२८ रुग्ण कोरोनातून बरे झाले. त्याचप्रमाणे भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रातही रु ग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत भिवंडीत दोन हजार ८२४ रु ग्ण बाधित झाले. त्यातील १४७ जणांचा मृत्यू झाला, तर ८३४ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार ८४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अंबरनाथमध्येही दोन हजार २७५ बाधित रुग्ण असून त्यातील १०५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४५९ जणांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी दोन हजार १६१ रु ग्ण बरे झाले आहेत.बदलापुरातही आतापर्यंत एकूण एक हजार ४७७ रुग्ण दाखल झाले. या ठिकाणी २० जणांचा मृत्यू झाला आहे. ७४३ रु ग्णांवर उपचार सुरू असून ७१४ रु ग्ण हे आता सुखरूप घरी परतले आहेत. ठाण्याच्या ग्रामीण भागात सोमवारपर्यंत तीन हजार २१४ रु ग्णसंख्या नोंदविली गेली. यातील ९१ जणांचा मृत्यू झाला असून, एक हजार ८७९ रुग्ण कोरोनाशी लढा देत आहेत. एक हजार २४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून घरी परतले आहेत.कोरोनाची तपासणी करण्यावर भरजिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमधील नागरिकांचे सर्वेक्षण आणि तपासणीचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. यातून बहुतांश रुग्ण हे प्राथमिक टप्प्यात आढळले. त्यामुळे गंभीर परिस्थिती होण्यापूर्वीच रुग्णांवर तातडीने उपचार झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण हे राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आले आहे. सध्या १२ ते १९ जुलै हा लॉकडाऊनचा कालावधी जिल्हाभर वाढविला आहे. यापुढे आढावा घेऊन लॉकडाऊनबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल. - राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस