शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आले ५८ टक्क्यांवर, कोरोनाची तपासणी करण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 00:15 IST

रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण मीरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असून या ठिकाणी आतापर्यंत ५७४६ रु ग्ण कोरोनाबाधित आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा वाढत असताना, दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यातील एक हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २२ हजार ९१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तब्बल ३२ हजार ४६० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५७ ते ५९ टक्के असल्याची माहिती सूत्रांनी दिली.रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण मीरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असून या ठिकाणी आतापर्यंत ५७४६ रु ग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी १९९ जणांना जीव गमवावा लागला. सध्या या ठिकाणी एक हजार ४३४ रुणांवर उपचार सुरू आहेत. १३ जुलैपर्यंत तब्बल चार हजार ११३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रात ‘मिशन झीरो’ राबविण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणीही चाचण्यांचे प्रमाण वाढवून उपचाराचा वेग वाढविण्यात आला आहे. ठाणे शहरामध्ये आतापर्यंत १३,१७९ रुग्ण बाधित असून, यातील ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या या ठिकाणी पाच हजार ८८६ रुग्णांवर उपचार सुरू असून सात हजार २९३ रु ग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रात आतापर्यंत १३ हजार २४० रुग्ण बाधित झाले. यातील १९८ जणांना जीव गमवावा लागला. या ठिकाणी सहा हजार ६३३ रु ग्णांवर उपचार सुरू असून, सहा हजार ४०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत नऊ हजार ६७८ बाधित झाले. यातील ३०५ जणांचा मृत्यू झाला. सध्या या ठिकाणी तीन हजार ५६९ रु ग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत, तर पाच हजार ८०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात आतापर्यंत पाच हजार ४२५ रुग्ण आढळले. यातील ७१ मृत पावले आहेत. सध्या दोन हजार २६ रुग्णांवर उपचार सुरू असून, दोन हजार ३२८ रुग्ण कोरोनातून बरे झाले. त्याचप्रमाणे भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रातही रु ग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत भिवंडीत दोन हजार ८२४ रु ग्ण बाधित झाले. त्यातील १४७ जणांचा मृत्यू झाला, तर ८३४ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार ८४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अंबरनाथमध्येही दोन हजार २७५ बाधित रुग्ण असून त्यातील १०५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४५९ जणांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी दोन हजार १६१ रु ग्ण बरे झाले आहेत.बदलापुरातही आतापर्यंत एकूण एक हजार ४७७ रुग्ण दाखल झाले. या ठिकाणी २० जणांचा मृत्यू झाला आहे. ७४३ रु ग्णांवर उपचार सुरू असून ७१४ रु ग्ण हे आता सुखरूप घरी परतले आहेत. ठाण्याच्या ग्रामीण भागात सोमवारपर्यंत तीन हजार २१४ रु ग्णसंख्या नोंदविली गेली. यातील ९१ जणांचा मृत्यू झाला असून, एक हजार ८७९ रुग्ण कोरोनाशी लढा देत आहेत. एक हजार २४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून घरी परतले आहेत.कोरोनाची तपासणी करण्यावर भरजिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमधील नागरिकांचे सर्वेक्षण आणि तपासणीचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. यातून बहुतांश रुग्ण हे प्राथमिक टप्प्यात आढळले. त्यामुळे गंभीर परिस्थिती होण्यापूर्वीच रुग्णांवर तातडीने उपचार झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण हे राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आले आहे. सध्या १२ ते १९ जुलै हा लॉकडाऊनचा कालावधी जिल्हाभर वाढविला आहे. यापुढे आढावा घेऊन लॉकडाऊनबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल. - राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस