शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आले ५८ टक्क्यांवर, कोरोनाची तपासणी करण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 00:15 IST

रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण मीरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असून या ठिकाणी आतापर्यंत ५७४६ रु ग्ण कोरोनाबाधित आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा वाढत असताना, दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यातील एक हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २२ हजार ९१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तब्बल ३२ हजार ४६० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५७ ते ५९ टक्के असल्याची माहिती सूत्रांनी दिली.रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण मीरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असून या ठिकाणी आतापर्यंत ५७४६ रु ग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी १९९ जणांना जीव गमवावा लागला. सध्या या ठिकाणी एक हजार ४३४ रुणांवर उपचार सुरू आहेत. १३ जुलैपर्यंत तब्बल चार हजार ११३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रात ‘मिशन झीरो’ राबविण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणीही चाचण्यांचे प्रमाण वाढवून उपचाराचा वेग वाढविण्यात आला आहे. ठाणे शहरामध्ये आतापर्यंत १३,१७९ रुग्ण बाधित असून, यातील ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या या ठिकाणी पाच हजार ८८६ रुग्णांवर उपचार सुरू असून सात हजार २९३ रु ग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रात आतापर्यंत १३ हजार २४० रुग्ण बाधित झाले. यातील १९८ जणांना जीव गमवावा लागला. या ठिकाणी सहा हजार ६३३ रु ग्णांवर उपचार सुरू असून, सहा हजार ४०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत नऊ हजार ६७८ बाधित झाले. यातील ३०५ जणांचा मृत्यू झाला. सध्या या ठिकाणी तीन हजार ५६९ रु ग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत, तर पाच हजार ८०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात आतापर्यंत पाच हजार ४२५ रुग्ण आढळले. यातील ७१ मृत पावले आहेत. सध्या दोन हजार २६ रुग्णांवर उपचार सुरू असून, दोन हजार ३२८ रुग्ण कोरोनातून बरे झाले. त्याचप्रमाणे भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रातही रु ग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत भिवंडीत दोन हजार ८२४ रु ग्ण बाधित झाले. त्यातील १४७ जणांचा मृत्यू झाला, तर ८३४ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार ८४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अंबरनाथमध्येही दोन हजार २७५ बाधित रुग्ण असून त्यातील १०५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४५९ जणांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी दोन हजार १६१ रु ग्ण बरे झाले आहेत.बदलापुरातही आतापर्यंत एकूण एक हजार ४७७ रुग्ण दाखल झाले. या ठिकाणी २० जणांचा मृत्यू झाला आहे. ७४३ रु ग्णांवर उपचार सुरू असून ७१४ रु ग्ण हे आता सुखरूप घरी परतले आहेत. ठाण्याच्या ग्रामीण भागात सोमवारपर्यंत तीन हजार २१४ रु ग्णसंख्या नोंदविली गेली. यातील ९१ जणांचा मृत्यू झाला असून, एक हजार ८७९ रुग्ण कोरोनाशी लढा देत आहेत. एक हजार २४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून घरी परतले आहेत.कोरोनाची तपासणी करण्यावर भरजिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमधील नागरिकांचे सर्वेक्षण आणि तपासणीचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. यातून बहुतांश रुग्ण हे प्राथमिक टप्प्यात आढळले. त्यामुळे गंभीर परिस्थिती होण्यापूर्वीच रुग्णांवर तातडीने उपचार झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण हे राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आले आहे. सध्या १२ ते १९ जुलै हा लॉकडाऊनचा कालावधी जिल्हाभर वाढविला आहे. यापुढे आढावा घेऊन लॉकडाऊनबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल. - राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस