शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पत्रीपुलावर शिवसैनिकांची स्टंटबाजी, वाहतूक सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 04:14 IST

वाहतूक सुरू करण्याची मागणी : पोलिसांनी हाणून पाडला प्रयत्न, पालकमंत्र्यांच्या फोनमुळे नरमाईची भूमिका

कल्याण : शहरातील जुना पत्रीपूल धोकादायक बनल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. मात्र, त्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याने शिवसैनिकांनी स्टंटबाजी करत शनिवारी दुपारी हा पूल सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून लेखी आदेश येत नाहीत, तोपर्यंत पूल वाहतुकीसाठी सुरू करता येणार नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी कायदा हाती घेऊ नये, असे सांगत पोलिसांनी पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, पूल २५ सप्टेंबरपर्यंत पादचाऱ्यांसाठी खुला राहील, असे रेल्वेने प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले.

जुना पत्रीपूल पाडण्याचे काम शनिवारपासून हाती घेतले जाईल, असे रेल्वेने बुधवारी जाहीर केले होते. त्यानुसार, पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. परंतु, पुलाच्या परिसरात होणाºया कोंडीमुळे जुन्या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश जाधव, जयवंत भोईर, नगरसेविका रेखा जाधव, माजी नगरसेवक कैलास शिंदे, सचिन बासरे, आशा रसाळ यांनी केली. त्यावर, पुलावरून कोणत्याही परिस्थितीत वाहतूक सुरू करता येणार नाही. शिवसैनिकांनी कायदा हाती घेऊ नये, असे पोलिसांनी त्यांना बजावले. पुलावरून वाहतूक सुरू करण्याबाबत रेल्वेकडून आदेश मिळालेले नाहीत. रेल्वे अधिकारी व पालकमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे. त्यातील निर्णयानुसार अमल करू, असे पोलिसांनी शिवसैनिकांना सांगितले. यावेळी एका पोलीस अधिकाºयाने पालकमंत्री शिंदे यांना फोन लावून शिवसैनिकांचे बोलणे करून दिले. शिंदे यांच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी शांततेचा पवित्रा घेतला.भोपाळच्या एजन्सीने पुलाची पाहणी केली होती, तेव्हा आणखीन काही वर्षे पुलाचा वापर करता येईल, असे स्पष्ट केले होते, याकडे शिवसैनिकांनी लक्ष वेधले. रविवारी रक्षाबंधन असल्याने दोन दिवस पूल हलक्या वाहतुकीसाठी खुला करावा, असा आग्रह शिवसैनिकांनी धरला. तब्बल तीन तास हा प्रकार सुरू होता. शिवसैनिक पुलाचे बॅरिकेड तोडून वाहतूक सुरू करण्याच्या बेतात होते. त्यामुळे पोलीस फौजफाटा तैनात होता.पत्रीपूल पाडण्यासाठी घ्यावा लागणार जम्बोब्लॉक, यंत्रणांपुढे आव्हानजुना पत्रीपूल लवकरात लवकर पाडण्यासाठी रेल्वेकडून दबाव आणला जात आहे. शनिवारपासून हा पूल पाडण्याची घोषणा करण्यात आली होती. पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यानंतर त्यावरील पथदिवे, दूरध्वनी, वीजवाहिन्या आदी काढण्यास सुरुवातही झाली आहे. परंतु, हा पूल पाडण्यासाठी रेल्वेला मोठा जम्बोब्लॉक घ्यावा लागणार आहे.कल्याण हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन आहे. या स्थानकातून कर्जत, कसारामार्गे लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्या जातात. मालगाड्यांचे मोठे यार्ड येथे आहे. या सर्वच गाड्यांची वाहतूक कल्याणहून दिवसरात्र सुरू असते. त्यामुळे पुलाच्या पाडकामासाठी जम्बोब्लॉक घेताना रेल्वेला या गाड्या अन्य मार्गांनी वळवाव्या लागतील किंवा त्यांच्या फेºया रद्द कराव्या लागतील. रेल्वे प्रशासनासाठी ते मोठे आव्हान असणार आहे.

सध्या मुंब्रा बायपास बंद असल्याने तेथील वाहतूक कल्याण-शीळ या मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे शहरात कोंडी होत आहे. गणेशोत्सवही तोंडावर आला आहे. या बाबी विचारात घेतल्यास सध्या पत्रीपूल पाडणे यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे मुंब्रा बायपास सुरू झाल्यानंतर पाडकाम हाती घेणे योग्य ठरणार आहे.

जुना पूल पाडताना नवीन पुलावरील वाहतूकही काही वेळ बंद ठेवावी लागू शकते. त्यादृष्टीने वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. त्याचबरोबर राज्य रस्ते विकास महामंडळ, केडीएमसी, पोलीस, वाहतूक पोलीस याचबरोबर अन्य यंत्रणांनाही रेल्वेला सोबत घेऊन नियोजन करावे लागणार आहे.मुंब्रा बायपास सुरू झाल्यावर दिलासा?डोंबिवली : जुना पत्रीपूल वाहतुकीस बंद केल्याने कल्याण शहरात तसेच कल्याण-शीळ या मार्गावर वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक जेरीस आले आहेत. वाहतूक नियोजन व त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शनिवारी पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली.यावेळी शहरातील गोविंदवाडी बायपास, दुर्गाडी, बाईचा पुतळा, वालधुनी, आग्रा रोड, सहजानंद चौक, शिवाजी चौक, महापालिका परिसर तसेच वायलेनगर, गांधारी आदी भागांमध्ये वाहतुकीचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. सण-उत्सवाच्या कालावधीत कोणाचीही गैरसोय होऊ नये, यादृष्टीने काळजी घेण्याची सूचनाही देण्यात आली.१० सप्टेंबरनंतर मुंब्रा बायपास सुरू झाल्यावर सध्या पडणारा ताण काहीसा हलका होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. वाहतूक विभागाचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त एस. गोसावी, डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर तसेच विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना