शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

खासगी शाळांच्या मनमानी फी वसुलीविरोधात पालकांची वणवण सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 6:51 PM

मीरा-भाईंदरमधील अनेक मोठ्या शाळा या राजकारणी, बिल्डर आदींच्या आहेत.

मीरा रोड - मीरा-भाईंदरमधील अनेक शाळांनी शाळा बंद असतानादेखील सरसकट फी वसुली आणि मागणी चालविल्याने आर्थिक संकटात असलेले पालकवर्ग त्रस्त झाले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना पहिल्या सहामाही परीक्षेला बसू द्यायचे असेल तर आधी शाळेची सांगितलेली सर्व फी भरा, अशी अडवणूक काही शाळांनी सुरू केल्याने हवालदिल झालेल्या पालकांनी आज शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर जमून संताप व्यक्त केला. 

मीरा-भाईंदरमधील अनेक मोठ्या शाळा या राजकारणी, बिल्डर आदींच्या आहेत. एरव्ही मनमानी गलेलठ्ठ फी वसुली करणाऱ्या या शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक मात्र कोरोना संक्रमणामुळे आलेल्या आर्थिक संकटाने हवालदिल झाले आहेत. शहरातील मोठ्या तसेच अन्य शाळा बंद असल्या तरी आता ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणासाठी फारसा खर्च नसताना देखील शाळांनी मात्र नेहमीप्रमाणेची मनमानी शुल्क वसुली चालवली आहे. काही शाळा तर अजूनही कॅंटीन फी, मिसलेनियस शुल्क आकारत आहेत. फी कमी करा सांगितले म्हणून पालकांना वकिलामार्फत नोटिसा दिल्या जात आहेत.   

या विरोधात पालकांनी गेल्या दोन महिन्यांपासून लोकप्रतिनिधी, राजकारणी व प्रशासनाकडे सतत निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या आहेत. मनसे, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष आदींनी देखील दांडगाई करून मनमानी शुल्क वसुली करणाऱ्या शाळांविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी आणि आंदोलन चालवली आहेत. परंतु पालकांना न्याय दिला जात नसला तरी त्यांनी लढा सुरूच ठेवला आहे. आज सोमवारी पालकांनी भाईंदरच्या नगरभवन येथील शिक्षणाधीकारी ऊर्मिला पारधे यांच्या कार्यालयाबाहेर जमून संताप व्यक्त केला. पालक म्हणाले की, घरखर्च चालवणे, घराचे भाडे भरणेदेखील आताच्या संकटात मुश्कील झालेले आहे. एरव्ही शाळेने सांगितली तेवढी फी आम्ही भरत होतो. पण आमची आता आर्थिक परिस्थिती नाही. शाळा बंद असून केवळ ऑनलाइन ट्युशन फी घ्या, टर्म फी घ्या हे समजू शकतो. पण वर्षाची फी नेहमीच सर्व शुल्क लावून शाळा पैसे भरा सांगत आहे. फी नाही भरली तर मुलांना ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे आणि आता सहामाही परीक्षेला बसू देणार नाही असे धमकावले जात आहे, असा संताप पालकांनी व्यक्त केला.

ज्यांची परिस्थिती नाही त्यांना ट्युशन फी भरण्यास मुदत दिली पाहिजे, असे काही पालक म्हणाले. या गंभीर प्रश्नांवर शिक्षणाधिकारी ठोस कार्यवाही करत नाहीत. लोकप्रतिनिधी-राजकारणीदेखील शाळांच्या विरुद्ध बोलायला त्यात नाहीत. कारण काही शाळाच राजकारणी, बिल्डर आदींच्या आहेत, असा आरोप केला जात आहे.