शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

खड्डयांनी घेतला पाचवा बळी, सर्वसामान्यांचा जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 11:45 AM

पावसात हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत

कल्याण - मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे नवीन नाहीत. मात्र पावसात हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. आज कल्याणमधील आणखी एकाचा खड्याने बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसांतील हा पाचवा बळी आहे. 

कल्याण पश्चिमेकडील गांधारी पुल परिसरातील खड्डेमय रस्त्यांनी कल्पेश जाधव या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या 13 दिवसांतील खड्यांमुळे हा पाचवा मृत्यू झाला आहे. पहाटे सव्वाचारच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून घटनेनंतर पसार झालेल्या कंटेनरचालकाचा शोध सुरु असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी दिली. 

(आणखी वाचा : वेदनादायी वास्तव... खड्ड्यामुळे जीव गमावलेल्या मुलासाठी वडील घेऊन आले दही-भात!)

कल्पेश हा पहाटे आपल्या दुचाकीवरुन जात असताना खड्यांमुळे त्याची गाडी स्लीप झाली आणि तो खाली कोसळला. यावेळी मागून भरधाव वेगात आलेला कंटेनर  त्याच्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. भिवंडी तालुक्यातील नांदकर येथील रहिवासी असलेला कल्पेश याचा मटेरियल सप्लायरचा व्यवसाय होता. 

कल्याण नजीकच्या द्वारली परिसरात खड्डयामुळे अण्णा नामक पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवारी घडली होती. तर याआधी शिवाजी चौकात रस्त्याच्या असमतोलपणामुळे आरोह आतराळे आणि मनीषा भोईर या दोघांचा बळी गेल्याची घटना अनुक्रमे २ जून आणि ७ जुलैला घडली आहे. 

कल्याण-डोंबिवलीत खड्डे भरण्यासाठी १३.९० कोटींचे कंत्राट

महापालिकेत खड्डे बुजवण्यासाठी खडी-मातीचा भराव टाकण्यासह पावसाने उघडीप घेतल्यावर आवश्यकतेनूसार डांबरीकरण करण्यासाठी १३.९० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यापैकी डोंबिवलीसाठी ६ कोटी ९० लाखांची तरतूद असल्याची माहिती डोंबिवली विभागीय अभियंता प्रशांत भुजबळ यांनी दिली. त्यामध्ये शहरातील ह, फ, ग, आय आणि जे असे पाच प्रभाग मिळून काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Potholeखड्डेAccidentअपघात