शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
3
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
4
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
5
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
6
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
7
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
8
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक, दमदार लूक समोर
9
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
10
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
11
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
12
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
13
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
14
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
15
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
16
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
17
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
18
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली

हंडाभर पाण्यासाठी रात्रभर विहिरीवर..! गावपाड्यांमध्ये पाणीटंचाईचे विदारक चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 3:50 AM

ठाण्यासह मुंबईचीही तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांना पाणीटंचाईचे असह्य चटके सोसावे लागत आहेत.

- जनार्दन भेरेभातसानगर : ठाण्यासह मुंबईचीही तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांना पाणीटंचाईचे असह्य चटके सोसावे लागत आहेत. हंडाभर पाण्यासाठी मध्यरात्रीपासूनच विहिरीवर थांबावे लागत असल्याने या भागातील ग्रामस्थ पुरते हैराण झाले आहेत.शहापूर तालुक्यातील गोलभन, अजनुप, गायदरा, कोळीपाडा इत्यादी गावांमधील पाणीटंचाईचा आढावा घेतला असता, येथील विदारक परिस्थिती उघड झाली. विहिरीमध्ये थेंबथेंब साठणारे पाणी घेण्यासाठी गावपाड्यांचे रहिवासी मध्यरात्रीपासूनच नंबर लावतात.कोळीपाड्यासाठी गावाच्या बाजूला एक विहीर बांधली खरी; मात्र या विहिरीतील पाणी दिवाळीदरम्यानच संपले. तेव्हापासूनच या पाड्याचा पाण्यासाठीचा वनवास सुरू झाला. आजमितीस या पाड्यातील नागरिक जे पाणी पितात, ते पाहून कुणाचेही काळीज धस्स झाल्याशिवाय राहणार नाही.या पाड्याच्या बाजूला इमारतीच्या कामासाठी बांधला जातो तसा लहानसा हौद आहे. यातील गुडघाभर पाण्यात बेडूक मरण पावले आहेत. हे हिरवेगार दुर्गंधीयुक्त पाणी झिरपून १०० मीटर अंतरावरील एका दगडाच्या कपारीतून बाहेर येते. हे पाणी पेल्यापेल्याने घेऊन आपला हंडा भरण्याचे काम येथील महिला करतात. हेच पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात.वापरण्यासाठी तर अतिशय घाणेरडे पाणी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. केवळ निवडणुकीच्यावेळी आमची आठवण राजकारणी लोकांना होते. नंतर, मात्र आमच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.तालुक्यातील सर्व गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, त्यांना तत्काळ टँकरने पाणी पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.- पांडुरंग बरोरा, आमदार, शहापूरआमच्या गावात पाण्याची भीषण पाणीटंचाई असून हंडाभर पाण्यासाठी मध्यरात्रीपासूनच विहिरीवर ठाण मांडावे लागते. पाण्यासाठीच दिवसरात्र घालवावा लागत असल्याने त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या कामधंद्यावर होत आहे. - भारती कैलास जाधव,ग्रामस्थ, कोळीपाडा

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे