शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

बेकायदा बांधकामे वाचवण्यासाठी लपाछपीचा खेळ, भार्इंदर पालिकेचा कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 4:21 AM

मीरा-भार्इंदरमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी नगररचना विभाग आणि प्रभाग अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

मीरा रोड - मीरा-भार्इंदरमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी नगररचना विभाग आणि प्रभाग अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. नगररचना विभाग बांधकाम अनधिकृत वा अधिकृत असल्याचे स्पष्ट करत नाही. तर, प्रभाग अधिकारीही नगररचना विभागाचा अहवाल आल्यावर कारवाई करू, असे पालूपद लावत आहेत. बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यासाठी पाठशिवणीचा खेळ चालवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने या खेळात पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांपासून काही बडे लोकप्रतिनिधीही सहभागी असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.बेकायदा बांधकामांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आयुक्त, अतिक्रमण विभाग, प्रभाग अधिकारी व नगररचना विभागाकडे होत असतात. स्थानिक लोकप्रतिनिधी, वजनदार नेत्यांपासून अधिकाºयांचा आशीर्वाद असल्याने तक्रारी होऊनही ठोस कारवाई होत नाही. तक्रारदार जास्तच पाठपुरावा करू लागला की, प्रभाग अधिकारी मग नगररचना विभागाला पत्र पाठवून माहिती विचारतात. पण, नगररचना विभाग बेकायदा बांधकामाच्या कारवाईची बाब आपल्या अखत्यारित नसल्याचे उगाळून चोथा झालेले उत्तर अतिक्रमण विभागास टोलवतात. प्रभाग अधिकारीही नगररचनेकडून माहिती आली नसल्याचे पालूपद लावतात.वास्तविक, नगररचना विभागाने माहिती देताना तक्रारीत नमूद बांधकाम अधिकृत की अनधिकृत आहे, याचा स्पष्ट अभिप्राय दिला पाहिजे. पण, तसे होत नाही. तर, प्रभाग अधिकाºयासही बांधकामधारकास नोटीस बजावणे, कागदपत्रे मागवणे, सुनावणी घेऊन निर्णय देणे, कारवाई करण्याचे अधिकार असूनही बेकायदा बांधकाम वाचवण्यासाठी नगररचना विभागाकडे बोट दाखवले जाते.वरिष्ठांकडूनही प्रभाग अधिकारी आणि नगररचना अधिकाºयांना पाठीशी घातले जाते. बेकायदा बांधकामांमध्ये आर्थिक उलाढाल होत असल्यानेच लोकप्रतिनिधींपासून अधिकारी ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी केला आहे.काशिमीरा येथील अग्रवाल ग्रीन व्हिलेज वसाहतीमध्ये आठ बेकायदा गाळे बांधण्यात आल्याची तक्रार आॅक्टोबरपासून चार वेळा सरकारपर्यंत केली गेली. पण, प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांनी नगररचना विभागाचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी उत्तरे दिली. तक्रारदाराने पाठपुरावा केल्यावर बोरसे यांनी पाच महिन्यांनी म्हणजे २७ फेब्रुवारीला नोटीस बजावण्याचे काम प्रस्तावित असल्याचे लेखी उत्तरदिले. नगररचनाकार हेमंत ठाकूर यांनीही आपली जबाबदारी नसल्याचे सांगत तक्रार अर्ज अतिक्रमण विभागाकडे ढकलून दिला. सामान्य नागरिकांसाठी तर पालिका कार्यालये आणि त्यातील अधिकारी छळछावणीपेक्षा वेगळे नाहीत, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.नगररचना विभागास तक्रारीनुसार स्वयंस्पष्ट अभिप्राय देण्याची तसेच प्रभाग अधिकाºयाची बेकायदा बांधकामांवर वेळीच कारवाईची जबाबदारी आहे. याचा आढावा घेऊन अधिक मनुष्यबळ दिले जाईल. बेकायदा बांधकामे तोडण्याची कारवाई केली जाईल. - सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक