शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

अंबरनाथमध्ये १६ विद्यार्थ्यांमागे केवळ एक शिक्षकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 02:52 IST

अंबरनाथ नगर परिषदेच्या १९ शाळेत एक हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील बहुभाषिक शाळेत विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे.

- पंकज पाटीलअंबरनाथ नगर परिषदेच्या १९ शाळेत एक हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील बहुभाषिक शाळेत विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. शहरातील इतर शाळांमध्ये नावापुरते विद्यार्थी राहिले आहेत. लोकलबोर्ड शाळा, मोरीवली माध्यमिक शाळा, वडवली शाळा वगळता इतर शाळेत विद्यार्थ्यांची संख्या ही अत्यल्प राहिली आहे. अंबरनाथ पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक, गणवेश आणि पोषण आहार वेळेवर मिळत असला तरी या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल दिसत नाही. पालिकेतील दोन शाळांमध्ये इ-लर्निंग यंत्रणा कार्यान्वित केलेली असतांनाही मोजक्याच विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे. पालिका क्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा देखील पालिकेकडे वर्ग कराव्या, अशी मागणी शिक्षक करीत आहेत. मात्र त्यांची मागणी ही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना बदली यंत्रणेतून मुक्तता मिळावी यासाठी होत आहे. त्यामुळे पालिका जिल्हा परिषदेच्या शाळा ताब्यात घेण्याकरिता पुढाकार घेतांना दिसत नाही. १९ शाळांची अवस्था ही अत्यंत बिकट आहे. या शाळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम सातत्याने केले जाते. त्यासाठी निधी खर्च केला जात आहे. प्रत्यक्षात शाळांची देखरेख होत नाही. शाळा आजही कोंदट वातावरणात असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळांची परिस्थिती सुधारत नसल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढत नाही.कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीत पालिकेच्या १७ शाळा आहेत. या शाळा जिल्हा परिषदेकडून पालिकेने ताब्यात घेतल्या होत्या. त्या ताब्यात घेण्यावरुन काही वर्षांपूर्वी वाद झाला होता. मात्र पालिकेने या सर्व शाळा ताब्यात घेऊन काम सुरु केले होते. शाळा ताब्यात घेतल्यावर अपेक्षित प्रतिसाद पालिकेला लाभला नव्हता. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ही घटत होती. त्यामुळे पालिकेच्या शाळांकडे पुन्हा दुर्लक्ष झाले होते. गेल्या तीन ते चार वर्षात पालिकेने विलास जडे या अधिकाऱ्याची नेमणूक करुन शाळेत परिवर्तन घडवण्याचे काम केले. शाळेतील अभ्यासक्रमासोबत विविध उपक्रम राबवले गेल्याने विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गणित, इंग्रजी आणि भाषेसाठी स्वतंत्र उपक्रम आणि मार्गदर्शन शिबिर घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम झाला आहे. पालिकेच्या शाळांची ढासाळलेली स्थिती सुधारण्याचे काम पालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत झाले आहे.अंबरनाथ नगर परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत आहे. पालिकेच्या १९ शाळा असून त्या शाळेत शिकवण्यासाठी ९६ शिक्षक आहेत. मात्र, एवढी शिक्षकसंख्या असतानाही विद्यार्थ्यांची संख्या मात्र सातत्याने घटताना दिसत आहे. पालिकेमार्फत विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी खास उपक्रम हाती घेतले नाहीत. त्यामुळे सर्वांचाच कल हा पालिका शाळा सोडून खाजगी शाळेकडे वाढत आहे

टॅग्स :ambernathअंबरनाथEducationशिक्षणSchoolशाळा