शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर, सामान्यांचे कंबरडे मोडले; बटाट्यानेही गाठले अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 11:31 AM

गेल्या काही दिवसांपासून कांद्यांचे दर वाढतच आहेत. पाहतापाहता कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे.

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा आता शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यापाठोपाठ बटाट्यानेही उच्चांक गाठला आहे. कोरोनाने अगोदरच खिशाला कात्री लावलेली असताना कांदा, बटाट्याच्या वाढलेल्या दराने कंबरडे मोडले असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कांद्यांचे दर वाढतच आहेत. पाहतापाहता कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे. कांद्यापाठोपाठ बटाटाही महाग होत चालला आहे. रोजच्या जेवणात कांदा हा अविभाज्य घटक असून, बटाट्यालाही नेहमीच मागणी जास्त असतो. मात्र या वाढलेल्या भावाने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले आहेत.  अहमदनगर, पुणे, नाशिक येथून कांद्यांची आवक होते. जुना कांदा संपत आल्याने माल कमी पडत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याची आवक मंदावली आहे. पावसामुळे नवीन कांदा येत नाही आणि पिकेही लांबण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढे कांदा शंभरीच्या वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कांदा, बटाट्याचे व्यापारी संदीप चौधरी यांनी सांगितले.

बटाट्याची सर्वाधिक आवक ही उत्तरप्रदेशमधून होते. गेल्यावर्षी त्या ठिकाणी बटाट्याचे अपेक्षित उत्पादन न झाल्याने त्याचा परिणाम यावर्षीच्या आवकवर होत आहे. या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये बटाट्याची लागवड केली जात आहे.त्यामुळे लागवडीसाठीही बटाटा लागत आहे. या आणि इतर कारणांमुळे मागणीच्या तुलनेत बटाट्याचा माल येणे कमी झाल्यामुळे भाव वाढले आहेत. सर्वसाधारण बटाटा २५ ते ३० रुपये किलोप्रमाणे विकला जातो. परंतु, यंदा ५० वर येऊन पोहोचला असल्याचे चौधरी यांनी सांगितले. 

टॅग्स :onionकांदाthaneठाणेMarketबाजार