शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कांदा साठवणुकीवर शिधावाटप विभागाची नजर; ३१ ठिकाणी तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 06:52 IST

घाऊक विक्रेत्यांना २५, किरकोळ विक्रेत्यांना ५ टनाची मर्यादा

ठाणे : कांद्याची टंचाई निर्माण झाल्याने त्याचे दरही लगेच तितकेच गगनाला भिडले. त्यातून कांद्याचा साठेबाजार होण्याची शक्यता असल्याने शिधावाटप विभागाने घाऊकसह किरकोळ व्यापाऱ्यांवर नजर ठेवण्यास सुुरुवात केली आहे. त्यानुसार शिधावाटप विभागाने ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, कल्याण आदी ३१ ठिकाणी तपासणी केली.

आतापर्यंतच्या तपासणीत कुठेही कांद्यांची साठवणूक झाली नसल्याचे समोर आले नाही. त्यामुळे ही तपासणी पुढील सूचना येईपर्यंत अशीच सुरू राहिल,अशी माहिती सूत्रांनी दिली. अशाप्रकारे या विभागामार्फत तपासणी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले आहे.

जीवनाश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाल्यावर त्या पदार्थाची साठवणूक होण्याची शक्यता निर्माण केली जाते. त्यानुसार केंद्र शासनाने ३ डिसेंबर रोजी एक अधिसूचना जाहिर केली आहे. यामध्ये घाऊक विक्रेत्यांना २५ मेट्रिक टन तर किरकोळ विक्रेत्यांना ५ मेट्रिक टन साठवून करण्याची परवानगी दिली आहे. तत्पूर्वी म्हणजे २९ सप्टेंबर २०१९ च्या केंद्राच्या अधिसूचनेनुसार घाऊक विक्रेत्यांना ५० क्विंटलतर किरकोळ विक्रेत्यांना १० क्विंटल साठवून करण्याची परवानगी देण्यात आली होती.

३ डिसेंबरच्या अधिसूचनेमध्ये घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी कुठे कांदा साठवून ठेवला आहे का? याची पाहणी करण्याचे आदेश शिधावाटप विभागाला दिले गेले. ते आदेश ५ डिसेंबरला आल्याने तातडीने तीन पथक तयार करू त्यामार्फत त्याच दिवसापासून तपासणीला सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यत नवी मुंबई, कल्याण आणि भिवंडी येथील बाजार समितींसह ठाणे,डोंबिवली, भार्इंदर, बदलापूर आदी परिसरात तपासणी केली. यादरम्यान कुठेही साठवणूक केल्याचा प्रकार पुढे आलेला नाही. मात्र, ही तपासणी पुढील अधिसूचना येईलपर्यंत अशीच सुरू ठेवण्यात येणार आहे.

...तर साठा तत्काळ जप्तसाठ्याची तपासणी करताना त्या विक्रेत्यांच्या रजिस्टरवरील खरेदी-विक्रीची पाहणी केली जात आहे. जर एखाद्या ठिकाणी साठा अधिसूचनेपेक्षा अधिक प्रमाणात निदर्शनास आल्यास तो तातडीने जप्त केला जाईल, असे ही संबंधित विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

टॅग्स :onionकांदाPoliceपोलिसfraudधोकेबाजीMaharashtraमहाराष्ट्र