शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कांदा साठवणुकीवर शिधावाटप विभागाची नजर; ३१ ठिकाणी तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 06:52 IST

घाऊक विक्रेत्यांना २५, किरकोळ विक्रेत्यांना ५ टनाची मर्यादा

ठाणे : कांद्याची टंचाई निर्माण झाल्याने त्याचे दरही लगेच तितकेच गगनाला भिडले. त्यातून कांद्याचा साठेबाजार होण्याची शक्यता असल्याने शिधावाटप विभागाने घाऊकसह किरकोळ व्यापाऱ्यांवर नजर ठेवण्यास सुुरुवात केली आहे. त्यानुसार शिधावाटप विभागाने ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, कल्याण आदी ३१ ठिकाणी तपासणी केली.

आतापर्यंतच्या तपासणीत कुठेही कांद्यांची साठवणूक झाली नसल्याचे समोर आले नाही. त्यामुळे ही तपासणी पुढील सूचना येईपर्यंत अशीच सुरू राहिल,अशी माहिती सूत्रांनी दिली. अशाप्रकारे या विभागामार्फत तपासणी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले आहे.

जीवनाश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाल्यावर त्या पदार्थाची साठवणूक होण्याची शक्यता निर्माण केली जाते. त्यानुसार केंद्र शासनाने ३ डिसेंबर रोजी एक अधिसूचना जाहिर केली आहे. यामध्ये घाऊक विक्रेत्यांना २५ मेट्रिक टन तर किरकोळ विक्रेत्यांना ५ मेट्रिक टन साठवून करण्याची परवानगी दिली आहे. तत्पूर्वी म्हणजे २९ सप्टेंबर २०१९ च्या केंद्राच्या अधिसूचनेनुसार घाऊक विक्रेत्यांना ५० क्विंटलतर किरकोळ विक्रेत्यांना १० क्विंटल साठवून करण्याची परवानगी देण्यात आली होती.

३ डिसेंबरच्या अधिसूचनेमध्ये घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी कुठे कांदा साठवून ठेवला आहे का? याची पाहणी करण्याचे आदेश शिधावाटप विभागाला दिले गेले. ते आदेश ५ डिसेंबरला आल्याने तातडीने तीन पथक तयार करू त्यामार्फत त्याच दिवसापासून तपासणीला सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यत नवी मुंबई, कल्याण आणि भिवंडी येथील बाजार समितींसह ठाणे,डोंबिवली, भार्इंदर, बदलापूर आदी परिसरात तपासणी केली. यादरम्यान कुठेही साठवणूक केल्याचा प्रकार पुढे आलेला नाही. मात्र, ही तपासणी पुढील अधिसूचना येईलपर्यंत अशीच सुरू ठेवण्यात येणार आहे.

...तर साठा तत्काळ जप्तसाठ्याची तपासणी करताना त्या विक्रेत्यांच्या रजिस्टरवरील खरेदी-विक्रीची पाहणी केली जात आहे. जर एखाद्या ठिकाणी साठा अधिसूचनेपेक्षा अधिक प्रमाणात निदर्शनास आल्यास तो तातडीने जप्त केला जाईल, असे ही संबंधित विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

टॅग्स :onionकांदाPoliceपोलिसfraudधोकेबाजीMaharashtraमहाराष्ट्र