शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अमृत आहार, व्हीसीडीसी योजनेमुळे कुपोषण घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 01:15 IST

अमृत आहार आणि व्हीसीडीसी योजना प्राधान्याने राबविल्याने ४५ गावातील कुपोषण मोठ्या प्रमाणात घटले आहे.

कर्जत : बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी डॉ. अमृत कलाम अमृत आहार योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फायदा कर्जत तालुक्यातील आदिवासी भागाला मोठ्या प्रमाणात झाला आहे. दरम्यान, अमृत आहार आणि व्हीसीडीसी योजना प्राधान्याने राबविल्याने ४५ गावातील कुपोषण मोठ्या प्रमाणात घटले आहे.राज्यात काही जिल्ह्यात कुपोषण मोठ्या प्रमाणात असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यातील १६ जिल्ह्यातील एकात्मिक बाल कल्याणच्या ४५ प्रकल्पात अमृत आहार योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यात कर्जत तालुक्यातील ४५ गावातील १३५ अंगणवाड्या यांचा समावेश अमृत आहार योजनेत केला गेला. २०१६ मध्ये १३५ अंगणवाड्या मधील तब्बल ४१०४ बालकांना अतिरिक्त पोषण आहार देण्यास सुरुवात झाली. त्यांना अंडे किंवा फळे देतानाच कुपोषणाचे मूळ समजल्या जाणाऱ्या गरोदर माता यांच्या पोटी जन्मलेली बालके सुदृढ व्हावी यासाठी सकस आहार दिला जाऊ लागला. त्याचवेळी स्तनदा माता यांना देखील सकस आहार देण्यास सुरु वात झाल्याने कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी होण्यास सुरु वात झाली. २०१८ मध्ये ही मोहीम आणखी प्रभावीपणे राबविताना १३५ अंगणवाड्यांमध्ये येणाºया ३८११ बालके आणि एक हजाराहून गरोदर महिला, स्तनदा माता यांना पोषण आणि सकस आहार दिला जात आहे.त्याचा फायदा आदिवासी आणि दुर्गम भागातील अंगणवाड्यांमध्ये येणाºया बालकांना सुदृढ होण्यात झाला आहे. १३५ अंगणवाड्यांमध्ये अमृत आहार योजना सुरू असताना अन्य भागातील कुपोषित बालके सुदृढ व्हावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती उमा मुंढे यांनी स्वत: पुढाकार घेऊन सावरगाव येथे व्हीसीडीसी केंद्र सुरू केले.तालुक्यात आज २३ अंगणवाड्यांत व्हीसीडीसी केंद्र आणि १३५ अंगणवाड्यात अमृत आहार योजना यामुळे कर्जत या कुपोषणाचा तालुका समजल्या जाणाºया तालुक्यातील कुपोषण खाली आले आहे.त्या ठिकाणी अशी केंद्रे सुरू होण्याआधी २३ अतितीव्र कुपोषित म्हणजे सॅम गटातील आणि १९ मध्यम कुपोषित म्हणजे मॅम श्रेणी मधील बालके होती. या दोन्ही योजना मुळे मॅम श्रेणीमध्ये असलेली सर्व १९ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत तर सॅम श्रेणीमधील बालके यांची संख्या १३ पर्यंत खाली आली आहे.रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये कुपोषणावर नियंत्रण आणले असून अमृत आहार योजना आणि व्हीसीडीसी यांचा फायदा झाला आहे. व्हीसीडीसी सुरू करून जिल्ह्यातील काही तालुक्यात असलेले कुपोषण खाली आणण्यात आम्ही यशस्वी होत आहोत.- राजन सांबरे, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयKarjatकर्जत