शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दुचाकीला वापरला ट्रकचा क्रमांक, जमील शेख हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 1:34 AM

उत्तर प्रदेश एसटीएफचीही घेणार मदत : जमील शेख हत्याकांड

जितेंद्र कालेकरठाणे : मनसेचे राबोडीतील पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येसाठी वापरलेल्या दुचाकीसाठी ठाणे जिल्ह्यातील एका ट्रकचा क्रमांक वापरल्याची माहिती समोर आली आहे. मारेकरी उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये पळाल्याची शक्यता गृहीत धरून त्यासाठी गरज पडली तर यूपीच्या स्पेशल टास्क फोर्सचीही (एसटीएफ) मदत घेतली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

हल्लेखोरांनी ज्या पद्धतीने अगदी दिवसाढवळ्या सहजतेने जमील यांच्यावर गोळ्या झाडून पलायनही केले. त्यावरून स्थानिक कोणीतरी हल्लेखोरांना इत्थंभूत माहिती दिल्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणाचा राबोडी पोलिसांबरोबर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही समांतर तपास सुरू आहे. त्यासाठी पाच पथकांची निर्मिती केली आहे. एका सीसीटीव्हीच्या चित्रणानुसार हल्लेखोरांनी राबोडीतून बाहेर पडताना केव्हीला मार्गाने जिल्हा मध्यवर्ती कारागृह त्यानंतर कळवा ब्रिजच्या दिशेने पलायन केले. बुधवारी दिवसभरात सात ते आठ संशयितांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी चौकशी केली. मात्र, यातून ठोस माहिती मिळाली नाही.

दरम्यान, जमील यांचे पार्थिव बुधवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी आणले. आरोपी कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही, असे आश्वासन पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिल्यानंतर दुपारी शोकाकुल वातावरणात दफनविधी पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते तसेच राबोडीतील रहिवासी उपस्थित होते. अनेकांनी त्यांच्या उजव्या खांद्याला निषेधाची कापडी पट्टी बांधली होती.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी