शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

बेघरांची संख्या एक कोटी ५० लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 01:49 IST

मुंबईत १९९५ मध्ये ४० लाख लोक बेघर होते. आता ही बेघरांची संख्या ७० लाखांच्या घरात पोहोचली आहे,

जान्हवी मोर्येडोंबिवली : मुंबईत १९९५ मध्ये ४० लाख लोक बेघर होते. आता ही बेघरांची संख्या ७० लाखांच्या घरात पोहोचली आहे, तर एमएमआर क्षेत्रात दीड कोटी लोक बेघर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याची केलेली घोषणा केवळ कागदावर आहे. सरकारने बेघरांना स्वस्त दरात जमीन दिली, तर तेच त्यावर साधी घरे बांधतील, असे निवारा अभियान मुंबईचे सरचिटणीस विश्वास उटगी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मोदी यांनी देशातील प्रत्येकाला २०२२ पर्यंत घर देण्याची घोषणा केली असली, तरी राज्यातील भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत सरकारतर्फे दिली जाणारी घरे कागदावरदेखील दिलेली नाहीत, असा आरोप उटगी यांनी केला.उटगी यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये उद्योगांना दिलेली जमीन सरकारने पुन्हा ताब्यात घेऊन त्यावर परवडणारी घरे बांधण्याचा दिलेला निर्णय अनुकूल करवून घेण्याकरिता २०१७ मध्ये निवृत्त न्या. श्रीकृष्ण समिती नेमून त्यांना शिफारस देण्यास सांगितले. उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर त्यावर समिती नेमणे, हेच मुळात चुकीचे आहे. या समितीने जमिनी परत घेणे तसेच बेकायदेशीर जमिनींचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करा, हे न्यायालयाचे आदेश अव्हेरून सिंगल प्रीमिअम आकारून विकण्याची शिफारस न्या. श्रीकृष्ण यांनी सुचवली व सरकारने ती मंजूर केली. ही जमीन रेडीरेकनरच्या १० ते २० टक्के दराने विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकार गोरगरिबांना परवडणारी घरे देण्याकरिता आहे की, बिल्डरांना जमिनी विकण्याकरिता, असा प्रश्न निर्माण होतो. हा राफेलपेक्षा हजारो पटीने मोठा घोटाळा भाजप सरकारने केला आहे, असे उटगी यांचे म्हणणे आहे. सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्याकरिता आम्ही उच्च व सर्वाेच्च न्यायालयात गेलो. सर्वोच्च न्यायालयाने तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ नियुक्त करून निर्णय करावा, असे कोर्टाने म्हटले आहे. सरकार आणि बिल्डर यांच्यात गेल्या पाच वर्षांत जी कटकारस्थाने शिजली, ती मोडीत काढण्यात यशस्वी होऊ, अशी आशा निर्माण झाली आहे. लोकांना आम्ही आता जागे करत आहोत. एमएमआर कार्यक्षेत्रात एक कोटी ५० लाख लोक बेघर आहेत. त्यांना घराची गरज आहे. त्यांना निवारा अभियान संस्थांचे सभासद करून घेत आहोत. लालसिंग गोरे यांच्या मॉडेलवर ही चळवळ सुरू आहे. संस्थेच्या मुंबईत अनेक बैठका झाल्या आहेत. कॅबिनेटमध्ये बिल्डर संघटना आणि सरकारच्या मंत्रिमंडळाने हातमिळवणी केल्याचे नोव्हेंबरमध्ये आम्हाला समजले व यामुळे मुंबई आणि एमएमआरडीएची जमीन कवडीमोल भावाने विकली जाणार आणि सर्वसामान्य माणूस येथून कायमचा परागंदा होणार, हे समजले तेव्हाच आम्ही ही चळवळ पुन्हा सुरू केली आहे.आम्ही प्रथम सभासद नोंदणी करत आहोत. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जमीन दिल्यावरच आम्ही सोसायटी उभारू शकतो.>निवारा परिषदेने बांधली सहा हजार ५०० घरेया निवडणुकीच्या पूर्वीच आमच्याकडे एवढे सभासद आहेत की, आम्हाला स्वस्त घरांकरिता जमीन द्या, नाहीतर त्यांना ‘चालते व्हा’चा इशारा आम्ही सरकारला दिला आहे. ज्या सरकारने बिल्डरांना जमिनी दान दिल्या आहेत, त्यांना निवडून देणे चुकीचे होईल, असे उटगी म्हणाले. कॉर्पोरेट बिल्डर जमिनी गिळकृंत करत आहेत. आम्हाला जमीन स्वस्तात हवी आहे. आम्हाला ‘इटालियन मार्बल’ची घरे नकोत, तर आम्हाला ‘साधी घरे’ हवी आहेत. १९९० नंतर कोणालाच घरे मिळालेली नाहीत. नागरी निवारा परिषदेतर्फे सहकारी तत्त्वावर ६५०० घरे बांधली होती. त्यानंतर, कुणालाच परवडणारी घरे मिळाली नसल्याने बेघरांची संख्या वाढल्याचे उटगी म्हणाले.

टॅग्स :Homeघर