शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आता अखंड हिंदू राष्ट्राचे तात्यारावांचे स्वप्न पूर्ण होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 00:36 IST

स्वातंत्र्यवीरांच्या स्रुषा सुंदरबाई सावरकर : मोदी सरकारचा सावरकरांनाही आनंद झाला असता

ठाणे : आता आपलं सरकार आलं आहे. हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं, अशीच तात्यारावांची इच्छा होती. त्यामुळे आज तात्याराव अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर असते, तर त्यांनाही आनंद झाला असता. हे सरकार आल्याने सगळ्यांची भरभराट होईल, सगळ्यांना चांगले दिवस येतील आणि लवकरच राम मंदिर बांधले जाईल, असा विश्वास वाटतो, असे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्रुषा सुंदरबाई सावरकर यांनी काढले.

ठाण्यातील पुस्तक आदानप्रदान महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला सुंदरबाई तसेच सावरकरांची नात असिलता राजे उपस्थित होत्या. यावेळी ‘जयोस्तुते’ पुस्तकाच्या लेखिका साधना जोशी यांनी सुंदरबाई यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. लग्नापूर्वी मला स्वातंत्र्यवीर सावरकर अर्थात तात्याराव हे फक्त कवी म्हणूनच माहीत होते. पण, लग्नानंतर तात्यारावांच्या थोर कार्याची माहिती झाली. माझे आणि विश्वासरावांचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने झाले. कारण, त्याचदरम्यान गांधीजींची हत्या झाली होती. सासरी घरात वातावरण अतिशय कडक आणि शिस्तशीर होते. कोणतीही गोष्ट ही वेळेतच व्हावी, असा तात्यारावांचा आग्रह असायचा.

तात्यारावांच्या भाषणांना कुटुंबातील व्यक्तींनी सुरक्षेच्या कारणास्तव येऊ नये, असे ते कायम म्हणायचे. तरीही, एकदा मी त्यांचे भाषण ऐकायला गेले होते. ते समजल्यावर तात्याराव माझ्यावर रागावले होते, असेही सुंदरबाई यांनी सांगितले. तात्याराव विज्ञाननिष्ठ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नातीचा जन्म झाला, तेव्हा मात्र घरी आल्यावर त्यांनी तिची दृष्ट काढण्यास सांगितले, ही आठवण सांगताना त्यांनी तात्यारावांच्या कुटुंबवत्सलतेचा दाखला दिला. तात्याराव माईंशी बोलताना अनेकदा अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षेबद्दल बोलायचे. मात्र, कधीही त्यांच्या डोळ्यांत पाणी आलेले मी पाहिले नाही. माईंचे निधन झाल्याची वार्ता जेव्हा तात्यारावांना समजली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आणि माई गेली, तिचं सोनं झालं, असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

त्याकाळी आमच्या घरी मंगेशकर कुटुंबीयांचे येणेजाणे असायचे. दीनानाथ मंगेशकर नाटकासंदर्भात चर्चा करण्यासाठी यायचे. तर, लतादीदी गप्पा मारायला यायच्या. तात्याराव आणि लतादीदीचे तर वडील-मुलीप्रमाणे नाते होते, असेही सुंदरबाई म्हणाल्या.

टॅग्स :HinduहिंदूNarendra Modiनरेंद्र मोदी