शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

आता अखंड हिंदू राष्ट्राचे तात्यारावांचे स्वप्न पूर्ण होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 00:36 IST

स्वातंत्र्यवीरांच्या स्रुषा सुंदरबाई सावरकर : मोदी सरकारचा सावरकरांनाही आनंद झाला असता

ठाणे : आता आपलं सरकार आलं आहे. हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं, अशीच तात्यारावांची इच्छा होती. त्यामुळे आज तात्याराव अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर असते, तर त्यांनाही आनंद झाला असता. हे सरकार आल्याने सगळ्यांची भरभराट होईल, सगळ्यांना चांगले दिवस येतील आणि लवकरच राम मंदिर बांधले जाईल, असा विश्वास वाटतो, असे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्रुषा सुंदरबाई सावरकर यांनी काढले.

ठाण्यातील पुस्तक आदानप्रदान महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला सुंदरबाई तसेच सावरकरांची नात असिलता राजे उपस्थित होत्या. यावेळी ‘जयोस्तुते’ पुस्तकाच्या लेखिका साधना जोशी यांनी सुंदरबाई यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. लग्नापूर्वी मला स्वातंत्र्यवीर सावरकर अर्थात तात्याराव हे फक्त कवी म्हणूनच माहीत होते. पण, लग्नानंतर तात्यारावांच्या थोर कार्याची माहिती झाली. माझे आणि विश्वासरावांचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने झाले. कारण, त्याचदरम्यान गांधीजींची हत्या झाली होती. सासरी घरात वातावरण अतिशय कडक आणि शिस्तशीर होते. कोणतीही गोष्ट ही वेळेतच व्हावी, असा तात्यारावांचा आग्रह असायचा.

तात्यारावांच्या भाषणांना कुटुंबातील व्यक्तींनी सुरक्षेच्या कारणास्तव येऊ नये, असे ते कायम म्हणायचे. तरीही, एकदा मी त्यांचे भाषण ऐकायला गेले होते. ते समजल्यावर तात्याराव माझ्यावर रागावले होते, असेही सुंदरबाई यांनी सांगितले. तात्याराव विज्ञाननिष्ठ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नातीचा जन्म झाला, तेव्हा मात्र घरी आल्यावर त्यांनी तिची दृष्ट काढण्यास सांगितले, ही आठवण सांगताना त्यांनी तात्यारावांच्या कुटुंबवत्सलतेचा दाखला दिला. तात्याराव माईंशी बोलताना अनेकदा अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षेबद्दल बोलायचे. मात्र, कधीही त्यांच्या डोळ्यांत पाणी आलेले मी पाहिले नाही. माईंचे निधन झाल्याची वार्ता जेव्हा तात्यारावांना समजली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आणि माई गेली, तिचं सोनं झालं, असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

त्याकाळी आमच्या घरी मंगेशकर कुटुंबीयांचे येणेजाणे असायचे. दीनानाथ मंगेशकर नाटकासंदर्भात चर्चा करण्यासाठी यायचे. तर, लतादीदी गप्पा मारायला यायच्या. तात्याराव आणि लतादीदीचे तर वडील-मुलीप्रमाणे नाते होते, असेही सुंदरबाई म्हणाल्या.

टॅग्स :HinduहिंदूNarendra Modiनरेंद्र मोदी