शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आता अखंड हिंदू राष्ट्राचे तात्यारावांचे स्वप्न पूर्ण होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 00:36 IST

स्वातंत्र्यवीरांच्या स्रुषा सुंदरबाई सावरकर : मोदी सरकारचा सावरकरांनाही आनंद झाला असता

ठाणे : आता आपलं सरकार आलं आहे. हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं, अशीच तात्यारावांची इच्छा होती. त्यामुळे आज तात्याराव अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर असते, तर त्यांनाही आनंद झाला असता. हे सरकार आल्याने सगळ्यांची भरभराट होईल, सगळ्यांना चांगले दिवस येतील आणि लवकरच राम मंदिर बांधले जाईल, असा विश्वास वाटतो, असे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्रुषा सुंदरबाई सावरकर यांनी काढले.

ठाण्यातील पुस्तक आदानप्रदान महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला सुंदरबाई तसेच सावरकरांची नात असिलता राजे उपस्थित होत्या. यावेळी ‘जयोस्तुते’ पुस्तकाच्या लेखिका साधना जोशी यांनी सुंदरबाई यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. लग्नापूर्वी मला स्वातंत्र्यवीर सावरकर अर्थात तात्याराव हे फक्त कवी म्हणूनच माहीत होते. पण, लग्नानंतर तात्यारावांच्या थोर कार्याची माहिती झाली. माझे आणि विश्वासरावांचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने झाले. कारण, त्याचदरम्यान गांधीजींची हत्या झाली होती. सासरी घरात वातावरण अतिशय कडक आणि शिस्तशीर होते. कोणतीही गोष्ट ही वेळेतच व्हावी, असा तात्यारावांचा आग्रह असायचा.

तात्यारावांच्या भाषणांना कुटुंबातील व्यक्तींनी सुरक्षेच्या कारणास्तव येऊ नये, असे ते कायम म्हणायचे. तरीही, एकदा मी त्यांचे भाषण ऐकायला गेले होते. ते समजल्यावर तात्याराव माझ्यावर रागावले होते, असेही सुंदरबाई यांनी सांगितले. तात्याराव विज्ञाननिष्ठ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नातीचा जन्म झाला, तेव्हा मात्र घरी आल्यावर त्यांनी तिची दृष्ट काढण्यास सांगितले, ही आठवण सांगताना त्यांनी तात्यारावांच्या कुटुंबवत्सलतेचा दाखला दिला. तात्याराव माईंशी बोलताना अनेकदा अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षेबद्दल बोलायचे. मात्र, कधीही त्यांच्या डोळ्यांत पाणी आलेले मी पाहिले नाही. माईंचे निधन झाल्याची वार्ता जेव्हा तात्यारावांना समजली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आणि माई गेली, तिचं सोनं झालं, असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

त्याकाळी आमच्या घरी मंगेशकर कुटुंबीयांचे येणेजाणे असायचे. दीनानाथ मंगेशकर नाटकासंदर्भात चर्चा करण्यासाठी यायचे. तर, लतादीदी गप्पा मारायला यायच्या. तात्याराव आणि लतादीदीचे तर वडील-मुलीप्रमाणे नाते होते, असेही सुंदरबाई म्हणाल्या.

टॅग्स :HinduहिंदूNarendra Modiनरेंद्र मोदी