शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भारतात मंदी नाही, देश आर्थिक संकटात नाही: सतीश मराठे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 12:45 AM

अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्ध हे प्रमुख कारण; डोंबिवलीतील आगरी महोत्सवात व्यक्त केले विचार

डोंबिवली : देश आर्थिक संकटात नाही. जागतिक मंदीचा फटका आपल्यासह सर्व देशांनाच बसत आहे. आता कांद्याचे भाव वाढले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. असे असताना सरकार कांदा आयात करण्याचा विचार का करीत आहे? कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी आयात-निर्यात धोरण ठरविणे गरजेचे आहे, असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सेंट्रल बोर्ड संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले.

आगरी युथ फोरमने क्रीडासंकुलात भरवलेल्या आगरी महोत्सवात ‘आपला देश आर्थिक संकटात आहे का’ या विषयावर बुधवारी पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी मराठे यांची मुलाखत घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गुलाब वझे, रामकृष्ण पाटील आदी मान्यवर होते. याप्रसंगी मराठे बोलत होते.

मराठे म्हणाले, शेतकऱ्यांना फ ळ प्रकिया उद्योगात उतरविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी गावागावांत विकास सहकारी सोसायट्या आहेत. देशात ९५ हजार विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. परंतु, त्यापैकी ६५ हजार सोसायट्यांचे काम उत्तम असून, त्यांच्याशी संलग्न असलेली संस्था एनटीडीसी २५ लाखांपर्यंत मदत द्यायला तयार आहे. शेतकऱ्यांनी फक्त तयारी दाखविण्याची गरज आहे. कांदा सुकवून वाळवून ठेवण्याची गरज आहे. तसे केल्यास कांद्यासारख्या नाशवंत उत्पादनालाही चांगला भाव मिळेल. पण आपण ते करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यावरील संकट गडद दिसत आहे.

ते पुढे म्हणाले, भारतात मंदी नाही. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध हे मंदीचे प्रमुख कारण आहे. अमेरिकेला चीनी वस्तू नकोत. पण त्यांच्या उत्पादनाशिवाय अमेरिका चालूच शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे. आपल्याकडे तेलाचे भाव वाढले कारण अमेरिकेने इराणवर आणलेली आर्थिक बंदी हे आहे. आपल्याकडे इराणकडून उत्पादन येत व आपण वस्तू देत होतो, ते बंद झाले. त्यामुळे पैसे चलनात न आल्याने मंदी दिसून येते. डाव्या विचारसरणीचे लोक, असे चित्र मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

बँकांमध्ये घोटाळे होतात हे रिर्झव्ह बँकेला माहीत असतातच असे नाही. पण त्या बँकेतील अधिकारी रिर्झव्ह बँकेकडे तक्रार करतात तेव्हा त्या बँकेत घोळ सुरू आहे हे समजते. पीएमसी बँकेत घोटाळा आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. बँकेमध्ये मूळ सॉफ्टवेअरची डेटाएंट्री होते. त्यांच्यावर एक सुपर सॉफ्टवेअर बसवून ठेवले होते. त्यामुळे कोणताही डेटा वेगळ्या पद्धतीने विभागला जायचा. म्हणजे एका व्यक्तीला सहा कोटी, तर एका व्यक्तीला पाच कोटी रुपये दिले गेले आहेत. त्यामुळे ५० कोटींचा प्रश्नच येत नव्हता. सुपर डेटा बाजूला गेल्यावर प्रत्यक्ष बँकेचा डेटा तपासणी करण्यास सुरु वात केली तेव्हा मोठा घोटाळा झाल्याचे लक्षात आले.

केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेकडे हक्काने पैसे मागू शकते

केंद्र सरकारने मध्यंतरी रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतला हे आर्थिक मंदीचे कारण आहे का, असे विचारले असता मराठे यांनी सांगितले, ही गोष्ट आर्थिक मंदीशी जोडणे चुकीचे आहे. केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेला नेहमीच सांगते की तुमचे आवश्यक भांडवल ठेवून उर्वरित रक्कम नियोजित बजेटसाठी आम्हाला द्या. तो पैसे म्हणजे एक कोटी ७६ लाख रुपये आहे.

रिझर्व्ह बँकेच्या १९३४ च्या नियमानुसार केंद्राला पैसे दिले. त्यामुळे प्रत्यक्षात रिझर्व्ह बँकेचा पैसा ओरबडून घेतला, त्यांच्या स्वायत्तेवर घाला घातला, हे चुकीचे आहे. वस्तूस्थिती जाणून घेतली जात नाही. प्रत्यक्षात केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेकडे हक्काने पैसे मागू शकतात. सरकारकडे पैसे नाही म्हणून रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतले हे दाखविले जात आहेत का, यावर त्यांनी सतत आरोप होतात. ते होऊ नये, म्हणून पत्रकार परिषद घेऊन सांगावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रूड तेलाच्या बदल्यात वस्तू देणार?भारत क्रूड तेल आखाती देशाकडून घेतो. पण आता भारत त्यांना पैसे न देता त्याबदल्यात आपल्याकडील वस्तू देण्याचा विचार करीत आहे. आपला खर्च आटोक्यात येईल. त्यातून वित्तीय तूट भरून काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे, असेही मराठे म्हणाले.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकIndiaभारतbankबँकthaneठाणे