शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

प्रभाग पद्धतीचे नवे आदेश आले नाहीत; आयोगाने जुन्याच आदेशानुसार निवडणूक जाहीर केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 21:55 IST

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांच्या निवडणूका ह्या एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहे.

अंबरनाथ /बदलापूर : नव्या महा विकास आघाडीने नागपुरच्या अधिवेशनात निवडणूकीच्या पध्दतीसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. जनतेतुन थेट नगराध्यक्ष निवडण्याची कार्यपध्दत आणि दोन वार्डाचे एक पॅनल पध्दत बंद करुन एक वार्ड पध्दत अमलात आणण्यासंदर्भात निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचे अद्याप आदेशात रुपांतर न झाल्याने निवडणूक आयोगाने जुन्याच पध्तीने निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांच्या निवडणूका ह्या एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहे. या निवडणूकीसाठी प्रभाग रचना, त्याचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. 2 नोव्हेंबर 2017 रोजी राज्य शासनाने नगरपरिषद निवडणूकीत नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतुन करण्याचा निर्णय घेतला आहे तर एक सदस्य प्रभाग पध्दती रद्द करुन बहु सदस्य प्रभाग पध्दती (पॅनल पध्दत) अवलंबली होती. त्या अनुसार राज्यात निवडणूकाही झाल्या. याच आदेशानुसार अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या निवडणूका देखील घेण्यात येणार होते. मात्र राज्यात महा विकास आघाडीचे सरकार येताच नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात बहु सदस्य प्रभाग पध्दती रद्द करण्याचा आणि जनतेतुन थेट नगराध्यक्ष निवडण्याचा आदेश रद्द करुन एक सदस्य प्रभाग पध्दती अवलंबण्याचा निर्णय घेतला. तसेच जनतेतुन नगराध्यक्षाची निवडण न करता नगरसेवकांमधुन नगराध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र नागपुर अधिवेशनात घेतलेल्या निर्णयाचे अद्याप आदेशात परिवर्तन झालेले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे हे आदेश अद्याप न गेल्याने निवडणूक आयोगाने आपल्या ठरल्या मुदतीप्रमाणे जुन्याच आदेशानुसार कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम जाहिर केला आहे त्यानुसार नगराध्यक्षाची निवड ही जनतेतून होण्याचे संकेत आहेत तर बहु सदस्यीय पध्दतीने निवडणूका होण्याचे संकेत आहेत.  मात्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे आदेशात रुपांतर झाल्यावर निवडणूक आयोग नविन आदेश काढेल की आहे त्या आदेशानुसार निवडणूका घेईल याबाबत दोन्ही शहरात संभ्रम निर्माण झाला आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव हा 17 जानेवारीपयरंत देणो, प्रस्ताव मान्यता 21 जानेवारी, आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिध्दी 24 जानेवारी, आरक्षण सोडत 27 जानेवारीला काढणो, हरकती आणि सुचनांसाठी 30 जानेवारी, हरकतींवर सुनावणी 11 फेब्रुवारी, अहवाल पाठविणो 14 फेब्रुवारी आणि अंतिम प्रभाग रचनेसह मान्यता द्रणो 18 फेब्रुवारी असा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

27 जानेवारीला आरक्षण सोडतअंबरनाथ आणि बदलापूरकरांना प्रभागाच्या आरक्षणाची जी प्रतिक्षाहोती ती प्रतिक्षा आता संपली आहे. 27 जानेवारीला प्रभागांचे आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे 27 जानेवारीला निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र 27 जानेवारीच्या आधी निवडणूक आयोगाकडे राज्य शासनाचा नवीन आदेश न आल्यास नव्या निर्णयानुसार निवडणूका घेणो अवघड जाणार आहे. त्यामुळे आरक्षण सोडत होण्या आधी राज्य शासनाचे नवीन आदेश येतात की नाही याची प्रतिक्षा सर्वाना लागुन राहिली आहे.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीElectionनिवडणूक