शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

प्रभाग पद्धतीचे नवे आदेश आले नाहीत; आयोगाने जुन्याच आदेशानुसार निवडणूक जाहीर केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 21:55 IST

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांच्या निवडणूका ह्या एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहे.

अंबरनाथ /बदलापूर : नव्या महा विकास आघाडीने नागपुरच्या अधिवेशनात निवडणूकीच्या पध्दतीसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. जनतेतुन थेट नगराध्यक्ष निवडण्याची कार्यपध्दत आणि दोन वार्डाचे एक पॅनल पध्दत बंद करुन एक वार्ड पध्दत अमलात आणण्यासंदर्भात निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचे अद्याप आदेशात रुपांतर न झाल्याने निवडणूक आयोगाने जुन्याच पध्तीने निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांच्या निवडणूका ह्या एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहे. या निवडणूकीसाठी प्रभाग रचना, त्याचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. 2 नोव्हेंबर 2017 रोजी राज्य शासनाने नगरपरिषद निवडणूकीत नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतुन करण्याचा निर्णय घेतला आहे तर एक सदस्य प्रभाग पध्दती रद्द करुन बहु सदस्य प्रभाग पध्दती (पॅनल पध्दत) अवलंबली होती. त्या अनुसार राज्यात निवडणूकाही झाल्या. याच आदेशानुसार अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या निवडणूका देखील घेण्यात येणार होते. मात्र राज्यात महा विकास आघाडीचे सरकार येताच नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात बहु सदस्य प्रभाग पध्दती रद्द करण्याचा आणि जनतेतुन थेट नगराध्यक्ष निवडण्याचा आदेश रद्द करुन एक सदस्य प्रभाग पध्दती अवलंबण्याचा निर्णय घेतला. तसेच जनतेतुन नगराध्यक्षाची निवडण न करता नगरसेवकांमधुन नगराध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र नागपुर अधिवेशनात घेतलेल्या निर्णयाचे अद्याप आदेशात परिवर्तन झालेले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे हे आदेश अद्याप न गेल्याने निवडणूक आयोगाने आपल्या ठरल्या मुदतीप्रमाणे जुन्याच आदेशानुसार कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम जाहिर केला आहे त्यानुसार नगराध्यक्षाची निवड ही जनतेतून होण्याचे संकेत आहेत तर बहु सदस्यीय पध्दतीने निवडणूका होण्याचे संकेत आहेत.  मात्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे आदेशात रुपांतर झाल्यावर निवडणूक आयोग नविन आदेश काढेल की आहे त्या आदेशानुसार निवडणूका घेईल याबाबत दोन्ही शहरात संभ्रम निर्माण झाला आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव हा 17 जानेवारीपयरंत देणो, प्रस्ताव मान्यता 21 जानेवारी, आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिध्दी 24 जानेवारी, आरक्षण सोडत 27 जानेवारीला काढणो, हरकती आणि सुचनांसाठी 30 जानेवारी, हरकतींवर सुनावणी 11 फेब्रुवारी, अहवाल पाठविणो 14 फेब्रुवारी आणि अंतिम प्रभाग रचनेसह मान्यता द्रणो 18 फेब्रुवारी असा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

27 जानेवारीला आरक्षण सोडतअंबरनाथ आणि बदलापूरकरांना प्रभागाच्या आरक्षणाची जी प्रतिक्षाहोती ती प्रतिक्षा आता संपली आहे. 27 जानेवारीला प्रभागांचे आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे 27 जानेवारीला निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र 27 जानेवारीच्या आधी निवडणूक आयोगाकडे राज्य शासनाचा नवीन आदेश न आल्यास नव्या निर्णयानुसार निवडणूका घेणो अवघड जाणार आहे. त्यामुळे आरक्षण सोडत होण्या आधी राज्य शासनाचे नवीन आदेश येतात की नाही याची प्रतिक्षा सर्वाना लागुन राहिली आहे.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीElectionनिवडणूक