शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

दहावीचा नवा अभ्यासक्रम :पुढील वर्षी ‘घोकंपट्टी’चे ९५ टक्के विसरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 04:12 IST

आमच्या मुलाला ९२ टक्के मिळाले तर त्या पलीकडच्या मुलास ९५ टक्के मिळाले ही ऊर अभिमानाने भरून येणारी वाक्ये पुढील जून महिन्यात दहावीच्या निकालानंतर कानावर पडणार नाहीत.

- जान्हवी मोर्येडोंबिवली - आमच्या मुलाला ९२ टक्के मिळाले तर त्या पलीकडच्या मुलास ९५ टक्के मिळाले ही ऊर अभिमानाने भरून येणारी वाक्ये पुढील जून महिन्यात दहावीच्या निकालानंतर कानावर पडणार नाहीत. कारण ‘घोकंपट्टी’चे ९५ टक्के दहावीच्या नव्या अभ्यासक्रमामुळे आता विसरावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांची आकलनशक्ती हीच कसोटी असेल व त्याकरिता पुरेसा वेळ आहे किंवा कसे याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यात मतमतांतरे आहेत.नव्या परीक्षा पद्धतीनुसार, एक परिच्छेद दिला जाईल. त्या परिच्छेदाचे आकलन करून त्यावरील उत्तरे विद्यार्थ्याना द्यावी लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आकलनशक्तीवर अधिक जोर द्यावा लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंत घोकंपट्टी करून गुणांचा पाऊस पाडणाऱ्या विद्यार्थ्यांना आकलनशक्तीच्या बळावर गुण मिळवताना झगडावे लागणार आहे.टिळकनगर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका रेखा पुणतांबेकर म्हणाल्या की, नव्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना विषय समजल्याशिवाय ते उत्तरे लिहू शकत नाही. घोकंपट्टी बंद झाल्यामुळे शाळांना आपली अध्यापन पद्धती बदलावी लागणार आहे. विद्यार्थी विचार करतील असे प्रश्न विचारावे लागतील. गटागटाने त्यांच्याकडून उत्तरे काढून घ्यावी लागतील. एखाद्या व्यक्ती शिकलेली नसते पण तिचे व्यवहारज्ञान चांगले असते. तसेच विद्यार्थ्यांना विषय समजून घ्यावा लागणार आहे.विद्यानिकेतन स्कूलचे संस्थापक विवेक पंडित म्हणाले की, विद्यार्थ्यांचे ज्ञान हे त्यांच्या आकलन क्षमतेवर असेल. आकलन क्षमतेवर आधारित गुणवत्ता ठरवण्याचे हे पहिले वर्ष आहे. त्यामुळे ते चाचपणीत जाईल. एकाच पद्धतीने सगळ्यांची आकलनशक्ती मोजता येणार नाही. तत्त्वत: ही पद्धत चांगली आहे. परंतु एवढ्या कमी वेळेत अभ्यासक्रमातील हा बदल किती विद्यार्थी स्वीकारतील व आतापर्यंत घोकंपट्टी करून उत्तीर्ण झालेल्या मुलांना पटकन किती आकलन होईल याबद्दल शंका आहे. पहिले दोन-चार महिने विद्यार्थ्यांना या नव्या पद्धतीत रुळण्यात जातील.सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले की, नव्या अभ्यासपद्धतीनुसार प्रश्नपात्रिका जाऊन कृतीपत्रिका आली आहे. मुलांकडून अभ्यास करून घेताना क्रमिक पुस्तकांचा सराव अधिक करावा लागणार आहे. सारांशमधून मुलांना उत्तरे शोधावी लागतील किंवा त्यावरून प्रश्न तयार करून त्यांची उत्तरे शोधावी लागतील. मुलांना शाळा २० मार्क्स देत होती. ते बंद झाल्याने विद्यार्थ्यांना १०० गुणांचा पेपर लिहून ३५ गुण मिळवून उत्तीर्ण होताना कष्ट घ्यावे लागणार आहेत. या नव्या पध्दतीमुळे त्यांना पाचवीपासूनच मुलांची तयारी करून घ्यावी लागणार आहे.विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीत वाढ कशी करावी हे शिक्षकांना पहावे लागेल. शिकवण्याची पद्धत बदलावी लागेल. ही नवी पद्धत अमलात आणताना काय अडचणी येतील ते हळूहळू समजेल. शिक्षक, विद्यार्थ्यांना हा प्रयोग नवीन आहे.- विवेक पंडित, विद्यानिकेतनया पद्धतीत एकाच प्रश्नाची दोन-चार उत्तरे देता येऊ शकतात. त्यांची चर्चा वर्गात घडवून आणायला लागेल. या पद्धतीत कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्तीला वाव आहे. विचार करायला प्रवृत्त केले जाणार आहे.- रेखा पुणतांबेकर, मुख्याध्यापिकाकल्पकतेचा वापर करून पर्यायी ंशब्द शोधून मुलांना जोड्या लावायच्या आहे. त्यामुळे बुद्धीमत्तेनुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध होणार आहे. शिक्षक व मुख्याध्यापकांची जबाबदारी वाढली आहे.- गुलाबराव पाटील, मुख्याध्यापक

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी