शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

ठाणे तलावांचे नव्हे खड्ड्यांचे शहर, राष्ट्रवादी काँग्रेसने काढले ठामपाचे वाभाडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 1:49 PM

खड्ड्यांची समस्या कायम असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हरिनिवास येथे " ठाणे तलावांचे नव्हे तर खड्ड्यांचे शहर" असे फलक लावले आहेत

ठाणे - ठाणे शहराला खड्ड्यांनी वेढले आहे. नवनव्या प्रयोगाद्वारे खड्डे बुजवण्याची घोषणा जात आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. मात्र खड्ड्यांची समस्या कायम असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हरिनिवास येथे " ठाणे तलावांचे नव्हे तर खड्ड्यांचे शहर" असे फलक लावले आहेत. दरम्यान, ठाणे शहरात प्रवेश करणारे टोलनाके आम्हीच आंदोलन केल्याने बंद झाले आहेत, आता या खड्ड्यात शहर बुडत असल्याने बोट सेवा सुरू करायची का? असा सवाल आ. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. 

ठाणे शहरात सध्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डेमुक्त शहरासाठी कधी अमेरिकन तर कधी अन्य तंत्रज्ञान वापरण्याची घोषणा पालकमंत्री तर ठामपा प्रशासन करीत आहे. पण शहरातील खड्ड्यांचे विघ्न दूर होत नाही. या खड्ड्यांमागे मोठे अर्थकारण असल्यानेच सत्ताधारी शिवसेना आणि  ठाणे महानगर पालिकेच्या प्रशासनाला खड्डे प्रिय असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हे फलक लावण्यात आले आहेत. 

या संदर्भात शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, ठाणे शहर कधीकाळी तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. आता हे शहर खड्ड्यांचे शहर म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाण्याची शक्यता अधिक आहे.  येथील सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासन यांना शहराच्या या मुख्य समस्येशी काही देणे घेणे नाही.  गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाही पालकमंत्री आणि पालिका प्रशासनाकडून  केवळ विविध तंत्रज्ञान वापरण्याची घोषणा केली जात आहे.  आता आम्ही हे सहन करणार नाही. जर दहा दिवसात खड्डेमुक्त ठाणे न दिसल्यास आम्ही उग्र आंदो लन छेडू असा इशाराही दिला. तर, खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडे अनेकदा मागणी करूनही निगरगट्ट झालेले हे प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना खड्ड्यात स्वतःची आर्थिक उन्नती शोधत आहेत. त्यामुळेच ठाणेकरांचा प्रवास खड्ड्यात होत आहे, अशी टीका ठामपाचे विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड