शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

मुंब्रा-कळव्यात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची हॅट्ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 00:38 IST

मुंब्रा-कळवा मतदारसंघातून ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, खरी लढत ही राष्ट्रवादीचे आव्हाड आणि शिवसेनेच्या सय्यद यांच्यात होती

ठाणे : मुंब्रा-कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांना एक लाख नऊ हजार २८३ मते मिळाली, तर शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांना ३३ हजार ६४४ मते मिळाली. आव्हाड यांनी सय्यद यांचा तब्बल ७५ हजार ६३९ मतांनी दणदणीत पराभव केला. ‘आप’चे उमेदवार अबू अल्तमश फैजी यांना ३० हजार मते मिळाली. त्यामुळे आव्हाडांच्या एक लाख मताधिक्य मिळवण्याच्या स्वप्नाला धक्का बसला.

मुंब्रा-कळवा मतदारसंघातून ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, खरी लढत ही राष्ट्रवादीचे आव्हाड आणि शिवसेनेच्या सय्यद यांच्यात होती. मात्र, ऐन वेळेस एमआयएमने आपचे उमेदवार अबू अल्तमश फैजी यांना साथ दिल्याने या निवडणुकीची रंगत वाढली होती. गुरुवारी मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हा पहिल्या फेरीपासून आव्हाड आघाडीवर राहिले. नवव्या फेरीअखेर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने सय्यद यांनी मतमोजणीकेंद्रातून काढता पाय घेतला. सुरुवातीला ईव्हीएम मशीनबाबत आक्षेप घेण्यात आले होते.

अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आ. आव्हाड यांनी सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला. शिवसेनेच्या सय्यद यांचा त्यांनी ७५ हजार ६३९ मतांनी पराभव केला. आव्हाड यांना एक लाख नऊ हजार २८३, तर सय्यद यांना ३३ हजार ६४४ मते मिळाली. आपचे उमेदवार अबू अल्तमश फैजी यांना ३० हजार ५२० मते मिळाली. सय्यद यांना ऐनवेळी उमेदवारी देण्याची सेनेची खेळी फसली आहे. आव्हाड यांनी मागील १० वर्षांत केलेल्या विकासकामांना मते देऊन मतदारांनी त्यांना विजयी केले. मागील निवडणुकीतही शिवसेनेने त्यांच्याविरोधात व्यूहरचना आखली होती. परंतु, ती यशस्वी झाली नाही. आव्हाड यांना मागील निवडणुकीत ८६ हजार ५३३ मते मिळाली होती, तर शिवसेनेच्या उमेदवाराला ३८ हजार ८५० मते मिळाली होती. त्या तुलनेत यंदा आव्हाड यांच्या मतांमध्ये २२ हजार ७५० मतांची वाढ झाली.

विजय मिळणारच होता; परंतु आता जबाबदारी वाढली आहे. आता पुढील पाच वर्षांत कामांवर लक्ष द्यायचे आहे. प्रचारात जे बोललो, तेच काम केले. मतदात्यांचे आभार मानतो. त्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच हे शक्य झाले आहे. उदयनराजेंचा झालेला पराभव हा माझ्यासाठी अधिक आनंद देणारा आहे. शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. साताराकरांचे मनापासून आभार मानतो. आता विचारधारांची लढाई होणार आहे. ३७० च्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुका जिंकता येत नाहीत, हे जनतेने दाखवून दिले.- जितेंद्र आव्हाड, कळवा-मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019mumbra-kalwa-acमुंब्रा कळवाNCPराष्ट्रवादी काँग्रेस