ठाणे : राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून मोटार अपघातातील दोन प्रकरणांचा महत्त्वपूर्ण निकाल शनिवारी लागला. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ३ कोटी २४ लाखांची भरपाई मंजूर केली. यामध्ये खालापूर येथील प्रकरणात दोन कोटी १४ लाख, तर भिवंडी येथील प्रकरणात एक कोटी १० लाख रुपयांची भरपाई देण्याचा समेट घडवून आणण्यात आला.
ठाणे जिल्ह्यात पहिल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवारी केले होते. ठाणेचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या आदेशानुसार विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रवींद्र पाजणकर यांच्या मार्गदर्शनात प्रकरणे निकाली काढण्याचे काम करण्यात आले. मोटार अपघात दाव्यांसाठी तीन पॅनेल तयार केले होते. या पॅनेलची जबाबदारी न्या. दुर्गाप्रसाद देशपांडे, न्या. आर. यू. मालवणकर आणि न्या. के. पी. श्रीखंडे यांच्यावर होती.
खालापूरमधील अपघातात ओमकार जोशी यांचा मृत्यू झाला होता. न्या. मालवणकर यांच्या पॅनेलसमोर विमा कंपनी आणि वारसदारांत दोन कोटी १४ लाखांच्या भरपाईवर समेट घडली. दुसरे प्रकरण भिवंडीतील आहे. आनंद राजन नाडार (४८) यांचा अपघातात मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्या. मालवणकर यांच्या पॅनेलसमोर एक कोटी १० लाखांच्या भरपाईवर समेट झाली.
Web Summary : National Lok Adalat settled two motor accident cases in Thane, awarding ₹3.24 crore in compensation. Families of deceased received ₹2.14 crore in the Khalapur case and ₹1.10 crore in the Bhiwandi case, facilitated by panels led by Judges Deshpande, Malvankar, and Shrikhande.
Web Summary : ठाणे में राष्ट्रीय लोक अदालत ने मोटर दुर्घटना के दो मामलों का निपटारा करते हुए ₹3.24 करोड़ का मुआवजा दिया। मृतकों के परिवारों को खालापुर मामले में ₹2.14 करोड़ और भिवंडी मामले में ₹1.10 करोड़ न्यायाधीश देशपांडे, मालवणकर और श्रीखंडे के नेतृत्व वाले पैनलों द्वारा सुगम किया गया।