शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

जीसीसी ठेक्याच्या विरोधात राष्टÑवादी जाणार न्यायलयात, तिकीट दरवाढ केवळ ठेकेदारासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 5:55 PM

ठाणे परिवहन सेवेमार्फत तिकीट दरवाढ करण्याचे प्रस्तावित केल्यानंतर परिवहन समितीने ती दरवाढ फेटाळली आहे. परंतु केवळ इलेक्शन फंड गोळा करण्यासाठी आणि ठेकेदाराची झोळी भरण्यासाठी ही दरवाढ करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

ठळक मुद्देउत्पन्नापेक्षा खर्च जास्तपरिवहनच्या बसेसपोटी १४ लाखांचे उत्पन्न

ठाणे - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे या जीसीसी ठेक्याच्या विरोधात आता उच्च न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.              ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, शहर अध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक नजीब मुल्ला, सुहास देसाई, मुकुंद केणी आदी उपस्थित होते. ठाणे परिवहनने सादर केलेला अर्थसंकल्प हा तुटीचा असून ठेकेदाराची तुट भरुन काढण्यासाठीच हा तिकीट दरवाढीचा फंडा पुढे आणण्यात आल्याचा आरोपही यावेळी आव्हाडांनी केला. ठेकेदाराची झोळी भरुन काढतांना केवळ इलेक्शन फंड गोळा करण्याची तयारी शिवसेनेने या माध्यमातून केली असल्याचेही त्यांनी सांगितले. नवी मुंबईतही याच पध्दतीने कंत्राट देण्यात आले आहे. परंतु ठाणे महापालिकेने ठेकेदाराला वाढीव दर दिले असून ते चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या विरोधात आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.          यापूर्वी नवीन बसेस जीसीसीवर देण्यात आल्या आहेत. आता पुन्हा परिवहनच्या ताफ्यातील बसेस दुरुस्त करुन त्या खाजगी ठेकेदाराला देण्याचा घाट घातला जात आहे. एकीकडे जीसीसीच्या १७५ बसेसच्या माध्यमातून परिवहनला १५ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. तर परिवहनच्या ताफ्यात असलेल्या १२० बसेसच्या माध्यमातून १४ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे परिवहनच्या बसेस दुरुस्त करुन त्या स्वत:च चालविल्या तरी परिवहनचा फायदा होणार असल्याचे मत यावेळी नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले. जीसीसीला देण्यासाठी परिवहनकडे पैसे आहेत, परंतु स्वत:च्या बसेस दुरुस्तीसाठी पैसे का नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यातही जीसीसीच्या माध्यमातून परिवहनला १५ लाखांचे उत्पन्न मिळत असले तरी दुरुस्तीचा खर्च २३ लाख आहे, त्यामुळे दिवसाला परिवहनचे ८ लाखांचे नुकसान होत असतांनाही केवळ गोल्डन ठेकेदार आणि प्रशासनामध्ये असलेल्या लागेबांधेमुळेच हा प्रकार घडत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे तिकीट दरवाढ रद्द करावी, आणि जीसीसीच्या प्रस्तावाचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड