शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

श्रीराम, शंकराचार्य आणि रामदास स्वामींनंतर राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारी चौथी व्यक्ती - नाना पटोले

By नितीन पंडित | Updated: September 13, 2022 17:07 IST

कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारी चौथी व्यक्ती म्हणजे राहुल गांधी असे नाना पटोले यांनी म्हटले. 

भिवंडी : श्रीराम यांनी त्याकाळी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केली त्यानंतर शंकराचार्य यांनी पीठ स्थापन करताना व त्यानंतर रामदास स्वामी यांनी सुध्दा कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केल्यानंतर आता राहुल गांधी हे चौथे व्यक्ती ही पदयात्रा करणारे ठरणार आहेत असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी रात्री भिवंडी येथे केले आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या घरी नाना पटोले रात्री उशिरा गणेश दर्शना करीता आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. 

याप्रसंगी भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष रशीद ताहीर मोमीन, तालुकाध्यक्ष राकेश पाटील, महेश धानके, चेतनसिंग पवार, विजय पाटील, निलेश भोईर यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. सरवली येथील काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या निवासस्थानी संकष्टी चतुर्थी पर्यंत गणेश स्थापना केली असल्याने गणेश दर्शनाकरिता नाना पटोले आले असता दयानंद चोरघे, युवक काँग्रेस सरचिटणीस विरेन चोरघे व कुटुंबीयांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. 

भाजपावर साधला निशाणा खोटे बोलून सत्ता हस्तगत केलेल्या भाजपाकडून देश विकून देशाचा कारभार सुरू आहे. खरं तर देश चालावण सोपे काम नाही, देश चालवणे भाजपाचे काम नसून भाजपा देश बरबाद करायला निघाले आहेत, देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, देशाचे संविधान, देशाचा तिरंगा धोक्यात आहे. राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा ही सत्ते साठी नसून देशाचे संविधान, तिरंगा सुरक्षित राहिला पाहिजे, देश एकसंघ राहिला पाहिजे या साठी सुरू केली आहे. असे सांगत नाना पटोले यांनी ज्या ठिकाणी राजीव गांधी यांची हत्या झाली त्या ठिकाणाहून यात्रा सुरू करताना मी माझे वडील गमावले पण देश गमवायचा नाही, तिरंगा वाचवायचा आहे या साठी भारत जोडो यात्रा सुरू केली असल्याने त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजपामध्ये खळबळ उडाली आहे अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली. 

 

टॅग्स :thaneठाणेNana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा