शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

श्रीराम, शंकराचार्य आणि रामदास स्वामींनंतर राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारी चौथी व्यक्ती - नाना पटोले

By नितीन पंडित | Updated: September 13, 2022 17:07 IST

कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारी चौथी व्यक्ती म्हणजे राहुल गांधी असे नाना पटोले यांनी म्हटले. 

भिवंडी : श्रीराम यांनी त्याकाळी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केली त्यानंतर शंकराचार्य यांनी पीठ स्थापन करताना व त्यानंतर रामदास स्वामी यांनी सुध्दा कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केल्यानंतर आता राहुल गांधी हे चौथे व्यक्ती ही पदयात्रा करणारे ठरणार आहेत असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी रात्री भिवंडी येथे केले आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या घरी नाना पटोले रात्री उशिरा गणेश दर्शना करीता आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. 

याप्रसंगी भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष रशीद ताहीर मोमीन, तालुकाध्यक्ष राकेश पाटील, महेश धानके, चेतनसिंग पवार, विजय पाटील, निलेश भोईर यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. सरवली येथील काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या निवासस्थानी संकष्टी चतुर्थी पर्यंत गणेश स्थापना केली असल्याने गणेश दर्शनाकरिता नाना पटोले आले असता दयानंद चोरघे, युवक काँग्रेस सरचिटणीस विरेन चोरघे व कुटुंबीयांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. 

भाजपावर साधला निशाणा खोटे बोलून सत्ता हस्तगत केलेल्या भाजपाकडून देश विकून देशाचा कारभार सुरू आहे. खरं तर देश चालावण सोपे काम नाही, देश चालवणे भाजपाचे काम नसून भाजपा देश बरबाद करायला निघाले आहेत, देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, देशाचे संविधान, देशाचा तिरंगा धोक्यात आहे. राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा ही सत्ते साठी नसून देशाचे संविधान, तिरंगा सुरक्षित राहिला पाहिजे, देश एकसंघ राहिला पाहिजे या साठी सुरू केली आहे. असे सांगत नाना पटोले यांनी ज्या ठिकाणी राजीव गांधी यांची हत्या झाली त्या ठिकाणाहून यात्रा सुरू करताना मी माझे वडील गमावले पण देश गमवायचा नाही, तिरंगा वाचवायचा आहे या साठी भारत जोडो यात्रा सुरू केली असल्याने त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजपामध्ये खळबळ उडाली आहे अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली. 

 

टॅग्स :thaneठाणेNana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा