शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांमुळे परिवहन खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:47 IST

निधी नाही म्हणून सतत रडगाणे गाणारे मीरा- भार्इंदर महापालिका प्रशासन, सत्ताधारयांसह नेत्यांनी केंद्रसरकारच्या जेएनएनआरयूएम मधून फुकटात मिळालेल्या बसचा अगदी भंगारखाना केला आहे.

धीरज परबमीरा रोड : निधी नाही म्हणून सतत रडगाणे गाणारे मीरा- भार्इंदर महापालिका प्रशासन, सत्ताधारयांसह नेत्यांनी केंद्रसरकारच्या जेएनएनआरयूएम मधून फुकटात मिळालेल्या बसचा अगदी भंगारखाना केला आहे. परिवहन सेवेची दुर्दशा व नागरिकांचे हाल याला प्रशासन व लोकप्रतिनिधी कारणीभूत आहेत. आता निवडणुकीत हेच राजकारणी खिळखिळ््या झालेल्या बसमधून मतदारांना हाय-फाय परिवहन सेवेचे गाजर दाखवत फिरत आहेत.मीरा- भार्इंदर महापालिकेची परिवहन सेवा ही २००५ मध्ये सुरू झाली. त्यावेळी खाजगी कंत्राटदारा मार्फत ५२ बस चालवल्या जात होत्या. महापालिकेकडून वर्षाला काही कोटींचे अनुदान या कंत्राटदाराच्या घशात घालण्यात आले. त्यावेळी महालक्ष्मी कृपा इन्फ्रा नावाच्या कंत्राटदाराच्या आड काही लोकप्रतिनिधींची भागीदारी चर्चेत होती. या कंत्राटदाराला नेहमीच झुकते माप मिळाले.२०१० मध्ये केंद्र सरकारच्या जेएनएनआरयूएममधून १०० नवीन बस मंजूर झाल्या होत्या. त्यातील ५० बस या ५० टक्के अनुदानातून महापालिकेला मिळाल्या. केंद्राने पालिकेला ४ कोटी ९६ लाख रूपये दिले होते. कंत्राटदार महालक्ष्मीवर विशेष कृपा दाखवत त्याच्या भंगार झालेल्या ५२ बस पीपीपी तत्वावर चालवण्यास घेणारा नवा कंत्राटदार कॅस्ट्रल इन्फ्राच्यारूपाने माथी मारला.आॅक्टोबर २०१० मध्ये कॅस्ट्रलला जुन्या कंत्राटदाराच्या ५२ व पालिकेला अनुदानातून मिळालेल्या ५० बस चालवण्यास दिल्या. पण जुन्यापैकी काही बसच अल्पवधीसाठी चालल्या. प्रशासन व लोकप्रनिधींनी केंद्राकडून मिळालेल्या नवीन बसच्या देखभाल, दुरूस्तीकडे सर्रास दुर्लक्षच केले. आगारासाठी जागाच दिली नाही. शिवाय तिकीट दरवाढीच्या मंजुरीत आडमुठे धोरण घेतले. कंत्राटदारानेही नव्या कोºया बस चालवण्याबाबत स्वत:ची जबाबदारी पार पाडण्यात कुचराई केली. त्यामुळे नवीन मिळालेल्या बस २ ते ३ वर्षातच भंगार झाल्या. कॅस्ट्रलने आपल्या मागण्यांसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे तर पालिकेनेही कॅस्ट्रलकडे पैशांची मागणी केली आहे. २०१० मध्ये मिळालेल्या ५० बसचे भंगार सध्या कनकिया येथे टाकून ठेवले आहे.दरम्यान, महापालिकेला जेएनएनआरयूएमच्या दुसºया टप्प्यात ९० बस मंजूर झाल्या. ७० सर्वसाधारण, १० व्हॉल्वो व १० मिनी बस आहेत. शिवाय पालिकेने १० मिडी बस खरेदीचा निर्णय घेतला. तब्बल ४० कोटींचा खर्च या बस खरेदीवर करण्यात आला. सरकारचे अनुदान मिळाल्याने या बस फुकटात महापालिकेच्या पदरी आल्या.२०१५ मध्येच नव्या बस जीसीसी तत्वावर चालवण्याचा निर्णय झाल्याचे प्रशासन सांगते. तर डिसेंबर २०१५ पासून पालिकेने परिवहन सेवेसाठी निविदा मागवण्यास सुरूवात केली. परंतु पालिका व लोकप्रतिनिधींनी काही कोटी भरण्यासह अन्य जाचक अट टाकल्याने एकही कंत्राटदार फिरकला नाही.तब्बल चारवेळा निविदा व तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर अखेर दिल्लीच्या श्यामा श्याम सर्व्हीस सेंटर या कंत्राटदाराची एकमेव निविदा आली.एकीकडे कंत्राटदार मिळत नसल्याने जीसीसीवर बससेवा सुरु झाली नाही. दुसरीकडे जागतिक बँकेने परिवहन सेवेसाठी १० कोटीचे अनुदान मंजूर केले असताना त्यांच्या अटींप्रमाणे कामे करण्यास पालिका अपयशी ठरल्याने बँकेनेही पालिकेला विचारणा केली. जूनमध्ये स्थायी समितीने निविदा मंजूर केली.३२ बसच रस्त्यावरआॅक्टोबर २०१५ मध्ये कॅस्ट्रलला बाजूला सारून महापालिकेने परिवहन सेवा चालवण्यास घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद््घाटन झाले. पण दीड वर्षातच नव्या कोºया बस खिळखळ््या झाल्या. सध्या ५३ नवीन बस ताफ्यात असल्या तरी दुरूस्ती, टायर या कारणांमुळे जेमतेम ३२ बसच रस्त्यावर धावत आहेत. सुसज्ज बस डेपो नाही. देखभाल दुरुस्तीचे काम होत नाही. टायर नाही म्हणून बस पडून आहेत.भार्इंदर ते उत्तन - चौक - गोराई पर्यंतच्या नागरिकांना आजही परिवहन सेवेशिवाय पर्याय नाही. पण पालिकेला या मार्गावरही पुरेशी बससेवा देता आली नाही. मॅक्सस मॉल, इंद्रलोक, कनकिया, हाटकेश, काशिमीरा, सृष्टी, म्हाडा, प्लेझेंट पार्क येथील नागरिकांचे बससेवेअभावी हाल होत आहेत.अपुºया व अस्वच्छ बस, वेळेचे बिघडलेले गणित त्यातच रस्त्यात बस कधीही बंद पडण्याची भीती प्रवाशांना नेहमीच असते. या आधीच्या निवडणुकीत ज्या नरेंद्र मेहतांनी बसची दुरवस्था झाल्याचे छायाचित्र दाखवत प्रचाराचा मुद्दा केला त्याच मेहता व भाजपाच्या सत्ताकाळातही परिवहन सेवा डबघाईला आलेली आहे.