शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ठाण्यात राहत्या घरात दोघांचा गूढ मृत्यू, चितळसर भागातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 13:56 IST

याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी शुक्रवारी दिली.

ठाणे : चितळसर मानपाडा भागातील एमएमआरडीएच्या दोस्ती रेंटल इमारतीमध्ये समशेर बहादूर रंनबाज सिंग (६८) या सुरक्षारक्षकाचा आणि त्याची पत्नी मीना समशेर सिंग (६५) या दोघांचाही त्यांच्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघड झाली. त्यांचा खून केल्याचा संशय त्यांचा मुलगा सुधीर सिंग (३८) याने व्यक्त केला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी शुक्रवारी दिली.

सुरक्षारक्षकाचे काम करणारे बहादूर हे दूध विक्रीचे काम करणारी त्यांची पत्नी मीना हिच्यासह चितळसर येथील बिल्डिंग क्रमांक १ मधील १४व्या मजल्यावर वास्तव्याला होते, तर वेअर हाउसमध्ये काम करणारा त्यांचा मुलगा अंबरनाथ येथे राहतो. सुधीर आई - वडिलांची फोनवरून अधूनमधून चौकशी करीत असे. ३ जानेवारी रोजी सकाळी त्याने फोन केला, तेव्हा पोटात काहीतरी गडबड असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे केली.

बेशुद्ध अवस्थेत ४ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी फोनच घेतला नाही. संशय आल्याने त्याने रात्री उशिरा ठाणे गाठले. तेव्हा त्यांच्या घराचा  दरवाजा उघडाच होता. दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित  केले. 

मृतदेह तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयातया दोघांच्याही अंगावर त्यांना मारल्याच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचे मृतदेह मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत. त्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, घरातील दागिने किंवा मौल्यवान वस्तूही चोरीस गेलेल्या नसल्याचे आढळल्याने यात संभ्रम वाढल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस