शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

मुरबाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:13 AM

दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना महसूल खात्याने तालुक्याची आणेवारी जाहीर करून संकटात सापडलेल्या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

मुरबाड : तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना महसूल खात्याने तालुक्याची आणेवारी जाहीर करून संकटात सापडलेल्या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. तर कार्यालयात बसून सरकारी अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवण्याचे काम केल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस चेतनिसंह पवार यांनी केला असून मुरबाड तालुक्यासह ठाणे जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे.राज्यात सर्वाधिक पाऊस ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पालघर जिल्ह्यात होत असतो. साधारण १२० ते १३० दिवस हा पाऊस होतो. मात्र, यंदा या जिल्ह्यात पावसाचा नीचांक नोंदवला असून जेमतेम ८० दिवस पाऊस झालेला आहे. जी स्थिती या जिल्ह्यात तीच स्थिती मुरबाड तालुक्यात. भात पीकासाठी कमीतकमी १२० दिवस पावसाची आवश्यकता असताना तालुक्यात ८० दिवस पाऊस झाला आहे. अल्प पावसामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला असतानाच मुरबाडच्या महसूल विभागाने सप्टेंबर महिन्यांत ८० पैसे नजर आणेवारी जाहीर केली आहे. पाऊसच कमी पडल्याने हळवी पिके साधारण हातात लागली आहेत. तर गरवी, निमगरवी पिके करपली आहेत. भाताच्या लोंब्यांत तांदळाऐवजी पळींज जास्त असल्याने तालुक्यात भाताचे उत्पन्न ५० पैशांपेक्षा कमी आले असताना मुरबाडच्या तहसील कार्यालयाने ८० पैसे आणेवारी दाखवून गोरगरीब शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.>वस्तुस्थितीची पाहणी करातलाठी, मंडळ अधिकारी यांना गावोगावी पाठवून खºया वस्तुस्थितीची पाहणी करावी आणि तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीचे निवेदन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी खासदार सुरेश टावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन चौधरी यांना दिले.