शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

पालिकेची परिवहन समिती तब्बल 12 वर्षांनंतर पुनरुज्जीवित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 16:39 IST

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन विभागावर अंकुश ठेवण्यासाठी २००५ मध्ये स्थापन करण्यात आलेली समिती तब्बल १२ वर्षांनंतर पुनरुज्जीवित केली जाणार आहे.

राजू काळेभाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन विभागावर अंकुश ठेवण्यासाठी २००५ मध्ये स्थापन करण्यात आलेली समिती तब्बल १२ वर्षांनंतर पुनरुज्जीवित केली जाणार असून, तसा निर्णय येत्या ८ नोव्हेंबरच्या महासभेत होण्याची शक्यता आहे. या समितीत निवडून आलेल्या सदस्यांची नियुक्ती करणे अनिवार्य नसल्याने त्यात गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांसह निकटवर्तीयांना संधी देण्यात येणार असल्याचे भाजपा, सेना व काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.मीरा-भार्इंदरमध्ये २००५ पुर्वी गोराई, उत्तन, चौक, मनोरी, ठाणे, भिवंडी येथे जाण्यासाठी प्रवाशांकडून स्थानिक परिवहनचे साधन म्हणून एसटीचा वापर होत होता. २००५ नंतर एसटी हद्दपार झाली असली तरी एसटीचा ठाणे पर्यंतचा प्रवास आजही भार्इंदर येथून सुरू  आहे. २००२ मध्ये मीरा-भार्इंदर नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाल्याने २००५ मध्ये प्रशासनासमोर एसटीच्या जागी स्थानिक परिवहन सुरू करण्याचा प्रश्न उपस्थित झाला.अखेर पालिकेने १५ सप्टेंबर २००५ रोजी ती तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कंत्राटी पद्धतीवर सुरू केली. त्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना, बहुजन विकास आघाडी व अपक्षांची सत्ता होती. पालिकेने स्वखर्चातून ५० बस खरेदी केल्या. त्यापैकी अंदाजे २० बस कंत्राटदारांकडून खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सेवा सुरू करण्याचे कंत्राट राजकीय हितसंबंधातील व्यक्तींना देण्यात आले. प्रतिकिलोमीटरमागे पालिकेने १९ रुपये दर निश्चित करून पालिकेने कंत्राटदार व राजकीय मंडळींचे भले करण्यास सुरुवात केली. यापोटी पालिकेला दरवर्षी लाखोंचा तोटा सहन करावा लागत असला तरी त्याचे सोयरसुतक ना कंत्राटदारांना, ना राजकीय मंडळी व ना प्रशासनाला होते. दरम्यान परिवहन विभागावर अंकुश ठेवण्यासाठी २००५ मध्येच पहिल्या वहिल्या १२ सदस्यीय परिवहन समितीची स्थापना २००५ मध्येच केली. त्यावर पहिले सभापती म्हणून शांताराम ठाकूर यांची निवड करण्यात आली. उर्वरीत सदस्यांत त्यावेळच्या स्थायी समितीचे सभापती तुळशिदास म्हात्रे, विद्याधर रेवणकर, रेनॉल्ड बेचरी, प्रशांत पालंडे, अशोक तिवारी, मुनीस विल्यम, उमा पाटील, सुनिता पाटील, उस्मान नुरले, चंद्रकांत मोदी, श्यामराव मदने व डॉ. सुरेश येवले यांचा समावेश होता.या समितीसह विभागाचा कारभार हाकण्यासाठी २००७ मध्ये पुर्वीचे मुख्यालय असलेल्या नगरभवनमध्ये स्थानिक परिवहन विभागाचे मुख्य कार्यालय सुरु करण्यात आले. त्याचे उद्घाटन महापौरपदी असलेले अपक्ष नगरसेवक नरेंद्र मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. या सेवेचा सतत वाढणारा तोटा असह्य होऊ लागल्याने पालिकेने २०१० मध्ये कंत्राटी सेवा मोडीत काढली. ९ आॅक्टोबर २०१० मध्ये खासगी-लोक सहभाग तत्वावरील नवीन परिवहन सेवा त्यावेळचे आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू करण्यात आली. या नवीन सेवेच्या सुुरुवातीपूर्वीच २००९ मध्ये स्थानिक परिवहन समितीला नारळ देण्यात आला. त्यानंतर आजतागायत समितीची पुनर्स्थापना करण्यात आली नाही. मात्र येत्या ८ नोव्हेंबरच्या महासभेत तिला पुनरुज्जीवित करण्याची शक्यता आहे. त्याला मान्यता मिळाल्यास लवकरच त्यात तौलनिक संख्याबळानुसार भाजपा, सेना व काँग्रेसला अनुक्रमे ९, २ व १ जागा मिळणार आहे. यातही भाजपाचाच वरचष्मा राहणार असल्याने त्याची दोर मात्र त्यावेळचे महापौर व सध्याचे आ. नरेंद्र मेहता यांच्या हातीच राहणार आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक