शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची परिवहन समिती तब्बल 12 वर्षांनंतर पुनरुज्जीवित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 16:39 IST

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन विभागावर अंकुश ठेवण्यासाठी २००५ मध्ये स्थापन करण्यात आलेली समिती तब्बल १२ वर्षांनंतर पुनरुज्जीवित केली जाणार आहे.

राजू काळेभाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन विभागावर अंकुश ठेवण्यासाठी २००५ मध्ये स्थापन करण्यात आलेली समिती तब्बल १२ वर्षांनंतर पुनरुज्जीवित केली जाणार असून, तसा निर्णय येत्या ८ नोव्हेंबरच्या महासभेत होण्याची शक्यता आहे. या समितीत निवडून आलेल्या सदस्यांची नियुक्ती करणे अनिवार्य नसल्याने त्यात गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांसह निकटवर्तीयांना संधी देण्यात येणार असल्याचे भाजपा, सेना व काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.मीरा-भार्इंदरमध्ये २००५ पुर्वी गोराई, उत्तन, चौक, मनोरी, ठाणे, भिवंडी येथे जाण्यासाठी प्रवाशांकडून स्थानिक परिवहनचे साधन म्हणून एसटीचा वापर होत होता. २००५ नंतर एसटी हद्दपार झाली असली तरी एसटीचा ठाणे पर्यंतचा प्रवास आजही भार्इंदर येथून सुरू  आहे. २००२ मध्ये मीरा-भार्इंदर नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाल्याने २००५ मध्ये प्रशासनासमोर एसटीच्या जागी स्थानिक परिवहन सुरू करण्याचा प्रश्न उपस्थित झाला.अखेर पालिकेने १५ सप्टेंबर २००५ रोजी ती तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कंत्राटी पद्धतीवर सुरू केली. त्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना, बहुजन विकास आघाडी व अपक्षांची सत्ता होती. पालिकेने स्वखर्चातून ५० बस खरेदी केल्या. त्यापैकी अंदाजे २० बस कंत्राटदारांकडून खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सेवा सुरू करण्याचे कंत्राट राजकीय हितसंबंधातील व्यक्तींना देण्यात आले. प्रतिकिलोमीटरमागे पालिकेने १९ रुपये दर निश्चित करून पालिकेने कंत्राटदार व राजकीय मंडळींचे भले करण्यास सुरुवात केली. यापोटी पालिकेला दरवर्षी लाखोंचा तोटा सहन करावा लागत असला तरी त्याचे सोयरसुतक ना कंत्राटदारांना, ना राजकीय मंडळी व ना प्रशासनाला होते. दरम्यान परिवहन विभागावर अंकुश ठेवण्यासाठी २००५ मध्येच पहिल्या वहिल्या १२ सदस्यीय परिवहन समितीची स्थापना २००५ मध्येच केली. त्यावर पहिले सभापती म्हणून शांताराम ठाकूर यांची निवड करण्यात आली. उर्वरीत सदस्यांत त्यावेळच्या स्थायी समितीचे सभापती तुळशिदास म्हात्रे, विद्याधर रेवणकर, रेनॉल्ड बेचरी, प्रशांत पालंडे, अशोक तिवारी, मुनीस विल्यम, उमा पाटील, सुनिता पाटील, उस्मान नुरले, चंद्रकांत मोदी, श्यामराव मदने व डॉ. सुरेश येवले यांचा समावेश होता.या समितीसह विभागाचा कारभार हाकण्यासाठी २००७ मध्ये पुर्वीचे मुख्यालय असलेल्या नगरभवनमध्ये स्थानिक परिवहन विभागाचे मुख्य कार्यालय सुरु करण्यात आले. त्याचे उद्घाटन महापौरपदी असलेले अपक्ष नगरसेवक नरेंद्र मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. या सेवेचा सतत वाढणारा तोटा असह्य होऊ लागल्याने पालिकेने २०१० मध्ये कंत्राटी सेवा मोडीत काढली. ९ आॅक्टोबर २०१० मध्ये खासगी-लोक सहभाग तत्वावरील नवीन परिवहन सेवा त्यावेळचे आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू करण्यात आली. या नवीन सेवेच्या सुुरुवातीपूर्वीच २००९ मध्ये स्थानिक परिवहन समितीला नारळ देण्यात आला. त्यानंतर आजतागायत समितीची पुनर्स्थापना करण्यात आली नाही. मात्र येत्या ८ नोव्हेंबरच्या महासभेत तिला पुनरुज्जीवित करण्याची शक्यता आहे. त्याला मान्यता मिळाल्यास लवकरच त्यात तौलनिक संख्याबळानुसार भाजपा, सेना व काँग्रेसला अनुक्रमे ९, २ व १ जागा मिळणार आहे. यातही भाजपाचाच वरचष्मा राहणार असल्याने त्याची दोर मात्र त्यावेळचे महापौर व सध्याचे आ. नरेंद्र मेहता यांच्या हातीच राहणार आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक