शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पालिका आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 4:49 AM

भार्इंदरमध्ये कंत्राटदारांची बिले रखडली : अनुदानात ३४ कोटींची घट

राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेला राज्य सरकारकडून जीएसटीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात वार्षिक ३४ कोटींची घट झाली असल्याने पालिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे जीएसटीच्या उत्पन्नातील घट झाल्याने पालिकेची आर्थिक परिस्थिती ढासळत असतानाही प्रशासन सत्ताधाºयांच्या दबावाखाली विकासकामांच्या निविदा काढत असल्याने त्याला लागणारा निधी कसा काय उभा करायचा, असा प्रश्न अधिकाºयांसमोर उभा ठाकला असल्याची चर्चा सध्या पालिकेत सुरू झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कंत्राटदारांची बिले रखडली असताना नवीन निविदा काढल्या जात आहेत. पालिकेची आर्थिक बाजू सक्षम नसल्याने राखीव निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. अग्निशमन दलासाठी राखीव ठेवलेला निधी प्रशासकीय खर्चासाठी वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याला काही अधिकाºयांनी ठामपणे नकार दिल्याने तूर्तास राखीव निधी शाबूत राहिला आहे. अगोदरच पालिकेच्या माथी एमएमआरडीएचे सुमारे ३०० कोटींचे कर्ज आहे. त्यापोटी पालिकेला वार्षिक ४० कोटींचा हप्ता भरावा लागत आहे. आणखी नव्या कर्जाचे प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केले जात आहेत. नवीन काँक्रिटच्या रस्त्यांसाठी १०० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

यापूर्वी एमएमआरडीएने नियोजित तीन उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी पालिकेने पाठवलेला कर्जाचा प्रस्ताव नाकारला होता. पालिकेची आर्थिक बाजू सक्षम नसल्याचे कारण एमएमआरडीएने दिले होते. कर्जफेडीसाठी उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण केल्यास कर्ज देण्याचा विचार करू, असे स्पष्ट केले होते. अखेर, आ. नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत कर्जास मंजुरी मिळवली होती.अलीकडेच पार पडलेल्या विशेष महासभेत नवीन पंतप्रधान आवास योजनेंतर्गत रेंगाळलेली तत्कालीन बीएसयूपी योजना पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएकडे सुमारे १५० कोटी कर्जाचा प्रस्ताव येत्या डिसेंबर महिन्यात पाठवण्यात येणार असल्याचे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी स्पष्ट केले.पालिकेला सध्या मिळणारे अनुदान पूर्वीप्रमाणेच मिळावे, यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे. ते मिळाल्यास त्यातून आर्थिक ताळमेळ साधता येऊ शकेल.- शरद बेलवटे, मुख्य लेखाधिकारी, मीरा-भार्इंदर महापालिकादरवर्षी २०० कोटींहून अधिक उत्पन्नपालिकेला मुद्रांक शुल्कावरील एक टकका अधिभारातून दरवर्षी सुमारे ३५ कोटींचे अनुदान मिळते. तसेच पालिकेने आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सुरुवातीला जकात, त्यानंतर उपकर व शेवटी स्थानिक संस्थाकर लागू केला. यातून दरवर्षाच्या वाढीतून सुमारे २०० कोटींहून अधिक उत्पन्न पालिकेला मिळत होते. यानंतर, लागू झालेल्या जीएसटीद्वारे पालिकेला अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले.सुरुवातीला पालिकेला सुमारे २३४ कोटींसह मुद्रांक शुल्कावरील अधिभारापोटी सुमारे ३५ कोटी असे सुमारे २६९ कोटींचे अनुदान मिळत होते. परंतु, राज्य सरकारने जीएसटीच्या अनुदानात कपात केल्याने पालिकेला ६९ कोटींचे अनुदान कमी मिळू लागले आहे. त्यातच मुद्रांक शुल्कापोटी मिळणारे अनुदान जीएसटीच्या अनुदानातच वळते करण्यात आल्याने पालिकेचे वर्षाकाठी तब्बल ३४ कोटींचे आर्थिक नुकसान होत आहे.

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदरTaxकर