शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
8
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
9
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
10
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
11
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
12
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
13
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
14
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
17
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
18
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
19
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
20
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे पाणी ठाण्याला

By admin | Updated: March 20, 2016 00:56 IST

भातसा धरणातून ठाण्यासाठी लागू केलेली कपात कमी करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याला दिलासा देत मुंबईच्या वाट्याचे थोडे पाणी ठाण्याकडे वळवले

ठाणे : भातसा धरणातून ठाण्यासाठी लागू केलेली कपात कमी करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याला दिलासा देत मुंबईच्या वाट्याचे थोडे पाणी ठाण्याकडे वळवले आहे आणि त्याबदल्यात ठाण्याच्या वाट्याचे टेमघरचे पाणी कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदरला देत पाणीवाटपाचे फेरनियोजन केले आहे. यामुळे मुंबईला फारसा फटका बसणार नसला तरी ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदरला थोडे जादा पाणी देत दिलासा दिला आहे.
ठाणे महापालिकेला भातसा धरणातून लागू केलेली ३० टक्के पाणीकपात मुख्यमंत्र्यांनी अवघी पाच टक्के केली आहे. यामुळे ठाण्याला आता भातसातून १४० ऐवजी १५० एमएलडी पाणीपुरवठा होणार आहे. या बदल्यात ठाण्याला मिळणारे टेमघरचे ३० एमएलडी पाणी कल्याण-डोंबिवली व मीरा-भार्इंदर महापालिकांना वळवण्यात आले आहे.
भातसातून ठाणे महापालिकेला २०० एमएलडी पाणी मिळत असे. यातून मुंबई महापालिकेने ३० टक्के कपात लागू केली होती. ती केवळ पाच टक्के होणार आहे. उरलेले २५ टक्के पाणी पुन्हा ठाण्याला देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. यामुळे ठाणेकरांना आता भातसातून रोज १० एमएलडी जादा पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बदल्यात ठाण्याला टेमघरकडून मिळणारे ३० एमएलडी पाणी कल्याण-डोंबिवली व मीरा-भार्इंदर यांना समान वाटण्याचा निर्णय घेतल्याचे लघुपाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता सुभाष वाघमारे यांनी सांगितले.

प्रक्षोभ शमवण्यासाठी उचलली पावले
पाणीकपातीमुळे ठाणे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात प्रक्षोभ आहे. त्यावर तोडग्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही महत्त्वाच्या आमदारांची बैठक घेऊन पाणीकपात कमी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौरांनी सर्वाधिक पाणी आपल्या शहराकडे वळवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.