शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

मोरीवली, वडवली गावाला प्रदूषणाचा वाढता धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:03 AM

नागरिक त्रस्त : चुकीच्या पद्धतीने सोडतात विषारी वायू

अंबरनाथ : अंबरनाथ शहराच्या मध्यभागी असलेल्या मोरीवली आणि वडवली या दोन केमिकल झोनमध्ये आता कारखानदार चुकीच्या पद्धतीने रासायनिक वायू हवेत सोडत आहेत. या रासायनिक प्रदूषणाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. रोज विषारी धूर आणि वायू हवेत सोडण्याचे प्रकार वाढत असल्याची बाब दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी मांडली आहे.

गेल्या महिन्यात वडवली गावातील केमिकल झोनमधील एका कारखान्यातून मोठ्या प्रमाणात धूर सोडण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण अंबरनाथ भागातील साई, कानसई, स्वामीनगर आणि वडवली गाव परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता. हा प्रकार घडल्यानंतर रात्रीच्या वेळी रासायनिक वायू सोडण्याचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा असताना आता नव्याने घातक आणि त्रासदायक वायू हवेत सोडण्याचे प्रकार वाढले आहेत. मोरीवली परिसरातील काही कारखानदार चुकीच्या पद्धतीने थेट हवेत वायू सोडत असल्याची बाब ग्रामस्थांनी समोर आणली आहे. मात्र ग्रामस्थांच्या तक्रारींकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारखानदारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर मेहरबानी दाखविण्याचे काम अधिकारी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दुर्गंधीयुक्त वायू हवेत सोडण्याचे प्रमाण वाढल्याने आता या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. हीच परिस्थिती वडवली भागातही झाली आहे. मात्र त्या ठिकाणीही नागरिकांच्या तक्रारींना बगल देण्याचे काम केले जात आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य असते.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका