शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भिवंडीत विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 16:27 IST

शिष्टमंडळाने आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे सोपविले. 

नितिन पंडीत

भिवंडी: स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतरही तालुक्यातील बहुसंख्ये आदिवासीवस्ती-पाडे त्यांच्या हक्कांच्या नागरी सुविधांपासून वंचित असून  आजही शेकडो आदिवासी कुटूंबाकडे रेशनींगकार्ड, आधारकार्ड, जातीचा दाखला, घराखालील जागा, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते या सारख्या मुलभूत सुविधा पोहचलेल्या नसल्याने या आदिवासी बांधवांना या सुविधा पोहचविण्यात शासन अपयशी ठरले असल्याचा आरोव करीत आपल्या विविध मागण्यांसाठी श्रमजिवी संघटनेच्या वतीने सोमवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आणला होता. या मोर्चात शेकडो आदिवासी महिला व नागरिक सहभागी झाले होते. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे सोपविले . 

कोरोनासंकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आदिवासी बांधवांचे अतोनात हाल झाले असून अशा परिस्थितीत रेशनकार्ड ऑनलाईन न केलेल्या रेशनकार्ड धारकांना तत्काळ ऑफलाईन धान्य तसेच जिवनाश्यक वस्तू मिळाव्यात व गरीब आदिवासी कुटुंबीयांना केरोसीनचा व धान्याचा पुरवठा करण्यात यावा , वन जमिन दावेदारांचे प्रलंबित दावे तात्काळ मंजूर करावे तसेच वन पट्टे मिळालेल्या पट्टेधारकांना सात बारा व नकाशा मिळावा. त्याच बरोबर मौजे-घोटगांव गोठणपाडा येथील वन पट्टेधारकांची नोंद सात बारा दप्तरी करावी. मौजे-कुंभारशिव, राहूर व शिरगांव येथे सुरु असलेल्या मंगूर माशांचे तलाव तात्काळ बंद करुन दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच मौजे-तुळशी येथील नविन शर्तीने देण्यात आलेल्या जमिनीची विक्री करणा-यांवर कायदेशिर कारवाई करावी, वनपट्टे धारकांना निकालाची प्रत मिळावी तसेच बिगर आदिवासी प्लॉट धारकांसाठी असलेली तिन पिढ्यांच्या पुराव्याची जाचक अट शिथील करुन त्यांचे दावे मंजूर करावे. तालुक्यात झालेल्या कॅम्पमधील जातीचे दाखले व रेशनकार्ड तात्काळ मिळावेत. तसेच आधारकार्ड नसणा-या लोकांना तात्काल मोफत आधारकार्ड देण्याची व्यवस्था करावी,  तालुक्यातील टंचाई ग्रस्त गांव पाड्यात माहे मार्च २०२२ पुर्वी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न: सोडवावा तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत शिरोळे अंतर्गत येणा-या मौजे शिरोळे येथील बोगस पावती बुक छापुन पाणी पट्टी वसूली करुन निधी हडप करणा-यांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर गावठाण विस्तार , आदिवासींच्या मूलभूत सोयी सुविधा आरोग्य सुविधा आदी विषयांकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी या मोर्चा प्रसंगी केली.  

टॅग्स :Bhiwandiभिवंडी