शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

चौकीदारच निघाले भागीदार, पालिका आयुक्तांचा गैरव्यवहार; मनसेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 4:08 PM

मनसेची आयुक्त बालाजी खतगावकर हटाव मोहीम

मीरारोड - मीरा भाईंदर शहरात सत्ताधारी भाजपानं देशाचे संविधान, न्यायालयीन आदेश आणि कायदे - नियम धाब्यावर बसवून शहर विकायला काढले असून या गैरप्रकारात चौकीदार असलेले महापालिका आयुक्त बालाजी खतगावकरच भागीदार आहेत, असा घणाघात मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. शहर वाचवायचे असेल तर आधी भागीदार आयुक्तांना हटवायला पाहिजे. त्यासाठी आम्ही खतगावकर हटाव मोहीम उघडली असून सनदी अधिकारी आयुक्तपदी द्या, अशी आमची मागणी असल्याचं जाधव यांनी म्हटलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: या प्रकरणी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेत्यांना पत्र देऊन मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात घेतलेल्या पत्रकार परिषदेतच जाधव यांनी सत्ताधारी भाजपा व पालिका आयुक्तांवर आरोपांचा भडिमार करत गैरप्रकारांचा पाढाच वाचला. शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे, नरेंद्र पाटोळे, बबन कनावजे, हेमंत सावंत, पुत्तुल अधिकारी, अनु पाटील, सोनिया फर्नांडिस हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी मनसेकडून १५ मुद्दयांची यादी देण्यात आली. 

बॅनर बंदीचा ठराव केला आणि पहिला बेकायदा बॅनर महापौरांनीच पालिकेच्या बोधचिन्हासह लावला. नगररचना विभागातील भ्रष्टाचार तर टोकाचा गेला आहे. आरक्षणातील बेकायदा बांधकामं हटवून जागा ताब्यात घेतल्या जात नाहीत. ठाणे गुन्हे शाखेनं युएलसी घोटाळयात गुन्हा दाखल केला असून त्याच्या सखोल चौकशीची मागणी पोलीस उपायुक्तांकडे केल्याचं जाधव म्हणाले. आरजीच्या जागेत बेकायदा बांधकामे फोफावली असताना त्याला संरक्षण देताना बिल्डरांना नव्या परवानग्या दिल्या आहेत. शाळा - उद्यानांची आरक्षणं फेरबदलाचे ठराव होत असताना ते विखंडनासाठी पाठवले नाहीत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

परिवहन सेवा डबघाईला लागली आहे. पालिका रुग्णालयात शस्त्रक्रियांअभावी रुग्णांचे बळी घेतले जात आहेत. उत्तनचा घनकचरा प्रश्न सोडवण्यापेक्षा पालिकेला ५०० कोटींच्या निविदेत जास्त स्वारस्य आहे. पर्यावरणाचा ऱ्हास व नवघर ग्रामस्थांच्या विरोधानंतरसुध्दा दफनभूमीचे आरक्षण रद्द केले नाही. महापालिकेवर कर्जाचा डोंगर असून आर्थिक संकट असताना लोकांवर कराचा बोजा टाकून दुसरीकडे महापौर चषक आदी कार्यक्रम व दालनांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आयुक्त करत आहेत, असा आरोप मनसेनं केला.

माती व डेब्रिज माफियांपासून झोपड्या, चाळी, इमारती आदी बेकायदा बांधकाम करणाऱ्या माफियांवर तसेच संबंधित बांधकामांवर ठोस कारवाईच होत नसून बंद पडलेल्या इमारतींची कामे पुन्हा सुरु झाली आहेत. परप्रांतीय लोकांना आणून त्यांचे मतदारसंघ केले जात आहेत. आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित ७११ क्लब , ७११ रुग्णालय, शाळांवर तर आयुक्तांची विशेष कृपा असून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या बक्कळ फायद्यासाठी ते वाट्टेल ते करत आहेत, असादेखील आरोप मनसेकडून करण्यात आला.

न्यायालयाचे आदेश डावलून फेरीवाल्यांना आणून बसवले जात आहे. त्यामुले आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी आपण न्यायालयास करणार आहोत. तशी याचिका दाखल केली आहे, असं जाधव म्हणाले. आयुक्तांनी शहर विकायला काढले असून सामान्य नागरिक मात्र विविध समस्यांनी मेटाकुटीला आले आहेत. सत्ताधारी भाजपाच्या गैरप्रकार, भ्रष्टाचार, मनमानी कारभाराला आयुक्त खतगावकरच संरक्षण देत असल्यानं त्यांना हटवल्याशिवाय मनसे गप्प बसणार नाही. खतगावकर यांनी कारवाई केली नसल्यानं चौकीदाराच भागीदार असल्याचं स्पष्ट झाल्याचं ते म्हणाले.  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकcommissionerआयुक्तMNSमनसेBJPभाजपा