शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या वाट्याला गेल्यानंच ‘त्यांचं’ मुख्यमंत्रिपद गेलं, राज ठाकरेंचा उद्धव यांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 05:39 IST

भरतीनंतर ओहोटी येते हे भाजपनेही विसरू नये, राज ठाकरेंचा सूचक इशारा

ठाणे : मशिदीवरील भोंगे उतरवणे, पाकिस्तानी कलाकारांना हाकलून लावणे यासारखी सारीच आंदोलने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केली. स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवून घेणारे पक्ष त्यावेळी काय फक्त चिंतन करीत होते. हिंदुत्वाला मानता म्हणजे केवळ जपमाळ ओढता का, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केला. 

हिंदुत्ववादी पक्षाच्या कृतीत हिंदुत्व दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. मनसेच्या वाट्याला गेल्याने मुख्यमंत्रिपद गेले, असा टोला राज यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता मारला. गेली १७ वर्षे सत्ता नसतानाही साथ न सोडणाऱ्या मनसैनिकांचे आभार मानतानाच आपण सत्तेपासून दूर नाही. हे मळभ दूर होईल. कारण लोक राज्यातील सर्व पक्षांना विटलेले आहेत, असे ते म्हणाले. 

मनसेचा १७ वा वर्धापन दिन गुरुवारी गडकरी रंगायतन सभागृहात साजरा झाला. यावेळी कार्यकर्त्यांना राज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाने स्थापनेपासून केलेली आंदोलने, कामे याबाबतच्या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन झाले. तसेच पक्षाच्या वेबसाईटचे लोकार्पण केले. राज म्हणाले की, माझ्या सभेला गर्दी होते; परंतु मते मिळत नाहीत, हा प्रचार आहे. काही पक्षाच्या विचारांना बांधलेले पत्रकार हा अपप्रचार करीत आहेत. यापूर्वी पक्षाचे १३ आमदार निवडून आले ते काय सोरटवर निवडून आले होते का? २०१४ व २०१९ या निवडणुकीत देशावर राज्य केलेल्या काँग्रेसची अवस्था बिकट झालेली आहे. 

भरतीनंतर ओहोटी हे नैसर्गिक असून भाजपला आज भरती असली तरी त्यांनीही ओहोटी येणार हे लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला. मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या यशस्वी आंदोलनानंतर आपल्याला अयोध्येला बोलावले होते. तेथे आपल्याला विरोध करणारे हिंदुत्ववादीच होते. ते काय राजकारण सुरू होते ते मला माहीत होते, पण मनसेच्या वाट्याला गेलेल्यांना मुख्यमंत्रिपदावरून जावे लागले, असे राज म्हणाले.

त्याला सर्वांत प्रथम कळेल...मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करून राज म्हणाले की, ज्याने कुणी हे कृत्य केले त्याला सर्वांत प्रथम कळेल व नंतर त्यानेच हे केले असल्याचे इतरांना कळेल. माझ्या मुलांचे रक्त मी फडतूस लोकांकरिता वाया जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील पक्षाची बाजू विधानसभेत मांडत आहेत, असे राज म्हणाले.

मनसेने ६५ टोलनाके बंद केले. नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचा डाग न लागता अनेक कामे केली. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखवले जाऊ लागले. मराठी पाट्या लागल्या, अशा विविध आंदोलनांचा उल्लेख करून राज यांनी आपल्या पक्षाने केली तेवढी आंदोलन अन्य पक्षांनी केली नाही, असा दावा केला.

अत्यंत खालच्या भाषेचा वापरसध्या महाराष्ट्रात अत्यंत खालची भाषा वापरून हल्ले केले जात आहेत. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले तो महाराष्ट्र इतक्या खालच्या थराला जाऊन बोलत आहे. महाराष्ट्राचे काही खरे नाही. सध्या जे सुरू आहे ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारे आहे, असेही ते म्हणाले. २२ तारखेच्या गुढीपाडवा मेळाव्यात विरोधकांचे वाभाडे काढण्याचा बुफे तुम्हाला देणार असल्याचे सांगितले.

  • छायाचित्रकार आनंद शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत हत्तीवरील अभ्यासाकरिता आपले आयुष्य दिल्याने मनसेचा पहिला मराठी अभिमान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
  • तुषार घाडीगावकर यांनी तयार केलेल्या मनसे गीताकरिता त्यांचा व कलाकारांचा राज यांच्या हस्ते सत्कार केला.
  • अमेय खोपकर यांनी तयार केलेले नवे मनसे गीत यावेळी सादर करण्यात आले.
  • राज यांच्या मोटारीवर फुले उधळून त्यांचे स्वागत केले.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेthaneठाणेSandeep Deshpandeसंदीप देशपांडे