शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

मीरा भाईंदरमधून लालपरीने 12 हजार लोकांना राज्याच्या सीमेवर  मोफत सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 15:20 IST

11 मे पासून 20 मे पर्यंत मध्यप्रदेशच्या सीमे पर्यंत 243 एसटीबस , छत्तीसगढ च्या सीमे पर्यंत 24 तर कर्नाटक सीमे पर्यंत 14 बस सोडण्यात आल्या असून एकूण 281 बस मधून सुमारे 12 हजार लोकांना मोफत नेण्यात आले आहे .

- धीरज परब  मीरारोड - रेल्वे तसेच प्रवासाची सोय नसल्याने नाईलाजास्तव कडक उन्हात पायी निघालेल्या 12 हजार लोकांना आता पर्यंत मीरा भाईंदर मधून एसटी बसने राज्याच्या सीमेवर मोफत सोडण्यात आले आहे . 281बस फेऱ्या झाल्या असून कष्टकरी गोरगरिबांना मोठा दिला मिळाला आहे . 

कोरोना मुळे केंद्र सरकारने लॉक डाऊन जाहीर केल्या नंतर मजूर , कामगार , रोजंदारीवर जगणारी कुटुंब तसेच अन्य अडकलेल्या लोकांसाठी मात्र रेल्वेची तसेच अन्य वाहनांची सुविधाच उपलब्ध करून देण्यात आली नाही . जेणे करून गोरगरीब व कष्टकऱ्यांना आपल्या मूळ गावी जाणे अशक्य झाले . ट्रेन बंद असल्याने लोकांनी ट्रक , रिक्षा , टेम्पो आदी वाहनं मधून शेकडो किलोमीटर असलेली आपल्या राज्यांची हद्द गाठली . वाहन चालकांनी देखील वाट्टेल तसे भाडे आकारून लूट केली . 

परंतु पदरी पैसे नसणारे वा वाहनांची सोय नसणारे हजारो लोकं मीरा भाईंदर हद्दीतील मुंबई अहमदाबाद मार्गावरून चालत आपले गाव गाठण्यासाठी जात असत . लोकांचा हा जीवघेणा प्रवास पाहून अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्य शासनाच्या एसटी बस राज्याच्या सीमे पर्यंत मोफत सोडण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने वरसावे नाका येथून 11 मे पासून मध्यप्रदेशच्या सीमे पर्यंत एसटी बस लोकांना मोफत सोडून येऊ लागल्या. 

विभागीय वाहतूक अधिकारी आर . एच . बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक वाहतूक निरीक्षक  भास्कर देवरे व सहकार्यांनी बस सोडण्याचे आवश्यक ते नियोजन केले . बस चालक देखील या कष्टकऱ्यांना वेळेत सोडून परत दुसऱ्या खेपेसाठी तयार असायचे .  सामाजिक संस्था , महसूल , पोलीस आदींनी बसने जाणाऱ्या लोकांची तेथेच वैद्यकीय तपासणी करून सोबत जेवण , पाणी , बिस्कीट , फळं आदी दिले जाऊ लागले . 

11 मे पासून 20 मे पर्यंत मध्यप्रदेशच्या सीमे पर्यंत 243 एसटीबस , छत्तीसगढ च्या सीमे पर्यंत 24 तर कर्नाटक सीमे पर्यंत 14 बस सोडण्यात आल्या असून एकूण 281 बस मधून सुमारे 12 हजार लोकांना मोफत नेण्यात आले आहे . दहिसर चेकनाका येथून रोज सकाळ पासून रात्री पर्यंत प्रवासी येतील त्या नुसार त्यांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर मोफत सोडले जात आहे . पायी चालत जाणाऱ्यांना लालपरीने मोठा आधार देण्याचे काम न थांबता - थकता चालवले आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरstate transportएसटी